tag:blogger.com,1999:blog-37076322478605683802024-02-26T23:05:41.986+05:30nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी"Nanded News" marathi, Breaking News, Crime, Politics, nanded district & maharashtra, national-international news, photos & videosनृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.comBlogger10231125tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-83020327125898926962023-07-01T18:29:00.002+05:302023-07-01T18:29:22.965+05:30वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे तसेच प्रदूषण दूर करून पर्यावरणाचे जतन करणे गरजेचे -NNL<p><span style="font-size: medium;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj0XI37YIH1zWrw3tWGiiamwzM1TZWUKqrpy3AdlYy3tc2ExTz3p3o1fS6nnX7UfvhnF3HnI7RLOVc1cmr0RJxuaPPXoZ5j90r6SXaKer4YVtjfAto5VNZdLPWXamT1LTp_l_-bH7HjVqGY1MiHZo33kQeohN4P5KLN_rzX2s5rn9KBfVksTD0BIreNDdw/s1280/IMG-20230701-WA0048.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="894" data-original-width="1280" height="448" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj0XI37YIH1zWrw3tWGiiamwzM1TZWUKqrpy3AdlYy3tc2ExTz3p3o1fS6nnX7UfvhnF3HnI7RLOVc1cmr0RJxuaPPXoZ5j90r6SXaKer4YVtjfAto5VNZdLPWXamT1LTp_l_-bH7HjVqGY1MiHZo33kQeohN4P5KLN_rzX2s5rn9KBfVksTD0BIreNDdw/w640-h448/IMG-20230701-WA0048.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-size: medium;"><b><br />नांदेड। </b>वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे तसेच प्रदूषण दूर करून पर्यावरणाचे जतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेड-वाघाळा महापालिकेचे उपायुक्त निलेश सुंकेवार यांनी केले. </span><p></p><p><span style="font-size: medium;">नांदेड येथील परिसर अभियांत्रिकी गृहनिर्माण सोसायटी विकास नगर तरोडा बु येथे आज शनिवार दिनांक 1 जुलै रोजघ कृषी दिन व डॉक्टर डे तसेच सोसायटचेचेअरमन व नवोदया क्रिटिकल केअर नांदेडचे डॉ. श्याम दवणे यांच्या कन्या समीक्षा हीच्या वाढिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.</span></p><p><span style="font-size: medium;">यावेळी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पोलीस निरीक्षक बोलमवाड, पोलीस निरीक्षक अशोक उजगिरे, महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त रावण सोनसळे, उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरतुल्ला बेग, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, लोकमत सखी मंचच्या सपना भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती वाठोरे, हृदयरोग तज्ञ डॉ. पटेल, बालरोग तज्ञ डॉ. राजेश नुणे, किडनी रोग तज्ञ डॉ. राजीव राठोड, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. वीरेंद्र अवधिया, आधारचे डॉ. तानाजी पातरपळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येपुरवार, डॉ. देवकते, डॉ. जायभाये, डॉ. शाम दवणे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे आदींची उपस्थिती होती.</span></p><p><span style="font-size: medium;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQdYBU06DXfkuhO_oHI3YnqH6lxvVwy40ct507U22JfPe3hcPU6RBLA6J7t7mM3aL--AwDmLA8N3QpocpYo6Jp6f7wAE1LadyDekkzET6d_w7llEUbdPeI_vWSqGXQ1ni42pevwedZgc2preH_Bg769mqmPjydiwa1uKdBqMZ--t2XD2tTY8iUloMfNgY/s1600/IMG-20230701-WA0049.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1016" data-original-width="1600" height="406" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQdYBU06DXfkuhO_oHI3YnqH6lxvVwy40ct507U22JfPe3hcPU6RBLA6J7t7mM3aL--AwDmLA8N3QpocpYo6Jp6f7wAE1LadyDekkzET6d_w7llEUbdPeI_vWSqGXQ1ni42pevwedZgc2preH_Bg769mqmPjydiwa1uKdBqMZ--t2XD2tTY8iUloMfNgY/w640-h406/IMG-20230701-WA0049.jpg" width="640" /></a></span></div><span style="font-size: medium;"><br />प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचा गुलाबाची रोपटे देवून सत्कार करण्यात आला. समीक्षा दवणेच्या उपस्थीतांच्या हस्ते पुष्पहार घालून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर पाहुण्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन परमेश्वर दिपके यांनी तर उपस्थितांचे आभार गंगाधर सोनाळे यांनी मानले. यावेळी पांडुरंग तारू, मनोहर भास्करे, सोपान गायकवाड, मीनाक्षी कावळे, शामराव हटकर, अशोक कावळे यांच्यासह विकास नगर सोसायटीचे सदस्य व परिसरातील नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.</span><p></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-69216171008552902472023-07-01T18:24:00.003+05:302023-07-01T18:24:46.336+05:30हु. ज.पा.महाविद्यालयात हरितक्रांतीचे जनक श्री. वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी -NNL<p><span style="font-size: medium;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAKZWqrW47eMtiN1fyG7ikk2lCT25xVzpp8Nx6aRE2gr8W5qbCpkhF_tTJ7MVvXug091PJ4FkFutsbLOieO_OkC7X0n64PLZy2g2EzoVuoEp12hBuXrASETDWAPQsdjuQjdFYTqaYR3k7zwOjxftF7f-gujO4vq3Vb2xMjRL5HceJkjyZniyS-oY2LRk8/s1156/IMG-20230701-WA0029.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="868" data-original-width="1156" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgAKZWqrW47eMtiN1fyG7ikk2lCT25xVzpp8Nx6aRE2gr8W5qbCpkhF_tTJ7MVvXug091PJ4FkFutsbLOieO_OkC7X0n64PLZy2g2EzoVuoEp12hBuXrASETDWAPQsdjuQjdFYTqaYR3k7zwOjxftF7f-gujO4vq3Vb2xMjRL5HceJkjyZniyS-oY2LRk8/w640-h480/IMG-20230701-WA0029.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-size: medium;"><b><br />हिमायतनगर। </b>आज दि.१जुलै२०२३ रोजी हुतात्मा जयवंतराव पाटील, महाविद्यालय हिमायतनगर येथे हरित क्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. वसंतरावजी नाईक यांची जयंती सांस्कृतिक विभागातर्फे थाटामाटात साजरी करण्यात आली. </span><p></p><p><span style="font-size: medium;">या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. उज्वला सदावर्ते होत्या तर प्रमुख उपस्थिती डॉ.डी.के.कदम(स्टाफ सेक्रेटरी),डॉ. वसंत कदम(इतिहास वि.प्रमुख), डॉ.डी.के मगर(अर्थशास्त्र वि.प्रमुख),डॉ. शाम इंगळे (वनस्पतीशास्त्र वि.प्रमुख),डॉ. गजानन दगडे (नॅक समन्वयक)यांची होती. </span></p><p><span style="font-size: medium;">कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉक्टर उज्वला सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे जनक श्री. वसंतरावजी नाईक यांच्या कार्याची आठवण, त्यांचा संघर्ष, शेतकऱ्यांविषयीची तळमळ,शेतीसाठी केलेले कार्य,जनसामान्य जनतेसाठी राबविलेल्या योजना सांगून, त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले. </span></p><p><span style="font-size: medium;">डॉक्टर डि.के कदम यांनी श्री. वसंतरावजी नाईक यांनी केलेले कृषी कार्य सांगून,शिक्षणाचा व कृषीचा अनोखा संबंध जोडून, कृषी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना शेतीचे शिक्षण प्रदान केल्याचे सांगून आपला कृषी प्रदान देश आर्थिक दृष्ट्या कसा संपन्न, समृद्ध केला ते सांगून, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेतीकडे वळायला प्रोत्साहन दिले. </span></p><p><span style="font-size: medium;">कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सविता बोंढारे यांनी केले तर आभार सांस्कृतिक वि. सहाय्यक प्रा. आशिष दिवडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-863203580902187362023-07-01T11:21:00.005+05:302023-07-01T11:23:57.467+05:30अमरनाथ गुहेतून भाग -१ ( लेखक: धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर ) -NNL<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhkfkCFGNEpHELg7R8k1-O5r-U5lyeK0cqa2lcYhBrVuQ2gNfWhf2xWfDJ0I7AKDy-XFLGZ200AftPqH3fBBzsid-1KXwLgAYjQzwwMODSmjpvLj-WN0ymHrgO8lMYieATlOMa9bl_YnOU7LGbtaRSql9dAGZopqzd1d7FTa8aJZEbjw198vj0-H8z3Rgo/s1080/IMG-20230630-WA0026.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: medium;"><img border="0" data-original-height="431" data-original-width="1080" height="256" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhkfkCFGNEpHELg7R8k1-O5r-U5lyeK0cqa2lcYhBrVuQ2gNfWhf2xWfDJ0I7AKDy-XFLGZ200AftPqH3fBBzsid-1KXwLgAYjQzwwMODSmjpvLj-WN0ymHrgO8lMYieATlOMa9bl_YnOU7LGbtaRSql9dAGZopqzd1d7FTa8aJZEbjw198vj0-H8z3Rgo/w640-h256/IMG-20230630-WA0026.jpg" width="640" /></span></a></div><span style="font-size: medium;"><br />नमस्कार, आपल्या सर्वाना माहित आहे की, अमरनाथ यात्रा सर्व यात्रामधे सर्वात कठीण मानली जाते. बहुतांश लोकांना आपल्या सम्पूर्ण आयुष्यात एक वेळेस देखील अमरनाथचे दर्शन करणे अवघड असते.परंतु बाबा बर्फानी चा माझ्यावर विशेष आशीर्वाद आहे असे मी मानतो. याची यावेळी मला प्रचिती देखील आली आहे.गेल्या २० वर्षापासून अखंड सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेला या वर्षी खंड पडतो की काय याची भीती वाटत होती. कारण ही तसेच होते, मला २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरुद्ध केलेल्या महागाई विरोधातील एका आंदोलनात झालेली ५ वर्षाची शिक्षा. </span><div><span style="font-size: medium;"><br /></span></div><div><span style="font-size: medium;">परंतु पंढरीच्या वारी प्रमाणे भक्ती भावाने अमरनाथला दरवर्षी जात असल्यामुळे परमेश्वर काही तरी वेगळा मार्ग नक्कीच काढेल असा दृढ विश्वास होता आणि अवघ्या आठच दिवसात हायकोर्टातून जामीन मिळाली. पण याच कालावधीत अमरनाथ चे रजिस्ट्रेशन देखील सुरु झालेले होते. त्यामुळे प्रचंड धावपळ करावी लागली. प्रत्येक इच्छुकांना पंजाब नॅशनल बँकेत जाऊन बायोमेट्रिक नोंदणी करणे या वर्षी पासून सक्तीचे केल्यामुळे फक्त ७१ यात्रेकरूंना नियोजित तारीख मिळू शकली. त्यामुळे दरवर्षीचा १०५ यात्रेकरुंचा आकडा काही गाठता आला नाही याची थोड़ी खंत मनात राहिली. परंतु परमेश्वरच्या मर्जी पुढे आपले काय चालणार. आणखी बरेच जणांचा येण्यासाठी आग्रह असल्यामुळे दुसऱ्या जथ्याची घोषणा केली. ७० चा कोटा हा हा म्हणता संपल्या मुळे अनेकांची निराशा झाली. त्यांना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये संपर्क करण्याच्या सूचना दिल्या.</span><p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6952mW-ifsIVhbCPtB-ZL9PlusTS64UJ-UxavlTPv6v3G6ToInzekQjQKslg_dOQ6Qv0bPX45K7xoCLJvpVi3I5pcTTw7wANUlZmqjRhLDW1s28CGIfd-bRaSftbcZBCjGGC7CEHnrqn-T778au1PE-bGgQZxCtdUjlteOST3RYs79lvbL6yuinA42K4/s1600/IMG-20230701-WA0013.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: medium;"><br /><img border="0" data-original-height="719" data-original-width="1600" height="288" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6952mW-ifsIVhbCPtB-ZL9PlusTS64UJ-UxavlTPv6v3G6ToInzekQjQKslg_dOQ6Qv0bPX45K7xoCLJvpVi3I5pcTTw7wANUlZmqjRhLDW1s28CGIfd-bRaSftbcZBCjGGC7CEHnrqn-T778au1PE-bGgQZxCtdUjlteOST3RYs79lvbL6yuinA42K4/w640-h288/IMG-20230701-WA0013.jpg" width="640" /></span></a></div><span style="font-size: medium;"><br />यात्रा पर्ची हातात आल्यानंतर मग खरे नियोजन सुरु होते. प्रत्येकाला कन्फर्म रेल्वे तिकीट मिळालेच पाहिजे पण ते देखील शक्यतो एक दुसऱ्या कोच मध्ये.जातांना नांदेड ते जम्मू हमसफर एक्सप्रेस, येतांना अमृतसर दिल्ली शताब्दी आणि नंतर दिल्ली ते नांदेड गंगानगर एक्सप्रेस ची तिकिटे कन्फर्म मिळाली. मुक्कामाच्या ठिकाणचे हॉटेल बुकिंग तसेच रेल्वे प्रवास संपल्यानंतर आगेकूच करण्यासाठी दोन बसेस बुक केल्या. गेल्या 20 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवामुळे हे कठीण नियोजन मी खात्रीपुर्वक करून घेतले. याच सुनियोजित स्वभावामुळे 20 वर्षाच्या या अखंड यात्रे मधे आज पर्यन्त कुणाचीच ग़ैरसोय झालेली नाही. बुकिंग पूर्ण होताच जाण्याच्या २ महिने आधीपासून श्रीराम सेतु गोवर्धन घाट येथे चालण्याचा आम्ही सर्वानी सराव आम्ही सुरू केला. दररोज सहा किलोमीटर पायी चालणे व त्यानंतर १५ मिनिटाचे प्राणायाम यामुळे अमरनाथ यात्रेसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सर्वजण सक्षम झाले. रत्नेश्वरी पाऊस दिंडीमध्ये शारीरिक दृष्ट्या कोन कितने पानी मे है याचा प्रत्येकाला प्रत्यय आला आणि एक छोटीसी यात्रेची रंगीत तालीम देखील झाली. अमरनाथ चे रजिस्ट्रेशन केलेल्या प्रत्येकाचा १ लाखाचा विमा केंद्र सरकार तर्फे काढण्यात येतो. परंतु तो फक्त दर्शन मार्गापुरता मर्यादित असल्यामुळे आम्ही वेगळा ट्रॅव्हल इन्शुरन्स काढतो.</span><p></p><p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitUHlMQbf6qsmn6ahRb-OsPsqrCLiGuBilMqKxtUhvcAkJpgPQoPSaLQabLoaovwYLwVArKeFz7SZMZooZQtJ4t9zs2hCANSJYyO6dYvJeYonfnb_VIu8SzXeWyGNuLtQSieysBJ3ch7U99Sp6Q6wzdDbDwOTykRyi-anHvvXIo61dsxc8P-mI3iGk1s0/s1160/IMG-20230701-WA0015.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: medium;"><img border="0" data-original-height="522" data-original-width="1160" height="288" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitUHlMQbf6qsmn6ahRb-OsPsqrCLiGuBilMqKxtUhvcAkJpgPQoPSaLQabLoaovwYLwVArKeFz7SZMZooZQtJ4t9zs2hCANSJYyO6dYvJeYonfnb_VIu8SzXeWyGNuLtQSieysBJ3ch7U99Sp6Q6wzdDbDwOTykRyi-anHvvXIo61dsxc8P-mI3iGk1s0/w640-h288/IMG-20230701-WA0015.jpg" width="640" /></span></a></div><span style="font-size: medium;"><br />अमरनाथ यात्रेत जागोजागी भोजनाचे लंगर असतात. ज्या ठिकाणी लंगर नसतात तिथे गेल्या २० वर्षा पासून माझे अनेक मित्र, हितचिंतक तसेच जुने अमरनाथ यात्री जेवण देतात. सहसा यात्रेकरूंना जेवण विकत घेण्याची वेळ येत नाही. अमरनाथ यात्रा ही ना नफा ना तोटा या तत्त्वावर आयोजित करत असल्यामुळे इतर यात्रेत असणारी आमची केटरिंग टीम सोबत नसते. अन्नदान करण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर,सतीश सुगनचंदजी शर्मा,डॉ. अजयसिंह ठाकूर ,नवनाथ सोनवणे उदगीर,नागेश शेट्टी, प्रतिमा राजेंद्र चौधरी, मनोज शर्मा नागपूर,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,ज्ञानोबा जोगदंड,सरदार कुलदीपसिंघ,ओमप्रकाश पाम्पटवार,सरदार जागीरसिंघ,सरदार प्रताप फौजदार,अशोक जायस्वाल ,स्नेहलता जायसवाल ,शेंदूरवाडकर व रावके,प्रदीप शुक्ला, अरुण लाठकर, महेश जायस्वाल, शशिकांत कुलकर्णी यांनी तयारी दर्शवली. त्यामुळे माझे बरेच काम हलके झाले. सदानंद मेडेवार यांच्या पुढाकारामुळे नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिष्ट्र असोशियन तर्फे मोफत औषधी मिळाल्या.</span><p></p><p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtPSa1kCsejNVF72IvdA0OPuhViYXs5t-_ZSWod3bPQMVUkTTLFH9gdQuYU3yN4-aBNcpX_VSImVDPb500CTaYqVrFVJX5zNjdBMcI6Nbv_a2Emu7aLvo1Wc5gKrgEumBtKyY65pfQ_eNlh0dtY7wVIgHPGrUWM6zZlVcuR00XpHAzuBbHYL5E1JruEi4/s1280/IMG-20230701-WA0014.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: medium;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="1280" height="360" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtPSa1kCsejNVF72IvdA0OPuhViYXs5t-_ZSWod3bPQMVUkTTLFH9gdQuYU3yN4-aBNcpX_VSImVDPb500CTaYqVrFVJX5zNjdBMcI6Nbv_a2Emu7aLvo1Wc5gKrgEumBtKyY65pfQ_eNlh0dtY7wVIgHPGrUWM6zZlVcuR00XpHAzuBbHYL5E1JruEi4/w640-h360/IMG-20230701-WA0014.jpg" width="640" /></span></a></div><span style="font-size: medium;"><br />ग्रुपमधील सदस्य त्वरित ओळखू यावे यासाठी अमरनाथ यात्री संघातर्फे सर्वांना टी-शर्ट, रेनकोट व कॅप देण्यात येते. दरवर्षीचा रंग वेगवेगळा ठेवत असल्यामुळे आतापर्यंत वीस रंगाचा वापर झाला. नवीन कोणताच रंग न आढल्यामुळे काळ्या रंगाचे टी-शर्ट व रेनकोट छापून घेतले. रत्नेश्वरीच्या गेट टुगेदर मध्ये त्याचे वाटप केले.</span><p></p><p><span style="font-size: medium;">यात्रेचा दिवस जसा जसा जवळ येत तसा प्रत्येकाच्या मनात उत्साह दिसून येतो होता.प्रत्यक्ष यात्रेला जाण्याच्या एक दिवस आधी सर्व तयारीचा पुन्हा एकदा आढावा घेतला. एकेक तिकीट तसेच आय कार्ड व यात्रा पर्ची,ट्रॅव्हल इन्शुरन्स सर्व काही व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करतांना रात्रीचे २ वाजले होते. सम्पूर्ण अमरनाथ यात्रेचे प्रत्येक दिवशीचे सुमधुर वर्णन दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आपण सर्वानी वाचावे अशी मी माझ्या सर्व वाचक वर्गाला विनंती करतो.</span></p><p><b><span style="font-size: medium;">लेखक: धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर ( क्रमशः )</span></b></p></div>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-75725341993302345782023-07-01T09:57:00.000+05:302023-07-01T09:57:06.813+05:30 परभणी, परळी मार्गे पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी -NNL<p><span style="font-size: medium;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgSY92xONisCmVy57e4Ssp-EoEkuhVWsZqlBxULr7e9Tk15KYgtn9AutS6k9Nbqr4m7yD_dBnDDE4mRlO4aREFg3zIPsLk5aH-J7Q3q7olSu73fzfZ2RTEaNgU7AxYKQo9EsbMI7Qbc6yPmvfH_zDylmL0o4og7XEP-a4vBGC_JcTMYCwSksoavhNBaZd8/s800/relve2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="533" data-original-width="800" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgSY92xONisCmVy57e4Ssp-EoEkuhVWsZqlBxULr7e9Tk15KYgtn9AutS6k9Nbqr4m7yD_dBnDDE4mRlO4aREFg3zIPsLk5aH-J7Q3q7olSu73fzfZ2RTEaNgU7AxYKQo9EsbMI7Qbc6yPmvfH_zDylmL0o4og7XEP-a4vBGC_JcTMYCwSksoavhNBaZd8/w640-h426/relve2.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-size: medium;"><b><br />नांदेड| </b>मराठवाड्यातून तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. ते पुढील प्रमाणे असून, याचा लाभ सर्व भाविक भक्तां व्हावा हा उद्देश आहे.</span><p></p><p><span style="font-size: medium;">गाडी क्रमांक 07609 पूर्णा-तिरुपती विशेष गाडी:- ही विशेष गाडी पूर्णा येथून दिनांक 03 जुलै ते 28 ऑगस्ट, 2023 दरम्यान दर सोमवारी सकाळी 10.25 वाजता सुटेल आणि परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, बिदर, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, पगीडीपल्ली, नालगोंडा, मिर्याल्गुदा, नदीकुडे, सत्तेनापल्ली, गुंटूर, तेनाली, बापटला, चिरला, ओंगोल, कावली, नेल्लोर, गुडूर, रेणीगुंठा मार्गे तिरुपती येथे मंगळवारी सकाळी 10.45 वाजता पोहोचेल. </span></p><p><span style="font-size: medium;">गाडी क्रमांक 07610 तिरुपती-पूर्णा विशेष गाडी:- ही विशेष गाडी तिरुपती येथून दिनांक 04 जुलै ते 29 ऑगस्ट, 2023 दरम्यान दर मंगळवारी दुपारी 15.10 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच पूर्णा येथे बुधवारी दुपारी 14.30 वाजता पोहोचेल. या गाडीत स्लीपर, जनरल, वातानुकुलीत तृतीय श्रेणी, वातानुकुलीत द्वितीय श्रेणी असे एकूण 18 डब्बे असतील. </span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-24309526640640767012023-07-01T09:51:00.002+05:302023-07-01T09:51:28.953+05:30कारागृहला संस्कार परिवर्तन केंद्र बनवा - भगवान भाई -NNL<p><span style="font-size: medium;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBRK4ovyQ71RmjmoP7XhVnmFs1cQvwSGJ0m9D5xDKoDfKntoJT-zHS66dUxbjVWhGLxs9zlh_zS8GaU00W3FPlUnXw0PFlsuk3RWvZucNUdNTA9oqArpJNyL3jfMy8_RGWBouNWsbIzG_2jzXvt0e8cTNBfwSLW6PTPI6gGHU9MVfuct5bFOzW64GmOMY/s1280/2.