शालेय पोषण आहारात पुरवले जाणारे धान्य निकृष्ठ दर्जाचे
आळ्या जाळ्या अन सडलेला तांदूळ
हिमायतनगर(अनिल मादसवार)येथून जवळच असलेल्या सवना ज.येथील जी..शाळेला पुरविल्या गेलेल्या शालेय पोषण आहाराच्या तांदुळात आळ्या आणि जाळ्या लागलेल्या असल्याचे आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन योजनेअंतर्गत पोषण आहार पुरविल्या जातो. परंतु अलीकडच्या काळात हा आहार विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घटक ठरणारा असल्याने विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी पुरविला जाणार आहार जीवघेणा ठरू लागला आहे. शालेय पोषण आहारातील भोजन घेतल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होणे, उलट्या, मळमळ किंवा आजारी पडल्याच्या अनेक घटना आजवर विविध ठिकाणी घडल्या आहेत. तरी सुद्धा यातून शासनाला अजून शाहन पण सुचल्याचे दिसून येत नसल्याचे सवना जं. येथील निकृष्ठ तांदुळाच्या घटनेवरून दिसून येत आहे. सदर धन्य हे शासकीय गोदामातील असून, महाराष्ट्र राज्य कन्जुमर फेडरेशन लि.मुंबई मार्फत चढावर नामक पुरवठादार नांदेड जिल्ह्याला पुरवठा करत असल्याचे समजते.
हिमायतनगर तालुक्यातील सवना जं.येथील जी.प.प्राथमिक शाळेला दि.२३ रोजी पुरविण्यात आलेला शालेय पोषणाच्या आहाराचा तांदूळ आळ्या- जाळ्या व सडका असल्याचे आढळून आल्याने हा तांदूळ विद्यार्थ्यांनी खायचा कसा..? शालेय पोषण आहार आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कि बिघडवण्यासाठी असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालाकातून विचारला जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबवण्यात येत असल्या तरी शासकीय योजना सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी उत्तम असतात. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या किती फसव्या असतात हे या निकृष्ठ तांदुळाच्या घटनेवरून दिसून येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
सदरील निकृष्ठ तांदुळाबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्री श्याम रायेवार यांच्याशी भ्रमण ध्वनिवरून विचारणा केली असता शालेय पोषण आहारात पुरविल्या जाणारे सर्वच धान्य हे बर्याच वेळा निकृष्ठ व दर्जाहीन पुरविल्या जात असून, विद्यार्थ्यांना तो खाऊ घालण्याचीही इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु शासनाच्या आदेशाप्रमाणे मध्यान्न भोजन देणे बंधनकारक असल्याने निकृष्ठ दर्जाचे धान्य स्वच्छ व नीटनेटके करून आहार दिला जातो. सवना जं शाळेत एकूण २७२ विद्यार्थी संख्या असून, आज पुरविण्यात आलेला ११ कुंटल तांदुळापैकी एक कट्टा गाडीतून उतरताना फुटल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पुरविण्यात आलेल्या धान्यापैकी किती धान्य निकृष्ठ आहे हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.
गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, पुरविण्यात आलेले धान्य निकृष्ठ असल्याचा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी परत करायला हवे. असा माल शाळेने घेणे बंधनकारक नसल्याचे ते म्हणाले.
हिमायतनगर(अनिल मादसवार)येथून जवळच असलेल्या सवना ज.येथील जी..शाळेला पुरविल्या गेलेल्या शालेय पोषण आहाराच्या तांदुळात आळ्या आणि जाळ्या लागलेल्या असल्याचे आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन योजनेअंतर्गत पोषण आहार पुरविल्या जातो. परंतु अलीकडच्या काळात हा आहार विद्यार्थ्यांच्या आरोग्याला घटक ठरणारा असल्याने विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी पुरविला जाणार आहार जीवघेणा ठरू लागला आहे. शालेय पोषण आहारातील भोजन घेतल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा होणे, उलट्या, मळमळ किंवा आजारी पडल्याच्या अनेक घटना आजवर विविध ठिकाणी घडल्या आहेत. तरी सुद्धा यातून शासनाला अजून शाहन पण सुचल्याचे दिसून येत नसल्याचे सवना जं. येथील निकृष्ठ तांदुळाच्या घटनेवरून दिसून येत आहे. सदर धन्य हे शासकीय गोदामातील असून, महाराष्ट्र राज्य कन्जुमर फेडरेशन लि.मुंबई मार्फत चढावर नामक पुरवठादार नांदेड जिल्ह्याला पुरवठा करत असल्याचे समजते.
हिमायतनगर तालुक्यातील सवना जं.येथील जी.प.प्राथमिक शाळेला दि.२३ रोजी पुरविण्यात आलेला शालेय पोषणाच्या आहाराचा तांदूळ आळ्या- जाळ्या व सडका असल्याचे आढळून आल्याने हा तांदूळ विद्यार्थ्यांनी खायचा कसा..? शालेय पोषण आहार आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कि बिघडवण्यासाठी असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालाकातून विचारला जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबवण्यात येत असल्या तरी शासकीय योजना सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी उत्तम असतात. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या किती फसव्या असतात हे या निकृष्ठ तांदुळाच्या घटनेवरून दिसून येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
सदरील निकृष्ठ तांदुळाबाबत शाळेचे मुख्याध्यापक श्री श्याम रायेवार यांच्याशी भ्रमण ध्वनिवरून विचारणा केली असता शालेय पोषण आहारात पुरविल्या जाणारे सर्वच धान्य हे बर्याच वेळा निकृष्ठ व दर्जाहीन पुरविल्या जात असून, विद्यार्थ्यांना तो खाऊ घालण्याचीही इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु शासनाच्या आदेशाप्रमाणे मध्यान्न भोजन देणे बंधनकारक असल्याने निकृष्ठ दर्जाचे धान्य स्वच्छ व नीटनेटके करून आहार दिला जातो. सवना जं शाळेत एकूण २७२ विद्यार्थी संख्या असून, आज पुरविण्यात आलेला ११ कुंटल तांदुळापैकी एक कट्टा गाडीतून उतरताना फुटल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पुरविण्यात आलेल्या धान्यापैकी किती धान्य निकृष्ठ आहे हे सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.
गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, पुरविण्यात आलेले धान्य निकृष्ठ असल्याचा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी परत करायला हवे. असा माल शाळेने घेणे बंधनकारक नसल्याचे ते म्हणाले.