नांदेड| स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मिशन कार्यक्रमा अंतर्गत विविध समाजोपयोगी व विकास कामे करण्याचे शासनाने सर्व शासकिय विभागांना आदेश दिले आहेत. त्याच अनुषंगाने गागलेगाव ता. बिलोली येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मिशन 75 कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था व सर्व सामान्य नागरिकांना सोबत घेवून जलसंधारणाची व पुनर्भरणाची कामामध्ये जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे यांच्या अधिपत्याखाली तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली.
सदरील कामाचे उद्घाटन तहसिलदार श्रिकांत निळे यांच्या हस्ते करण्यात आले. या गाळ काढण्याच्या कामाचे नियोजन ग्रामपंचाय कार्यालय गागलेगाव, गुरू जी फाउंडेशन गावातील जनतेच्या सहभागातून करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच राजेश्वर पाटील, ग्रामविकास अधिकारी सुनीलं पारडे, मंडळाधिकारी, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी सुनील पारडे यांनी जलसंधारण व जल पुनर्भरणाचे महत्व ग्रामस्थांना समजावून सांगितले.