ग्राहकांनी नेहमी दक्ष राहावे -जगताप -NNL


अर्धापूर, निळकंठ मदने|
ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहाकांच्या हितासाठी असल्याने या कायद्यान्वये ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ग्राहकांना सहा प्रकारचे अधिकार दिले आहेत.वस्तु व सेवा घेतांना ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌जागृत राहणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन नायब तहसिलदार मारोतराव जगताप यांनी केले.

तहसील कार्यालयाच्या सभागृहात जागतिक ग्राहकदिनाचे औचित्य साधून ग्राहक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसिलदार मारोतराव जगताप होते.तर यावेळी लक्ष्मीकांत मुळें, नासेरखान पठाण,नगरसेवक सोनाजी सरोदे,पंढरीनाथ बिऱ्हाडे,डॉ विशाल ल़ंगडे, गुणवंत विरकर,आनंद सुर्यवंशी,राजेगोरे,हे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना लक्ष्मीकांत मुळें म्हणाले की, ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे.या ग्राहकांनी आपलीं फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.जो आपण व्यवहार करत  तो व्यवहार पक्क्या पावती घेवून करावा.जर‌ फसवणूक झाली तर उचित ठिकाणी दाद मागावी.या ग्राहक संरक्षण कायद्याची व्यपाक प्रमाणात जनजागृतीची गरज आहे.असे सांगीतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पेशकार प्रदीप भोरे यांनी तर आभार गोविंद पांचाळ यांनी मानले. माणिका साखरे, कैलास पोळेराव, संतोष पवार, नारायण ताटे, आमेर सिद्दिकी,राज कोळी, भिमराव जाधव, शिवानंद दासे, निर्माला खिल्लारे यांची  उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी