दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात -NNL

हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील समस्या सोडवून प्रवाशी नागरिकांना दिलासा द्यावा


नांदेड|
मुदखेड, परभणी, मनमाड, आदिलाबाद, परळी वैजनाथ, लातूर ते कुर्डुवाडी, पूर्णा ते अकोला या विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहे. हिमायतनगर पर्यंतचे काम जवळपास पूर्ण झाले असून, या कामाची अंतिम चाचणी झाली आहे. रेल्वे विद्दुतिकरण मार्गाची पाहणी व त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. आणखी एक चाचणी झाल्यानंतर विद्युतीकरणाच्या रेल्वेगाड्या धावण्याला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी विभागीय रेल्वे व्यवस्थापकाने हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील समस्या सोडवून प्रवाशी नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होते आहे.

दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत येणाऱ्या नांदेड विभागात सध्या विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, मुदखेड, परभणी, मनमाड, आदिलाबाद, परळी वैजनाथ, लातूर ते कुर्डुवाडी, पूर्णा ते अकोला या विद्युतीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच हिंगोली ते अकोल्यापर्यंत काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेसला विद्युत इंजिनवर प्रायोग‍िक तत्त्वावर चालवण्यात आले. डिसेंबर २०२४ पर्यंत विद्युतीकरणाचे ध्येय रेल्वेकडून निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना मात्र हिमायतनगर रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर उद्भवलेल्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे या ठिकाणच्या वाढत्या समस्येवरून दिसून येत आहे. 

विद्युतीकरणाबरोबर रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे, उड्डाण पूल झाला आहे. दुसऱ्या प्लॅटफॉर्मचे कामही प्रगतीपथावर आहे. मात्र रेल्वे स्टेशन मास्तर ऑफिस समोर असलेला शेड लहान असल्याने शेडची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. जेणेकरून स्टेशन मास्तरला व प्रवाश्याना पावसात न भिजता आणि उन्हात न थांबता सेवा देणे सोईचे होईल. आणि प्रवाश्यांची देखील अडचण दूर होईल. या स्थानकावर सार्वजनिक शौचालय, प्रतिक्षालय, सुरक्षेसाठी पोलीस चौकी, आणि शक्य तेवढ्या नवीन रेल्वे आणि हिमायतनगर स्टॉपवर रेल्वे थांबण्याची वेळ वाढविण्यात गरजेचे आहे. या ठिकाणी रेल्वे कमिवेळ थांबत असल्याने प्रवाश्याना चढताना - उतरताना अपघात होत आहेत. पार्सल ऑफिस बंद असल्याने व्यापाऱ्याना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. रेल्वे स्थानकावर बैठक व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे प्रवाश्यांना रेल्वेची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते आहे. यासाठी रेल्वे स्थानकावर आसन व्यवस्था करणे आवश्यक आहे. 

नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूरपर्यंत पूर्ववत चालू करण्यात यावी. हिमायतनगर स्थानकावर वेटिंग हॉल असुन, उघडले जात नाही, हे उघडून 24 तास चालू ठेवावे. तसेच उच्च प्रतिक्षालय बांधून (उड्डाण पूल) दादऱ्यापर्यंत शेड उभारणे अत्यंत गरजेचे आहे. सिनियर सीटजण सुविधा बंद असल्यामुळे ती पूर्ववत चालू करावी. पैसेंजर आणि मेल एक्स्प्रेस रेल्वेचे भाडे सारखेच असल्यामुळे पैसेंजर रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना जादा पैसे मोजून भुर्दंड सहन करावा लागतो आहे. याकडे देखील विभागीय व्यवस्थापकाने लक्ष देण्याची मागणी प्रवाशी नागरीकातून केली जात आहे.  


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी