पाणी टंचाई आराखडा बैठक

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अधिकार्‍यांनी मुख्यालयावर राहावे - आ.आष्टीकर


हदगाव(शिवाजी देशमुख)पंचायत समितीच्या वतीने पाणी टंचाई आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होतो त्या बैठकीमध्ये आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव तालुक्यात तीव्र पाणी टंचाई व दुष्काळ पाहता तालुक्यातील सर्व ग्रामसवेक व सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी आपआपल्या मुख्यालयावर किमान चार ते पाच दिवस राहुन तेथील नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सोडव्यावात असे आहवान आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी पाणी टंचाई निवारानार्थ घेण्यात आलेल्या आराखडा आढावा बैठकीत बोलतांना केले.

या बैठकींस हदगाव पंचायत समितीचे सभापती बालासाहेब कदम, उपभापती जयश्रीताई देशमुखे, तालुका दंडाधिकारी संतोष गोरड, गटविकास अधिकारी धनवे, कृषी अधिकारी तपासकर ,अभियंता भारती , पाणी पुरवठा गायकवाड, माजी जि.प.सदस्य बाबुराव कदम, माजी तालुका प्रमुख पांडूरंग कोल्हे,शामराव चव्हाण, सुभाष जाधव, विवेक देशमुख, डॉ.संजय पवार ,रामराव पाटील, गजानन पवार, सुधाकर महाजन, बालाजी राठोड, वळसे पाटील, रामु ठाकरे, कांतराव तावडे, प्रताप सोळंके, राजु तावडे, विश्र्वबंर गोदजे, सरपचं , उपसरपचं, चेअरमन, सदस्य उपस्थित होते. हदगाव तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी घेण्यात आलेली ही बैठक देवउखळाई आश्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पाणी टंचाई बैठक 3 ते 4 तास चालली, पाणीटंचाई निवारण बैठकिच्या निमीत्यांने उपस्थित असलेल्या गावातील सरपंच, ग्रामपचांयत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य अशाकडुन विविध सुचना त्यांचे निरक्षण करून सबंधीत विभागाला सुचना करण्यात आल्या. दुष्काळ टंचाई व पाणी टंचाई पाहता ईसापुर धरणातील पाणी पैनगंगा नदीत सोडणे व विधन विहिरी अधिगृहण करण्याच्या सुचना केल्या.

तसेच भविष्यामध्ये तालुक्यातील गावामध्ये असलेल्या गावतळयात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गाव तलावातील तात्काळ गाळ काढुन पाणीसाठा वाढविण्यात यावा. प्रत्येक गावातील पाणी पुरवठा करणार्‍या योजनांना सुरळीत विज पुरवठा 24 तास उपलब्ध करून दयावा यासाठी सुचना करण्यात आल्यात. पाणी पुरवठा योजनेचा डिपी जळाला असेल तर तो विधुत रोहीणी अंतर्गत जोडावा तसेच या बैठकिस दांडी मारणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याची सुचना हि देण्यात आली. पाणी टंचाई व दुष्काळ यामध्ये अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी कुठल्याही प्रकारे काम चुकारपणा न करता सहकार्य करावे असे आव्हान आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. या बैठकीचे सुत्रसचलन कुलदिपक व आभार वडजे यांनी केले.

सभापतीचे कार्य कौतूकास्पद 
-------------------------
हदगाव पंचायत समितीचे सभापती बालासाहेब कदम यांनी स्वत: तालुक्याममध्ये पत्येक गावामध्ये जावुन स्वच्छता अभियान व स्वच्छालय बांधकामासाठी नागारिकांना सुचना करुन स्वच्छालयाचे महत्व पटवुन देवुन नागरिकांना आपले गाव स्वच्छ कसे ठेवता येईल याचे मार्गदर्शन करुन आपल्या टिमला घेवुन उपक्रम राबवित आहेत त्यामुळे त्याचे कार्य कौतुकास्पद आहे.

सत्कार घेणे योग्य नाही 
--------------------------
हदगाव तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असुन आपल्या तालक्यातील शेतकरी ह दुष्काळाच्या विळख्यात अडकला असुन या दुष्काळ व पाणी टंचाई च्या काळात सत्कार घेणे हे योग्य नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी व माझ्या हितंचितकांनी दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन सत्कारांचे आयोजन करू नये असे उदगार आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी