तलाठ्यांचा दुष्काळी याद्यात घोळ....

आन्देगाव सज्जाच्या तलाठ्याने बागायती क्षेत्र जिरायती दाखविले

हिमायतनगर(वार्ताहर)दुष्काळाने सर्व पिके हातची गमावलेल्या शेतकर्यांना शासनाने मदतीचा हात पुढे केला असला तरी, तलाठ्यांच्या मनमानी कारभाराने मात्र शेतकऱ्यांच्या आपेक्षेवर पाणी फेरले असून, महिना महिना गावाकडे न फिरकणाऱ्या तलाठ्यांनी बागायती क्षेत्राऐवजी जिरायती क्षेत्र दाखविल्याने अनेक नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांचे तलाठ्यांच्या मनमानीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यातच आन्देगाव सज्जाचे तलाठी मनोज देवने यांनी दुष्काळ ग्रस्त क्षेत्राची पाहणी न करता सरसकट बागायती क्षेत्र जिरायत क्षेत्र दाखविल्याने अनेक शेतकर्यांनी दवानेच्या मनमानी कारभार विषयी संताप व्यक्त केला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या गहरी संकटात सापडला असताना  शासनाने शेतकर्यांना भरघोस मदत करण्याची अपेक्षा शेतकऱ्याकडून केली जात होती. शासनाने मदतीचा हात पुढे करत मदत जाहीर केली, बागायती आणि जिरायती क्षेत्रासाठी वेगवेगळी मदत देवू करून दिलासा दिला. यात बागायती क्षेत्रातील उस, केली, हळद आदि पिके लागवडी खालील हिम्यात्नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात असताना येथील तलाठ्यांनी मात्र असे बागायती क्षेत्रा कोरडवाहू दाखविले असल्याने अनेक बागायतदार शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिला आहे. आन्देगाव सज्जा अंतर्गत आन्देगाव, टेंभी, पार्डी आदी गावात बागायती क्षेत्रा बर्यापैकी असतानाही तलाठी मनोज देवने यांनी जयमोक्यावर न जात हिमायतनगर स्थित असलेल्या तलाठी कार्यालयात बसून, दुष्काळ चित्राच्या याद्या बनविल्या आहेत. परिणामी बागायतदार शेतकरी पाण्याखालील पिके दुष्काळात गमावूनही शासनच्या मदतीपासून वंचित राहिला आहे. देवानेच्या या प्रतापाचा अनेक बागायतदार शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

तलाठी सज्ज्याचे कार्यालय हिमायतनगरलाच
-----------------
हिमायतनगर तालुक्यातील अनेक तलाठी हे नांदेड, भोकर, किनवट आदी ठिकाणाहून ये - जा करीत असल्याने नेमून दिलेल्या सज्ज्यातील गावाकडे जाण्या ऐवजी रेल्वेने हिमायतनगर येथेच उतरून शहरात उघडलेल्या भाड्याच्या रुममध्ये कार्यालय थाटून गावांचे सर्वे आणि अन्य कामकाज येथे बसूनच करत असल्याने याचा फटका शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. तलाठ्यांच्या या मनमानी कारभाराकडे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी लक्ष देवून हिमायतनगर शहरात थाटलेले अनेक तलाठी साज्जाची कार्यालये मूळ सज्जावर स्थापण्याविषयीची कार्यवाही करावी. आणि हिमायतनगर शहरातील तलाठ्यांची कार्यालये बंद करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. तसेच शेतकर्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवल्या प्रकरणी त्या त्या  तलाठ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा अशी रास्त अपेक्षा शेतकर्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना व्यक्त केली आहे.     

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी