अप्रतिम कलाविष्कार

आनंददायी बाल मेळाव्यात विद्यार्थ्यांची अप्रतिम कलाविष्कार

हिमायतनगर(वार्ताहर)दीप नगर खडकी येथे संपन्न झालेल्या बालमंत्री मंडळाच्या कला अविष्कार कार्यक्रमात अप्रतिम अभिनय प्रस्रेत करून चिमुकल्यांनी उपस्थित मान्यवर, पालक व श्रोत्यांची मने जिंकून ग्रामीण भागातील बालक सुद्धा मागे नाहीते हे यातून दाखवून दिले आहे.

ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यासपीठावर आपल्या नागातील सुप्त गुणांचे प्रदर्शन करण्याचा धाडस निर्माण व्हावे. आणि मुलींबाबत पालकात निर्माण झालेली द्वेष भावना दूर करून मुलगा - मुलगी समान या बाबत जागृती व्हावी, व बालकांना त्यांचे हक्क अधिकार मिळावेत या उदात्त हेतूने गत अनेक वर्षापासून हिमायतनगर येथील सिप्रा सामाजिक संस्था कार्य करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे तालुक्यातील दत्तक घेतलेल्या शाळांची गुणवत्ता वाढीस लागली असल्याचे उत्तम उदाहरण पहावयास मिळत आहे. तो उद्देश पूर्णपणे सफल व्हावा यासाठी वर्षातून एक वेळा विद्यार्थ्यांना मनसोक्त आनंद लुटता यावा म्हणून दि.२८ रविवारी आनंददायी मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटना भारतीय स्टेट बैन्केचे क्षेत्रीय अधिकारी श्री काळेवाड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामसा येथील कायपलवाड सर, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, श्री कारकडे सर, संस्थेचे सचिव दिलीप राठोड हे होते.

स्वागतानंतर बोलताना श्री काळेवाड म्हणाले कि, स्त्री हि मत आहे..स्त्रीमुळेच हि सृष्ठी शाबूत असून, स्त्रीच्या पोटातून जन्मलेला अनेक्स शूर वीर या देशात होऊन गेले आहेत. त्यामुळे स्त्रीला कमी लेखू नका, मुलगा हा केवळ नावाचा आहे, परंतु खरी तळमळ हि आईनंतर मुलीलाच असते. कारण सुख दुखात मुलगीच मुलापेक्षा जास्त विचारपूस करून काळजी घेते. त्यामुळे मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. म्हणून सर्वांनी मुलीबाबत ची वाईट धारणा मनातून काढून टाका आणि भरून हत्या टाळा. असा संकल आजपासून करून आपल्या गाव परिसरात प्रत्येकाला याची जाणीव करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनतर कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली, चिमुकल्यांनी आपल्या कला गुणांचे सादरीकरण जलवा तेरा जलवा जलवा....या गाण्याने करून हे मां काली...जान चाहे देणी पडे... या गीतांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यानंतर नाच रे मोर आंब्याच्या बनात...नाच रे मोर नाच..., पैरोमें बंधन है...पायाल ने मचाया शोर...,  चल जेजुरीला जावू...इमान डोल जायेगा..., चांदण चांदण झाली रात.., ठा..ठा...ठा....दुनिया कि ..., माझा कृष्ण लहान ग बाई.., चुडी जो हनाके हतो में..., रिबा रिबा.., यासह एकांकी नाटिका, चाद्द्याची नक्कल, मायची पाखरे यासह, लोकगीत, कोळीगीत, भावगीत, पोवाडे सादर करून चिमुकल्यांनी उपस्थितांची दाद मिळविली. चुइमुक्ल्यनि सादर केलेले कला अविष्कार शहरातील मुला - मुलीना लाजविणारे ठरले. यावरून ग्रामीण भागात असलो तरी काय झाले आम्ही सुद्धा कमी नाही हे या चिमुकल्यांनी दाखवून दिले. या बालमंत्री मंडळ मेळाव्याच्या कार्यक्रमात किनवट, हदगाव, हिमायतनगर या तीन तालुक्यातील ३० शाळांच्या जवळपास ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमात रंगत आणली होती.            

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार साईनाथ पालदेवार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद राठोड, साईनाथ गोडसे, पद्माकर सर्कुडे, बालाजी कावळे, बाबू जाधव, सुनिता बोनगीर, वनिता हनवते, रेखा चव्हाण, आदीसह सिप्रा संस्थेचे कार्यकर्ते, उपस्थित शाळांचे शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी