उस्माननगर, माणिक भिसे| माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल १ जुलै हा त्यांचा वाढदिवस कृषीदिन म्हणून उस्माननगर ता.कंधार येथील मंडळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे विचार सांगून उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी कृषी सहायक अधिकारी सोपान उबाळे ,कृषी सहायक पर्यवेक्षक वारकड ,व्यंकटराव घोरबांड , पत्रकार माणिक भिसे, गणेश शिंदे, ॲड.सत्तार अदमनकर ,केशव साखरे , शिवशंकर काळे,लक्ष्मण काळम , रमेश घोरबांड ,वारकड ,अदी शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक वारकड व कृषी अधिकारी उबाळे यांनी अगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन केले. खरीप पिकावरील किड व रोग तसेच हवामान बदल आधारीत शेती पध्दती या विषयावर मार्गदर्शन केले . तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पाहीलेले स्वप्न शेतकऱ्यांनी पूर्ण करून आपली शेती सुजलाम सुफलाम करुन उत्पन्नात वाढ कशी होईल याकडे लक्ष द्यावे अशी विनंती केली.यावेळी गावातील नागरिक, शेतकरी उपस्थित होते.