हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी- खा.हेमंत पाटील-NNL


हिंगोली/नांदेड।
नैसर्गिक आपत्ती येते  तेंव्हा सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना त्याचा सामना करावा लागतो. मागील आठवडयात संततधार पावसाचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट , माहूर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसानीसह, गोठ्यातील जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तेंव्हा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकपाहणी करुन पंचनामे करण्यात वेळ न घालवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ आर्थिक मदत द्यावी असे खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश  दिले . 

खासदार हेमंत पाटील यांनी शनिवारी  ( ता . १६) हिंगोली लोकसभा मतदारसंघातील  किनवट, हिमायतनगर  तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतीची पाहणी केली व शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना धीर दिला. मागील एक आठवड्यपासून पडत असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचीच दाणादाण उडाली आहे. किनवट , तालुक्यातील अप्पारावपेठ, शिवनी, जलधारा  , झळकवाडी मलकजाम, यासह अनेक भागात नदीनाले याना आलेल्या पुरामुळे शेतीचे आणि नागरिकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. 

अनेक भागात पुरामुळे गावांचा संपर्क तुटला होता . मुसळधार झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा शेतीला बसल्याने  शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचे पूर्ण पीक गेले आहे पुरामुळे शेतीसुद्धा खरडून गेल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दुबार आणि तिबार पेरणी केल्यानंतर नुकत्याच उगवलेल्या सोयाबीन , कापूस, मूग, उडीद पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी जमीनच खरडून गेल्याने आता पेरायचे कुठे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

खासदार हेमंत पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला व घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासना कडून तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसानग्रस्त याभागातील शेती आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अर्थी मदत देण्यात यावी. आर्थिक मदत कामात दिरंगाई केल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी संबंधितांना दिला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख ज्योतीबा खराटे,तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे , माजी जि. प .सदस्य, सूर्यकांत आरंडकर, अब्दुल रब सरपंच, विनायकराव देशमुख, भुमेश किनी, भोजा रेडी, , तालुका संघटक मारोती दिवसे,माजी उपसभापती, गजानन कोल्हे,   दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड,सचिन पाटील, माधव बैलवाड, साई रुद्रावार, प्रमोद केंद्रे, तहसीलदार मृणाल जाधव़़ व तालूका कृषी अधिकारी बालाजी मुंडे  आदी उपस्थित होते .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी