पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावावे - नाईक
किनवट(प्रतिनिधी)भविष्यात मानवी जिवन सुरक्षीत राहणे राहून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान आपल्या कुटुंबाच्या संख्येनुसार एक झाड लावुन त्याचे संवर्धन करावे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही, निसर्गाच्या भरवशावर शेती करणा-या शेतक-यांना पाण्याचे संकट कधी ओढवणार नाही. उत्तम आरोग्यासाठी मानवी जिवणाला लागणारे ऑक्सीजन हे वृक्षवेली देऊ शकते हे जाणून नाम फॉडेशनने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तो अभिनंदनिय असल्याचे प्रतिपादन आ.प्रदिप नाईक यांनी केले.
ते गुरुवार दि.07 रोजी नाम फॉउडेशन, भारत जोडो युवा अकादमी व साने गुरुजी रुग्णालय परीवाराच्या वतीने किनवट माहुर रस्त्यावरील बैलबाजार परीसरात वक्षारोपन व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाप्रसांगीं बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपन व संवर्धन उपक्रम राबविने काळाची गरज आहे. वृक्षारोपन करतांना जास्त ऑक्सीजन देणारी झाडे लावावी, तसेच आपल्या घराच्या अंगणात औषधी वनस्पती असलेल्या तुळशीचे झाड लावा असे आवाहनही त्यांनी केले. प्रसांगी मंचावर मा.आ.भिमराव केराम, प्रा.किशनराव किनवटकर, ता.कृ.अधिकारी संजय कायंदे, नगर परीषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, पो.नि. डॉ. अरुन जगताप यांची प्रमुख उपस्थितीती होती. प्रास्ताविक भाषणातुन बोलतांना डॉ.अशोक बेलखोडे म्हणाले कि, आज आम्ही शहरातील बैल बाजार मार्केट, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, स्मशानभुमी आदी ठीकाणी वृक्षारोपन करीत आहोत लवकरच किनवट शहरात उपलब्ध असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करुन शहराच्या सुंदरतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ट्रीगार्ड सह ५० झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमास रीपाईचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, माजी नगरध्यक्ष सुनिल पाटील, मा.नगरध्यक्ष के. मुर्ती, मा. नगरध्यक्ष अरुन आळणे, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग प्रभाकर नेम्मानिवार, उपाध्यक्ष अभय महाजन, नगरसेवक गजानन बोलचेट्टीवार, संजय सिरमनवार, प्रा.बेंबरेकर सर, कचरु जोशी, महेश चव्हाण तंबाखुवाला, ता.आरोग्य अधिकारी डॉ.टोंम्पे, सुनिल आयनेनीवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साने गुरुजी रुग्णालय परीवाराचे संजय बोलेनवार, नितीन टापरे, मनोज चनमनवार, संदिप चनमनवार, रजत अवसात, कुलदीप चव्हाण, अरविंद जाधव, केदार महाजन, कोंडे काकु यांनी तथा प्रा.सुनिल व्यवहारे, प्रा.आनंद भंडारे, प्रा.अंजुश राव , प्रा.वायाळ यांनी परीश्रम घेतले. तर उपस्थितांचे आभार नामचे तालुका समन्वयक गिरिष नेम्मानिवार यांनी मानले.