सिरंजनी येथे सिकलसेल आजार नियंत्रण दिन साजरा
हिमायतनगर(वार्ताहर)हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथे सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येउन आजाराबाबत जनजागरण करण्यात आले. सिकलसेल आजारावर नियंत्रण शक्य आहे परंतु तत्पूर्वी तपासणी अंती निदान होणे गरजेचे आहे. या आजारावर परिणामकारक औषधी उपलब्ध नाहीत. पणतू नियंत्रण करणे आपल्या हातात आहे. याची जाणीव जनतेला करून जनजागृती व्हावी या उद्देशाने सिरंजनी गावातून शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी श्री कैलास शेळके, एम.व्ही.चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नंतर जी.प.शाळेत गावातील ०१ ते ३० वयोगटातील रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातून सदर आजार असलेल्या रुग्णांची शोध मोहीम घेतल्या गेली. या गावात तपासणी करण्यात आलेल्या एकूण १५ संशयित (फ्लू बी.टी.यु पॉजीटिव्ह) रुग्णांच्या रक्ताचे दुषित नमुने आढळले असून, वरील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पैकी तीन रुग्ण वाहक होते,त्यांना शासकीय योजनांचा मोफत लाभ मिळून देण्यात येणार आहे अशी माहिती तालुका सिकलसेल सहाय्यक चव्हाण एस.एस. यांनी दिली. यावेळी ग्रामसेवक शंकर गर्दसवार, सरपंच, उपसरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.