परिसरात हळहळ, तब्बल दोन तासाच्या नंतर मारूतीचा मृतदेह मिळताच कुटुंबाचा टाहो...
उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या मौजे औराळ ता.कंधार येथील शेतकरी रामदास कदम यांच्या शेतातील तळ्यात तिघे भाऊ शेतात गुरेढोरे चारण्यास गेले होते ,तळ्यात पाणी पाहून तिघेजण पोहण्यास गेले आसता तिसऱ्या वर्गातील चि. मारुती कदम ( वय दहा वर्ष ) हा तळ्यातील गाळात फसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर माहिती मिळाल्यानुसार औराळ ता.कंधार येथील शिवारात गट क्रमांक 12 रामदास कदम या शेतकऱ्याचे दोन वर्षांपूर्वीचे शेततळे आहे रामदास कदम यांचा मुलगा मारुती रामदास कदम वय दहा वर्षे वर्ग तिसरी मध्ये शिकत होता. शाळा सुटल्यानंतर आई-वडिलांच्या मदतीसाठी शेताकडे जाऊन जनावर सांभाळ असताना शेतामधील शेततळे असल्यामुळे दोन भावंडासह या शेततळ्यात एक महिन्याच्या अतिवृष्टीत जमलेल्या पावसाच्या पाण्याने शेततळे तुडुंब भरलेले होते. या शेततळ्यात मारुती व त्याच्यासोबत त्याचे दोन भावंड संतोष कदम व गणेश कदम हे तिघे त्याच्यासोबत पोहण्यास पहिल्यांदाच शेततळ्यात उतरले.
परंतु पौहता येत नसतानाही पाण्यात उतरले होते. मध्ये जाताच गोची पोहण्याचे बसल्यामुळे सतोष व गणेश हे दोघे भांवड कसेबसे बाहेर निघाले ; परंतु भाऊ मारोती दिसत नसल्यामुळे संतोष व गणेश हे दोघे भांवड रडत... रडत..अाई वडीला चा शोधात गावात घराकडे येत सागत पळत सुटले ; अाई व वडील हे दोनशे फुटाचा अंतरावर कापुस शेतातील निंदन करत होते .परतु त्याना या घटनेची खबर ही कळलीच नाही .शेवटी गावातील व कुटुंबातील नातलग धावत शेततळ्यकडे मारोती चा शोध येतातच अाई वडीलाना ही घटना कळताच मारोती....या नावाने टाहो झाला .
गावकरी व नागरिक शेततळ्तात उतरले अखेर तब्बल दोन तासाचा जवळपास मारोतीचा मृतदेह मिळाला .बाहेर काढताच मारोती या नावाने टाहो झाला.... सर्व गावातील नागरिक व कुटुंबातील व्यक्ती दुखाचा प्रसंग पाहुन दगडालाही पाझर फुटाव तसं ....डोळ्यात पाणी येत होते. मारोती हा वर्ग तीसरीत शिकत होता. तो हुशार होता व घरचा घरकामात व शेतातचा कामात अाई व वडीला यांना नेहमी सहकार्य व हातभार लावत होता. या घटनेची माहीती सरपच सुभाष पा कदम यांनी उस्मानगर पोलिस स्टेशन बीट जमादार पवार व कानगुले यांनी पंचनामा केला . व तहसिल कार्यलय कळविले व पचनामा तलाठी चिलकेवार पोलीस पाटील गावातील सरपंच यांच्या वतीने पंचनामाहि करण्यात अाला.
त्यानंतर सदर मुलाचा मृतदेह पी एम करण्यासाठी बारूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता., येथे वैद्यकीय अधिकारी दोन असताना एक ही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. व कर्मचारी उपस्थित नव्हते त्यामुळे सदर पीएम साठी तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याची वेळ आली. त्यानंतर येथील डॉक्टर खिल्लारे मॅडम तब्बल मुलाच्या मृतदेहाच्या तीन तासाच्या नंतर सदर डॉक्टर हजर झाले .त्यामुळे या मृतदेहाचा विटंबना या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कुटुंबांना व मृतदेहाला वाट पहावी लागली .संबंधित अधिकारावर योग्य ती कारवाई करावी अशी ही मागणी उपस्थित नागरिकांकडून झाली होती.या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.