महीलांनी पुढाकार घ्यावा

हिमायतनगर(अनिल मादसवार) गांवातील नागरीकांचे आरोग्य आबाधीत ठेवण्यासाठी सर्वांनी घराबरोबर सामाजीक स्वच्छतेची गरज लक्षात घेऊन, आपल्या घरात शौच्चालय बांधुन वैयक्तीक स्वच्छता ठेवण्यासाठी महीलांनी पुढाकार घ्यावा. तसेच निरोगी व निरामय जिवन जगण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतीपादन पंचायत समीतीच्या सभापती सौ.आडेलाबाई हातमोडे यांनी केले.

त्या तालुक्यातील दरेसरसमतांडा येथील जि.प.प्राथमीक शाळेत आयोजीत स्वच्छ भारत अभीयाणाअंतर्गत आयोजीत स्वच्छता जनजागरण कार्यक्रमव शोच्चालय बांधकामाच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होत्या. यावेळी जि.प.सदस्य सुभाष राठोड, पं.स.उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, गटविकास अधिकारी गंगावणे, सरपंच श्रीरंग तरटे, शाळेचे मुख्याध्यापक श्री जि.एम.कांबळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थीत होते.

जिल्हाभरात स्वच्छ भारत अभीयाण कार्यक्रमाची सुरुवात दि.18 पासुन करण्यात आली असुन, त्याच पार्श्वभुमीवर हिमायतनगर तालुक्यातील स्वच्छतेला दरेसरसमयेथुन करण्यात आली. प्रथममहात्मा गांध व संत गाडगेबाबा यांच्या प्रतीमेचे पुजन करुन झाली. गावातील नागरीकांना घेऊऩ प्रथणताह शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला. यात विदयमान पदाधाकी-यांसह गटविकास अधिकारी यांनी हाती झाडु घेऊन स्वच्छता अभीयाणाला सुरुवात केली. त्यानंतर गावातील चालु असलेल्या स्वच्छता गृहाची पहाणी केली. तर नव्याने शौच्चालय बांधकामसुरु करणा-या नागरीकांच्या घरी सभापती महोदयांच्या हस्ते शौच्चालयाचे भुमीपुजन करण्यात येऊन कामास सुरुवात केली. यावेळी उपस्थीत नागरीकांनी स्वयंस्फुर्तिने शोच्चालय बांधुन गाव हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला. यावेळी बोलतांना हातमोडे पुढे म्हणाल्या की आगामी २०२० पर्यंत संपुर्ण भारत स्वच्छ करुन शासनाचा महासत्ता बनविण्याचा उद्देश आहे. त्याच धर्तीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे अवाहन करुन अभीयाणाल गती देण्याची सुचना केली आहे. त्यानुसार जिल्हाभरात संपुर्ण स्वच्छता अभीयाण व निर्मल भारत अभियाण चळवळ गतीमान झाली आहे. यासाठी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतहा मेहनत घेत असल्याने नांदेड जिल्हा राज्या नक्कीच अव्वल ठरेल. मात्र यासाठी तुम्हा - आम्हा सर्व जनतेनी पुढाकार घेणे गरजेचे असुन, या चळवळीत सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तसेच गटविकास अधिकारी यांनी सुध्दा उपस्थीत नागरीकांना स्वच्छता व शौच्चालय बांधकामासाठी शासनाकडुन मिळणारी योजना व निधि बाबत इंतभुत माहीती दिली. तसेच येथील शाळा स्वच्छ , सुंदर असल्याबाबत समाधान मानुन शाळेचे मुख्याद्यापक व शिक्षक यांचे अभीनंदन केले. याप्रसंगी गावकरी नागरीक, शिक्षक व विदयार्थी बहुसंख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री विजयकुमार दुर्गे यांनी केले तर उपस्थीतांचे आभार ग्रामसेवक तेलंगे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कस्तुरे, दळवेसर, भालेरावसर, शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष गुणाजी राठोड, अवधुतराव भिसे, रामदास राठोड यांच्यासह गावक-यांनी परीश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी