बोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न

मार्च अखेर बोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न सुरु...चौकशीची मागणी

हिमायतनगर(अनिल मादसवार)हिमायतनगर तालुका अतिमागास तालुका म्हणुन सर्वदुर परिचीत आहे.या भागातील उत्तरेस अदिवासी बहुल भाग असल्याने 75 टक्के जनता अशीक्षीत आहे तर पुर्व, पश्‍चीम, दक्षीण भागातही आर्ध्याच्या वर अशीक्षीत लोकांची वस्ती आहे.या सर्व गावामध्ये शासनाच्या वतीने विविध योजनेच्या माध्यमातुन गाव विकास, लोकसहभागातुन करण्यात आलेल्या पाणीटंचाई विहीरी, तसेच मानव विकास मिशअंतर्गतचे करण्यात आलेले बंधारे, सिमेंट रस्ते, अंगणवाडी, किचन शेड, शाळाखोली बांधकाम आदींसह अनेक कामे पुर्ण झाल्याचे दाखऊन बोगस बिले काढली जात आहेत की काय? असा सवाल विकास प्रेमी जनतेतुन केला जात आहे. कारण सध्य स्थितीत पंचायत समीतीसह जिल्हा परीषद बांधकाम विभागातील अभीयंत्यांच्या मागे गुत्तेदार दिसत असुन, टक्केवारी घेऊन बोगस बीले काढली जाण्याची शक्यता वर्तवीली जात आहे. तेंव्हा अशा पध्दतीने काढन्यात येत असलेल्या बीलाच्या कामाची गुननियंत्रन मपक मशीनव्दारे चौकशी करुन खर्‍या अर्थाने पुर्ण झालेल्या कामाची बीले काढण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांतुन जोर धरत आहे.

हिमायतनगर तालुक्यात मानव विकास मिशनमधुन पाणी आडवा - पाणी जिरवा हा उद्दात हेतु ठेऊन तालुक्यात सिमेंट बंधारे,नाला सरळीकरण, अंगण्ावाडी इमारत, उपआरोग्य केंद्राची दुरुस्ती, जिल्हा परीषद अंतर्गत दलीत वस्तीतील सिमेंट रस्ते, नाली बंाधकांम, शाळा खोली बांधकाम आदिंसह अन्य कामे करण्यात आली. यामधील अनेक कामे हालक्या प्रतीचे करन्याच्या उद्देशाने लोकल कंपनीचे 32 ग्रेडचे सिमेंट, मातीमीश्रीत नाल्याची रेती,तसेच क्युरींगसाठी पाण्याचा कमी वापर यामुळे जवळपास 70 टक्के कामे निकृष्ट व हलक्या दर्जाची झाली आहेत. ही संबंधीत अभीयंता व गुत्तेदार, ग्रामसेवक, सरपंच यांनी संगनमत करुन बोगस पध्दतीने केली अहेत.त्यामुळे सध्य परिस्थीतीत यातील अनेक बंधारे फुटली, इमारतींना भेगा पडल्या, तर पावसच्या पाण्याने नाले पुन्हा भऱल्या गेल्याचे चित्र प्रथ्यक्ष कामावर दिसते. यावरुन संबंधीतांनी केलेल्या कामाचा दर्जा व निकृष्टपना स्पष्ट दिसुन येतो. तसेच काही गावातील स्वजलधारा योजनेच्या विहीरी, ग्रामसडक योजनेचा रस्ता, पांदण रस्ते आदिंसह इतर कामे पंचायत समीती अंतर्गत करण्यात आलेली सर्व कामाची वाट लाऊन अनेकांनी आपलीच तुबंडी भरण्याचा सपाटा लावला होता. हि सत्य परिस्थीती असतांना न झालेल्या कामाचीही बिले काढली जात असल्याचे अधिकार्‍यांच्या मागे फिरत असलेल्या पॉंढर्‍या कपड्यातील गुत्तेदाराच्या वृत्तीवरुन दिसुन येत आहे. तर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असलेली पंतप्रधान सडक योजनेची, आणि अदिवासी गावांना मुख्य रस्त्यावर जोडणारी रस्त्याची झालेली व सुरु असलेली कामे पुर्णताह बोगस झली असुन, महीन्यापुर्वीच्या केलेल्या कामावर मोठ - मोठे खे पडल्याचे दिसुन येत आहे.

काही अधिकारी पदाधीकारी तर आठवडी बाजाराच्या दिवशी सुध्दा आपल्या कार्यालयीन वेळेत खुर्चीवर न दिसता घरी बसुन मार्च अखेरची कामे पुर्ण करत असल्याचे विश्वसणीय वृत्त एक कर्मचा-यांनी नाव न छपन्याच्या अटिवर गोदतीरशी बांलतांना दिली आहे.तसेच शेतकर्‍यांच्या शेतमालाचा जाहीर लिलाव करुन बिट पध्दतीने मालांची खरेदी झाली नसल्यामुळे स्थानीक व्यापार्‍यानी शेतकर्‍यांची पिळवणुक करुन शेतीमाल मनमानी भावाने ख्ारेदी केला.परंतु या खरेदीवरील कर कृषी उत्पन्न बाजार समीतीने पुर्णपने वसुल केला की नाही..? याबाबत शंका व्यक्त होत आहे.मोठया व्यवहारातुन व्यापार्‍याकडुन आकारण्यात येणारी कर वसुली मोठ्या प्रमाणात झाली काय?याचा आढावा मार्च अखेर दाखवीण्यात यावा अशी मागणीही शेतकरी वर्गातुन जोर धरत आहे.तेंव्हा या वर्षी काढन्यात येत असलेली बीले व खर्चाचा आढावा कामाची योग्य ती चौकशी करुनच काढन्यात यावी.अशी मागणी विकास व लाभापासुन वंचीत असलेल्या लाभार्थी, शेतकरी व गावकर्‍यांमधुन समोर आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी