भारत जोडो यात्रेच्या नियोजन समितीत अभिजित सपकाळांची नियुक्ती -NNL


मुंबई|
काँग्रेसचे नेते मा. खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील नियोजन समितीत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजित सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सपकाळ यांनी प्रदेश काँग्रेसच्या विविध पदांवर काम केले असून जाहीर सभा, विविध कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षासाठी उल्लेखनीय काम केले. राजस्थान विधानसभा निवडणुकीतही अभिजित सपकाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल मीडियाची बाजू भक्कमणे मांडली होती. 

अभिजित सपकाळ यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या नियोजन समितीत नियुक्ती केली आहे. “या नव्या जबाबदारीबद्दल पक्षप्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक व काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अभिजित सपकाळ यांनी आभार मानले व माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन’ असे ते म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी