गुत्तेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हिमायतनगर - पार्डी - एकघरी - वाशी रस्ता बनला मृत्यूचा सापळा...
हिमायतनगर(वार्ताहर)आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रयत्नाने 34 लाखाच्या खर्चातून हिमायतनगर - वाशी रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली. परंतु संबंधित गुत्तेदाराने हे काम अर्धवट ठेवून काढता पाय घेतल्याने खड्डेमय दयनीय झालेल्या रस्त्यातून प्रवास करणे म्हणेज मृत्यूला आमंत्रण देण्याजोगे ठरत असल्याच्या स्नातपत प्रतिक्रिया नागरिक व वाहनधारकातून उमटत आहेत.
मागील 7 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तत्कालीन ग्रामविकास मंत्री ना.सूर्यकांताताई पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या कोट्यवधींच्या निधीतून या रस्त्याचे काम झाले होते. त्यावेळी संबंधित गुत्तेदाराने निकृष्ठ पद्धतीने काम केल्यामुळे देखरेखीची काळातच मोठं - मोठाले खड्डे पडले. तेंव्हापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला हे सर्वश्रुत आहे. तरीदेखील याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे उन्हाळ्यात जाताना अनेक दुचाकी स्वारांना कमर लचकने, मानेची नस दबने, यासह अन्य विकार जडले आहेत. त्यामुळे पळसपूर, एकघरी, डोल्हारी, पार्डी येथील नागरिकांनी आ.नागेश पाटील आष्टीकर यांची भेट घेऊन गार्हाणे मांडले. त्यांनी नागरिकांचीच समस्या जाणून घेऊन तात्काळ संबंधित विभागास संपर्क करून दुरुस्तीची उर्वरित 34 लाखाच्या रक्कमेतून खड्डे - बुजवून समस्या तात्काळ दूर करण्याचे सुचविले. त्यावरून या वर्षी रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम विशेष दुरुस्ती अंतर्गत दोन महिन्यापूर्वी सुरु करण्यात आले आहे. ११२५० स्क्वेयर मीटर मंजूर असलेल्या खड्डे बुजविण्याच्या कामात २२५० मीटर खड्डे बुजून पैचेस मारण्याचे काम करावयास परभणी येथील एस.एस. कंट्रक्शन कंपनीच्या गुत्तेदाराने सुरुवात केली. परंतु गुत्तेदारामार्फत करण्यात येत असलेल्या कामात मुरूम मिश्रित खाडी व रस्ता स्वच्छ न करता टोळके दगड वापरून खड्डे बुजविण्यात येत असल्याने सुमार दर्जाचे काम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. याची दाखल घेऊन यावर नियंत्रण ठेवणारे अभियंता सुधीर पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामच दर्जा वाढविण्याच्या सूचना सादर गुत्तेदारास दिल्या होत्या. परंतु गुत्तेदाराने केवळ हिमायतनगर शहरापर्यंत काम करून पुढील काम अर्धवट ठेऊन काढता पाय घेतला आहे.
त्यामुळे ऐन पावसाळ्यात हिमायतनगर ते वाशी रस्त्यावरील खड्डेमय रस्त्यावर पाणी साचून राहत असल्यातून खड्ड्यातून मग काढताना अनेकांना घाण पाण्यात पडून विविध आजाराला बळी पडावे लागले आहे. तर या रोडवून प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांना तर कुठे पाय ठेऊन चालावे हे कळायला मार्गाचा राहिला नसल्याने अल्पश्या पावसामुळे या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. या सर्व खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन धारकांना हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत असल्याचा भास होत असून, गावातील नागरिकांना बाहेरगावी जाताना वाहने घरी ठेवून २१ व्या शतकात बैलगाडीचा वापर करण्याची वेळ आली असल्याचे बोलून दाखवीत आहे. ही बाब लक्षात घेता पलायन केलेल्या गुत्तेदारच्या कामाची चौकशी करून रस्त्यावरील खड्डे बुजवून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी हिमायतनगर, बऱ्हाळी तांडा, पार्डी, एकघरी, वाशी येथील गावकऱ्यांसह वाहनधारक करीत आहेत.