शिक्षका अभावी दिघीची शाळा तीन दिवसापासून रिकामी... पालकांच्या अनोख्या आंदोलनामुळे शिक्षण विभागाची चिंता वाढली.
हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील दिघी येथील शाळेचा कारभार केवळ एकाच शिक्षकावर चालविला जात असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. या प्रकाराला कंटाळून येथील शिक्षण प्रेमी पालकांनी शाळेत विद्यार्थी न पाठविण्याचा निर्णय घेतल्यामुळे तीन दिवसापासून शाळा रिकामीच भरू लागली आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाची चिंता वाढली असून, वृत्त लिहीपर्यंत एकही शिक्षक दिला नसल्याचे समजते. ........