अतिवृष्टीने सोयाबीनच्या बियातून कोंब फुटल्याचे वृत्त प्रकाशित होताच ...अधिकार्यांनी केली पाहणी... कृषी विद्यापीठाला कळविले
हिमायतनगर(प्रतिनिधी)पावसामुळे हातावर आलेल्या सोयाबीनच्या शेंगातील बियामधून अंकुर फुटू लागल्याचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हमधून प्रकाशित होताच कृषी विभागाने दखल घेऊन दि. २१ रोजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. तसेच परभणी कृषी विद्यापीठाला जा.क्र.ता.कृ.अ / नै.आ.१०/२१/ दि.२१ सप्टेंबर २०१३ च्या पत्राद्वारे काळउन सोयाबीन पिकाचे क्षेत्रीय पाहणी करण्यासाठी तातडीने शास्त्रज्ञांचे एक पथक पाठउन आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शन करावे असे पत्रात नमूद केले आहे.