छावा संघटनेच्या वतीने राञीचे भारनियमन बंद करण्याची मागणी -NNL


नायगाव, दिगंबर मुदखेडे|
नायगाव महावितरणचा मनमानी कारभार नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात राञीचे भारनियमन होत असून त्याची कोणतीच निश्चित वेळ नाही. याचा सर्वसामान्यांना त्रास होत असून रात्रीबेरात्री होणारे हे भारनियमन थांबविण्याची मागणी सहाय्यक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहर व ग्रामीण भागात रात्री-बेरात्री भारनियमन करण्यात येत आहे. याबाबत संबंधित कार्यालयात विचारणा केली असता केवळ वरिष्ठांचे आदेश आहेत, एवढेच उत्तर मिळत आहे. मात्र या भारनियमनामुळे उकाड्याचा प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. वृद्ध नागरिक व लहान मुलांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेण्यासाठी चोरटेही सक्रिय झाले आहेत. गुन्हेगारीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढण्याची भीती आहे.राञीचे भारनियमामुळे त्रास होत असल्यामुळे ग्रामीण भागातील लहान मुलं व वृद्ध हे घरासमोरच्या पटांगणात झोपतात वन्यप्राणी साप विंचू हे रात्रीच्या वेळेस बाहेर निघतात.

रात्रीचा फायदा घेत चावा घेण्याची शक्यता आहे याकडे मात्र गावकरी कुठल्याच प्रकारचा विचार न करता उकाड्यामुळे पटांगणात झोपतात यामुळे साप विंचू चावा घेण्याची दाट शक्यता आहे. ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली असून अधिकाऱ्यांनी मात्र आमच्या हातात काही नाही. वरिष्ठ टाकून आम्हाला जसा निरोप येतो तसं करणं भाग असतं असे उत्तर देण्यात आले रात्रीच्या लोड सेटिंग मुळे सर्वात जास्त लहान मुलांना त्रास होत आहे. 


हा प्रकार त्वरित न थांबविल्यास छावा संघटनेच्या वतीने कार्यालयात समोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे दिनांक 21 एप्रिल रोजी लेखी निवेदन देण्यात आले असून उपस्थित छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रतापराव पा सोमठाणकर, तालुका संपर्कप्रमुख साई पा मोरे, बालाजी पा बेद्रे, छत्रपती पा मोरे, सतीश पा वाडे, सुरज पा मोरे, लक्ष्मण पा मोरे, संघटनेचे पदाधिकारी व गावकरी यांनी सहाय्यक अभियंता कार्यालय नायगाव येथे निवेदन देण्यात आले

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी