दिप प्रज्वलन, शोभा यात्रा व काल्याच्या किर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायणाची सांगता....
नांदेड(खास प्रतिनिधी)मागील आठ दिवसापासुन हिमायतनगर येथे सुरु असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळयाची सांगता रविवारी दि.२२ रोजी ग्राम दिंडी व हभप.अशोक महाराज तळणीकर यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. यावेळी किर्तनाला ग्रामीण व शहरी भागातुन हजारोंच्यावर श्री भक्तांचा जनसागर लोटला होता.
गत आठ दिवसापासून सुरु असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी रात्रीला ओम आकारातील दिव्याची ज्योत लाऊन मंदिर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते दिपप्रज्वल करण्यात आले. यावेळी संपुर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या उजेडाने उजळुन निघाला होता. तसेच हरिणाम सप्ताहच्या समाप्तीनीमीत्त सकाळी ९ वाजता भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी प्रथम ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायणाची पालखी दिंडी व्यासपीठाचार्य माऊली ज्ञानेश्र्वर महाराज बोरगडीकर यांच्या नेतृत्वाखील शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. शोभा यात्रेत महीलां, मुलींनी डोक्यावर ज्ञानेश्र्वरी ग्रंथ व तुलसी वृंदावण घेऊन सामील झाल्या होत्या. तसेच टाळ मृदंगाच्या गजरात श्री परमेश्र्वर भजनी मंडळाच्या वारकरी महीला व पुरुषांनी ताल धरुन शहरवासीयांना आकर्षीत केले. सदर शोभा यात्रा परत श्री परमेश्वर मंदिरात येऊन सत्कार समारंभ व महाप्रसादाने समारोप करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता काल्याच्या किर्तनानंतर दहीहंडी फोडलेल्या राधाकृष्णाची मीरवणुक शहरातील मुख्य रस्त्यावरुन बैंडबाज्याच्या गजरात काढण्यात आली होती. यावेळी परमेश्र्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्र्वर चिंतावार, लक्ष्मण शक्करगे, भास्कर दुसे, प्रकाश शींदे, विठलराव वानखेडे, आनंता देवकते, राजाराम बलपेलवाड, माधवराव पाळजकर, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, संजय माने, गजानन चायल, पत्रकार प्रकाश जैन, अनिल मादसवार, कानबा पोपलवार, अनिल भोरे, प्रकाश साभळकर, रामराव सुर्यवंशी, बाबुराव पालवे, देवराव वाडेकर, यांच्यासह बजरंग दलाचे युवक स्वयंसेवक व गावकरी नागरीक महीला - पुरुष बहु संख्येने उपस्थीत होते.
दहीहंडीच्या दिवसापासुन परमेश्वर यात्रा उत्सवात रंगत भरली असुन, मंदिराच्या कमानीसह कळसावर विद्दुत रोषनाई केल्याने व परिसरात आकाश पाळने, घोडागाडी, मौत का कुआ यासह विवीध प्रकारच्या मीठाई व जीलेबीची दुकाने थाटल्यामुळे यात्रा उत्सवाला ख-या अर्थाने सुरुवात झाली आहे. दि.२३पासुन मंदिरातर्फे आयेजीत खेळ, भाषन, भजन, रांगोळी, सुदृढ बालक व पशुप्रदर्शन, कब्बडी व कुस्ती स्पर्धाच्या कार्यक्रमाचे रेलचल चालणार आहे.