नांदेड| गोवंश हत्या बंदी कायदा राज्यात लागू झाला असताना बऱ्याच प्रमाणात गोवंश तस्करी केली जाते त्याच बरोबर त्यांची हत्या केली जाते, ते रोखण्यासाठी विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकार्याना तसेच पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री कृष्णाजी देशमुख, जिल्हामंत्री शशिकांत पाटील, गणेश कोकुलवार, महेश देबडवार, प्रेमानंद शिंदे,गणेश यशवंतकर, कृष्णा इंगळे, गौरव वाळिंबे, आनंद बामलावा,बिरबल यादव, गणेश ठाकूर, विनायक मालपाणी, शंकरसिंह ठाकूर, राहुल ठाकूर, राहुल दारावार, आनंद मरेवार, नरेश पाथरकर कुलथे, आकाश कापकर, अक्षय भोयर, ओमसिंह परमार, अजय गोस्वामी, सचिन स्वराते आदी उपस्थित होते.