लाडका येथे सततच्या नापिकी व ओल्या दुष्काळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
सततच्या नापिकाला व संततधार मुसळधार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसानीला कंठाळून व नैराश्यातून कंधार तालुक्यातील मौजे लाडका येथील  55 वर्षीय शेतकऱ्यांने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना 21 जुलैच्या पहाटे 5-6 वाजता च्या दरम्यान  शिवारात घडली.

कंधार तालुक्यातील मौजे लाडका येथील  शेतकरी   नागोराव माणिकराव कदम वय ५५ वर्ष यांच्या नावे साडे तीन एकर जमीन आहे.मागीलवर्षापासून  शेतात उत्पन्नात घट झाल्याने महागडे  बि बियाण्यांचे पैसे सुध्दा निघत नव्हते. निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे व सततच्या नापिकाला कंटाळून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ होत आहे. 

नागोराव  कदम यांना साडेतीन एकर जमीन आहे त्यावर त्यांच्या कुटुंबाचा कुठलाही उदरनिर्वाह होत नसल्यामुळे ते पुणे -मुंबई सारख्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी जात असे. नागोराव कदम यांच्या पच्यात तीन मुले,एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.त्यांच्या या निधनाबद्दल लेकरबाळ पोरके झाल्याने परिसरात हळहळ होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी