मी जनतेचा सेवक... पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम
हिमायतनगर(अनिल मादसवार)ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदाची सूत्रे स्वीकारलेल्या अनिलसिंह गौतम यांच्या रुजू होण्यानंतर कोणतेही विशेष प्रयत्न न करता अविद्या धंदे वाल्यांनी आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे घरपोच मिळणारी देशी दारू परवानाधारक दुकानातून दुकान उघडण्याच्या वेळे नंतरच मिळू लागली आहे. गुटखा, मटका, आणि जीवाला चटका लावणाऱ्या घटना आपोआपच बंद झाल्या आहेत. अवैद्य धंदेवाल्यांना चाप बसल्याने या मागचे रहस्य काय..? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मी शासनाचा पगार घेतो आणि घेत असलेल्या पगाराचा मोबदला म्हणून इमाने इतबारे जनतेची सेवा करणे हे माजे अद्य कर्तव्य असून, मी जनतेचा सेवक आहे असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकारांना दिले.
आतिशय कडक पण तितक्याच प्रेमळ स्वभावाचे, गुन्हेगारांना सळो कि पळो करणारे, राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडणारे पोलिस निरीक्षक म्हणून अनिलसिंह गौतम ख्याती आहे. वर्दीतील माणुसकी दाखविणारे गौतम या अधिकायाचे कर्तव्य सर्व सामन्य नागरिकांच्या हिताचे असले तरी ते राजकारण्यांना न रुचणारे आहे. त्यामुळे हिमायतनगर पोलिस स्थानकाचा त्यांचा कार्यकाळ किती दिवसाचा असणार..? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तर मी आहे तोपर्यंत चोख काम करणार असून, कोणाच्याही दबावाला बळी पडणार नसून, आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व्हावी यासाठी मोठी तयारी केली आहे. येत्या महिन्याभरात तालुक्यातील सर्व वाडी - तांड्यात जाऊन प्रत्यक्ष नागरिकांची भेट घेणार आहे. तसेच गावातील हालचाली व समस्यांची माहिती घेऊन गोरागारीबना न्याय मिळून देणे यावर माझे प्रमुख लक्ष असणार आहे. विशेषतः महिला - मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलणार असून, ग्रामीण व शहरी भागात होत असलेली अविद्या दारू विक्रीवर कायाम्स्वुपी लगाम घालणार आहे. यासाठी नुकतीच सर्व पोलिस पाटलांची बैठक घेऊन कडक सूचना देण्यात आल्या असून, सर्वप्रकारची माहिती संकलित करणे चालू आहे. या सर्व अवैद्य कारनाम्यावर अंकुश ठेवण्यासाठी सर्व पोलिसांची परेड घेऊन सक्त ताकीद दिली आहे. पोलिस स्थानकातील सर्व कर्मचारी व अधिकारी जनतेचे सेवक असल्याने कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मला थेट संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
धास्तीने अनेक धंदे सावरले .. महिलांमध्ये समाधान
गौतम यांच्या येण्याने शहरतील वर्दळीचे रस्ते खुले झाले असून, दुकानदारांनी रस्त्यावर येणारे आपले सामान दुकानात ओढले आहे. असता व्यस्त लागण्यार्या दुचाकी, फुटोस्तोर मनसे कोंबनाऱ्या काळी - पिवळी, बंदी असली तरी वाढीव दराने मिळणारा गुटखा, दिवसा ढवळ्या दुचाकी वरून खेड्या - पाड्या पर्यंत पोंचणारी देशी दारू अगदी चुटकी सरशी बंद झाली आहे. या प्रकारामुळे सर्व सामान्य महिला, नागरीकातून गौतम यांच्या कार्यपद्धतीवर समाधान मानले जात असून, कोण आहे हा गौतम असे उत्सुकतेचे शब्द दारूड्यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या महिलांमधून विचारला जात आहे.