नांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद

पावसाचा हाहाकार.. जवळगाव - हिमायतनगरातील शेती व घरात पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान  
आपत्ती व्यवस्थापन पथक नावालाच
2013 नंतर नदी - नाले - ओढे ओव्हर फ्लो 
पावसामुळे जनजीवन विस्कळीत... 
हिमायतनगर(अनिल मादसवार) मागील दहा दिवसाच्या विश्रांती नंतर दि. 24 रविवारी दुपारी शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पावसाने हाहाकार माजविल्याने सर्वच नाले  खळाळून वाहू लागले. तर अनेकांच्या शेती व घरात पाणी घुसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.  पावसाचा जोर अधिक असल्याने नांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने तब्बल तीन तास वाहतूक बंद झाली होती. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले हे मात्र खरे आहे. पुराची स्तिती उद्भवली असताना देखील महसुलाचे एकही कर्मचारी उपस्थित झाले नसल्याने आपत्ती व्यवस्थापन पथक नावालाच काय..? असा संतप्त सवाल पुराचा सामना करणार्यांनी उपस्थित केला आहे.  

सन 2013 नंतर हिमायतनगर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. तब्बल 2 तास चाललेल्या पावसामुळे पोटा, सोनारी, टेभी, सवना ज, महादापूर, सरसम बु, जवळगाव, कमारवाडी, पारवा, कांडली  भागात रविवारी दुपारी 3 वाजता पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील शेती व परिसर जलमय झाली. पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग काढलेला नसल्याने पुराच्या पाण्याचे अनेकांच्या शेत जमिनी चिरून मार्ग काढला. त्यामुळे हदगाव - हिमायतनगर रस्त्यावरील जवळगाव ते कामारवाडी मध्ये असलेल्या तीनही पुलावरून पाणी जात होते. या पावसाने शेतीत काम करणाऱ्या शेतकर्याना रोखून धरले परंतु पाऊसामुळे आखाडे पाण्यात आल्याने जीव वाचविण्याच्या भीतीने शेतकरी, मजुरांनी घराची वाट धरली. मात्र घर गाठताना पुलावरून मार्ग काढण्यासाठी टोंगळ्या एवढ्या पाण्यातून एकमेकांना साखळी पद्धतीने धरून घर गाठावे लागले. या पावसाने जवळगाव येथील महावितरण कार्यालय, मोबाईल टॉवर व गावातील रस्ते आणि अनेक घरे पावसाच्या पुराणे व्यापल्याने जिकडे - तिकडे पाणीच पाणी दिसत होते. तसेच हिमायतनगर शहराजवळील रेल्वेस्थानक व भोकर - नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल 2013 नंतर ओव्हर फ्लो होऊन वाहू लागल्याने जवळपास 2 कि. मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पोलीस पथक आल्यानंतर वाहनांना मार्ग काढून दिल्याने वाहतुक सुरळीत झाली. दरम्यान आज झालेल्या पावसाने 100 मिलिमीटरचा आकडा पार केला असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.

२० गावांचा संपर्क तुटला..

हिमायतनगर तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी - नालायच्या कार्थावरील पाणी काठावरील शेतात गेल्याने उभारी घेऊ पाहत असलेली पिके पुन्हा पाण्यात आली आहेत. पावसामुळे जवळगाव, घारापूर, जवळगाव, सोनारी, पोटा, विरसनी, टेंभी, सवना, अन्देगाव, जीरोणा, एकघरी, वाशी, गणेशवाडी, पार्डीसह हिमायतनगर शहरातील पुलावरून पाणी जात असल्याने जवळपास २० ते २५ गावाचा संपर्क तुटला होता. पाऊस ओसरल्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता वाहतूक सुरळीत झाली असली तरी नदी, नाले, ओढे बंधारे तुडुंब भरून वाहत होते. रेल्वे उड्डाण पुलाच्या खालील रस्त्यावर पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग अजूनही बंद आहेत. अनेकांच्या घरात व शेतीत पाणी घुसल्याने पुन्हा शेतकरी व गरीब, सामान्य नागरिक नुकसानीच्या गर्तेत सापडला असून, हिमायतनगर व ग्रामीण भागातील जुन्या इमारती व घरांच्या भिंती पाण्यामुळे भिजून जमीनदोस्त झाल्या आहे. एकूणच आजच्या पावसाने शेतकरी, मजुरदार, व्यापारी नौकरदार व सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी  निघालेल्या कुटुंबाना हैराण करून सोडले. आजच्या पावसाने हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला तिसऱ्यांदा पुर आल्याने मराठवाडा-विदर्भाचा संपर्क तुटण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी