पिक - कर्जासाठी स्वातंत्र्यदिनी तहसील
कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे उपोषण सुरु
हिमायतनगर(अनिल मादसवार) सततची नापिकी व यंदा ओढवलेल्या कोरड्या दुष्काळात सापडलेला शेतकरी आता बैन्केकडून पिक कर्ज मिळत नसल्याने हवालदिल झाल आहे. बैन्कांच्या नाकर्तेपणाला कंटाळून स्वातंत्र्य दिनी पीककर्ज मिळावे या मागणीसाठी शेतकर्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरु केली आहे.
तालुक्यातील मौजे कामारी, कांडली बु, वाघी, विरसनी, टेंभूर्णी, कामारवाडी, खैरगाव, दिघी, रावणगाव, लिंगापूर, धोतरा, पारवा बु, पारवा खु, पोटा बु, आदि गावातील रहिवाशी शेतकर्यांनी मौजे कामारी येथील महाराष्ट्र ग्रामीण बैन्केच्या शाखेत पिक कर्जासाठी वारंवार मागणी करूनही बैन्कांच्या अडेलतटू धोरणामुळे शेतकर्यांना पिककर्ज देण्यात येत नसल्याने कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्या ऐवजी बैंक अधिकारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केल्या जात आहे.
अगोदरच दुबार, तिबार पेरणी करून सर्वस्व गमावलेल्या बळीराजास शासनाने मदतीचा हात पुढे करत पिक कर्ज देण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु वरिष्ठांचे आदेश नसल्याचे बैंक अधिकारी सांगत असल्यामुळे नाईलाजास्तव शेतकर्यांना स्वातंत्र्य दिनीच आपल्या अधिकारासाठी आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. आजच्या पहिल्या दिवशी बहुतांश शेतकरी या उपोषणात सामील झाले असून, मागण्यामान्य न झाल्यास उद्यापासून सर्वच गावातील शेतकरी सामील होणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.