नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार, अनेक ठिकाणचा संपर्क तुटला -NNL

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 29.2 मि.मी. पाऊस 


नांदेड|
आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाळा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते, शेती, नाले जलमय झाले असून, नांदेड -किनवट मार्गावरील पुलाच्या अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी तासंतास मार्ग बंद पडला आहे. त्यामुले नागरिकांना लांब पाल्याच्या रस्त्याने आपले ठिकाण गाठावे लागले आहे. जिल्ह्यात बुधवार 21 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 29.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात एकुण 268.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

जिल्ह्यात बुधवार 21 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 27.8 (297.3), बिलोली- 25.8 (317.8), मुखेड- 30.2 (261.0), कंधार- 29.5 (255.5), लोहा- 25.9 (278.3), हदगाव-28.2 (223.8), भोकर- 51.7 (267.5), देगलूर- 39.0 (250.0), किनवट- 28.8 (274.2), मुदखेड- 29.5 (323.2), हिमायतनगर-30.0 (190.6), माहूर- 18.7 (211.8), धर्माबाद- 17.3 (280.3), उमरी- 19.4 (322.6), अर्धापूर- 36.4 (327.8), नायगाव- 25.6 (269.8) मिलीमीटर आहे. 

आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने बळीराजा सुखावला असला तरी अजूनही काही भागात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने, गावतलाव कोरडेच आहेत. विंधन विहिरीला सुद्धा पाणी आले नसून, अनेक विहिरी टाळला आहेत. पावसाळा सुरुवात झाली मात्र अजूनही जमिनीला खडा फुटला नाही,  वाढती उष्णता पाहता पावसाची संततधार आणि मोठा पाऊस झाल्याशिवाय गावतलाव, नदी, नाले, विहिरी व बोअरमध्ये पाणी जमा होणार नाही असे जुने जाणकार सांगत आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी