धोंडी.. धोंडी पाणी दे

नांदेड(अनिल मादसवार)जुलै महीना आर्धा संपत आला असतांना वरुन राजाने पाठ फिरवील्याने बळीराजासह सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. शेतकरी पावसासाठी देवी -देवतांना साकडे घालत असुन, चिमुकले बालके धोंडी..धोंडी..पाणी दे..चा नारा देउन वरुण राजाला विनवणी करीत असल्याचे चित्र जील्ह्यातील बहुतांश तालुक्यात दिसून येत आहे.

पावसाच्या हुलकावनीने पहील्या टप्यात लावलेली कापसाची पिके नुकसानीत आली असुन, ती जगवीण्यासाठी शेतकर्‍यांना भांड्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. तरीसुध्दा पिके वाळु लागली असुन, येत्या 2 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट येण्याच्या भिती व्यक्त होत आहे. मृग नक्षत्राच्या पहील्याच पावसावर हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठ परीसरातील जवळपास सर्वच शेतक-यांनी खरीप हंगामातील पेरण्या केल्या. परंतु मागील दिड महन्यापासुन वरुन राजाने पाठ फिरवील्यामुळे पावसाअभावी पिके वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा चिंतातुर झाला आहे. रोहीण्या, मृग, आर्द्रा नक्षत्रातही समधानकारक पाऊस पडलाच नाही. आभाळात आलेली ढग वादळी वा-याने पुढे पळत आहेत. प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने शेतक-यांसह सर्वसमान्य नागरीक वाढत्या उकाडयाने हैरान झाले आहेत. त्यातच जनवरांच्या चा-याचाही प्रश्‍न गंभीर बनला असुन, वेधशाळेच्या अंदाजाने कोरडवाहु शेतक-यांनी पेरलेली बियाणे जमीनीतच गुदमरुन जात आहेत. तर काही शेतक-यांच्या जमीनीतील ओलाव्याने पिके वार्‍यावर डोलु लागली, तर काहींची बियाणे बाळसे धरण्यापुर्वीच कोमेजुन गेली आहेत. जी बिजांकुरे वर आली ती ही वाढत्या तापमानामुळे सुकन जात असल्याचे चित्र परीसरात दिसत आहे. 

चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणारे शेतकरी पिकांना जगवीण्यासाठी भांड्याने पाणी देत आहेत. गतवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानीत आलेल्या शेतक-यांना शासनाकडुन थोडीफार मदत मिळाली मात्र, ती अत्यल्प असल्याने गरीब शेतकरी आर्थीक संकटात आला आहे. यावर्षीच्या पेरणीसाठी अनेक शेतकर्यांना साहुकार व बैंकेच उंबरठे झिजवावे लागल आहे. ती वेळ पुढील वर्षात येऊ नये म्हणुन पाण्यासाठी शेतकरी देवी - देवतांना साकडे घालत असुन, ग्रामीण भागात अन्नदानाच्या पंगती, महिलांकडून घट मांडण्यावर भर दिला जात आहे. तसेच शहरातील बालके वरुन राजाला खुश करण्यासाठी लिंबाच्या फरोळ्यावर बेंडुक बांधुन धोंडी...धोंडी पाणी दे..साई माई पिकु दे..धोंडी बाई धोंडी ..धोंडीचे दिवसं..पाणी मोठ हिवस...असा नारा देत येरे..येरे...पावसा तुला देतो पैसा.. अशी विनवणी वरुन राजाकडे करीत धान्य गोळा करुन सायंकाळी जेवनाच्या पंगती उठवत आहेत.

हिमायतनगर तालुक्यात हीच परिस्थिती असून, या वर्षी तर आत्ता पर्यंत केवळ ६ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अजूनही शेतकरी चिंतेत असून, पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने ५० टक्क्याहून अधिक क्षेत्रातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्याचे 48 हजार 543 हेक्टर भौगोलीक क्षेत्र असुन, 33 हजार 200 हेक्टर जमीन लागवडी खाली येते. गत वर्षी जुलै महीन्यात 100 टक्के खरीप पेरणी झाली होती. त्यात 20 हजार 600 हेक्टर जमीनीवर कापुस लागवड करण्यात आली होती. तर 6 हजार 600 हेक्टरमध्ये सोयबीन, तुर 2432 हेक्टर, मुग 390 हेक्टर, उडीद 404 हेक्टर, तळ 59 हेक्टर, ज्वारी 3 हजार 317 हेक्टर, भात 25 हेक्टर, उस 790 हेक्टर अशी पेरणी करण्यात आली होती. परंतु या वर्षी पावसा्भावी पेरण्या लंाबणीवर गेल्या असुन, शेतक-यांनी चांगला पाऊस होईपर्यंन्त पेरण्या करुनये. तसेच कृषी विभागाशी संपर्क साधुन पिके घ्यावीत असे आवाहण तालुका कृषी विभागाकडुन करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी