हदगाव/मनाठा| सततची नापीकी, स्वत:चे मुलीचे लग्नाची चिंता व बॅकेचे कर्जाचे टेंन्शन मध्ये कोणतेतरी विषारी औषध पिवून तांलग ता. हदगाव येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मौजे बरडशेवाळा ता. हदगाव जि.नांदेड येथे मयत शेतकरी अनिल दादाराव गाडे वय ४५ वर्षे, व्यवसाय शेती रा.तांलग ता. हदगाव जि. नांदेड, हा बॅकेचे कर्ज सततची नापीकी, स्वत:चे मुलीचे लग्नाची चिंता व बॅकेचे कर्जाचे टेंन्शनमध्ये होता. अतिवृष्टीने झालेलं नापिकी आणि डोक्यावर वाढलेल्या कर्जाच्या बोजा यामुळे दिनांक 31.03.2022 रोजीचे 22.00 वा.सुमारास, स्वत:चे शेतात कोणतेतरी विषारी औषध पिवून आत्महत्या केली.
हि घटना लक्षात येताच गणपत किशनराव गाडे वय 48 वर्षे व्यवसाय शेती रा. तांलग ता. हदगाव जि. नांदेड यांनी दिलेल्या खबरीवरुन मनाठा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, घटनेचा तपास पवार हे करीत आहेत.