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="576" data-original-width="1280" height="288" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBRK4ovyQ71RmjmoP7XhVnmFs1cQvwSGJ0m9D5xDKoDfKntoJT-zHS66dUxbjVWhGLxs9zlh_zS8GaU00W3FPlUnXw0PFlsuk3RWvZucNUdNTA9oqArpJNyL3jfMy8_RGWBouNWsbIzG_2jzXvt0e8cTNBfwSLW6PTPI6gGHU9MVfuct5bFOzW64GmOMY/w640-h288/2.jpeg" width="640" /></a></b></span></div><span style="font-size: medium;"><b><br />नांदेड| </b>कारागृह नाही तर जीवन सुधारगृह आहे. कारागृहात तुम्ही जीवनात सुधारणा होण्यासाठी आहात शिक्षा भोगण्यासाठी नाही. कारागृहला संस्कार परिवर्तनाचा केंद्र बनवा. यामध्ये एक दुसऱ्याचा बदला घेण्यासाठी नाही तर स्वतः मध्ये बदल घडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे उद्गार माउंट आबू राजस्थान प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय (मधुबन) येथून आलेले ब्रह्मकुमार भगवान भाई यांनी सांगितले. ते नांदेड जिल्हा कारागृहात (जेल) बंदिस्त असलेल्या कैदी ना कर्माची गति आणि व्यवहार शुद्धि या विषयावर बोलत होते.</span><p></p><p><span style="font-size: medium;">यावेळी त्यांनी सांगितले कि, कारागृहात एकांतांत बसून स्वतः मध्ये बदल घडून आणण्यासाठी विचार करा कि मी या संसारात का आलो आहे? माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? मला ईश्वराने कोणत्या उद्देशाने या सृष्टीमध्ये पाठविले आहे? मी येथे काय करीत आहे? अशा बाबतीत विचार करून चांगले विचार आत्मसात केल्याने संस्कार, व्यवहार मध्ये बदल घडून येतो. कारागृह तुमच्या जीवनात सुधार आणण्याची तपोभूमी आहे असे सांगितले.</span></p><p><span style="font-size: medium;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgSD4R6p5Zer3UcqZi96uFXlRscfEQMsmNQVIIcOZp0tQ1FYBzi2vGDJ-zJEl0l7gByW0FvXS1WKomqrTbF8V25ncJbI6L3PdfRvC1xD2hJH7MFj8K9uWtFl8_W2dg6sJ_Zb5YULqfpDwpDbK3c8EnWnsfWbFc4ms7ozjg0t_tys6iL9ofJiXGiHZDZDRc/s1600/4.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="1600" height="288" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgSD4R6p5Zer3UcqZi96uFXlRscfEQMsmNQVIIcOZp0tQ1FYBzi2vGDJ-zJEl0l7gByW0FvXS1WKomqrTbF8V25ncJbI6L3PdfRvC1xD2hJH7MFj8K9uWtFl8_W2dg6sJ_Zb5YULqfpDwpDbK3c8EnWnsfWbFc4ms7ozjg0t_tys6iL9ofJiXGiHZDZDRc/w640-h288/4.jpeg" width="640" /></a></span></div><span style="font-size: medium;"><br />आपण शांती चे सागर, दयालू, कृपालू, क्षमाचे सागर परमपिता परमआत्मा चे लेकरे आहोत. आपण स्वतः ला विसरल्यामुळे आपण चुका करीत असतो. आपण असे कोणतेही कर्म केले नाही पाहिजे कि त्यामुळे आपल्याला दुःख भोगावे लागेल व आपल्या पित्याचे नाव बदनाम होईल. स्वतः मध्ये असलेले अवगुण व वाईटपणा आपल्यातून नष्ट करणे आवश्यक आहे. ईर्ष्या, द्वेष, चोरी, लोभ, मोह, हे आपले दुश्मन आहेत. यामध्ये अधीन झाल्याने आपल्या मान, सम्मान यास ठेस पोहंचते. जीवनात नैतिक मूल्य ची धारणा करण्याची आवश्यकता आहे. जीवनात सद्गुण नसल्यामुळे समस्या, विघ्न यांचा जन्म होतो असे भगवान भाई यांनी सांगितले.</span><p></p><p><span style="font-size: medium;">यावेळी मनुष्य जीवन अनमोल आहे जीवनात वाईट कर्म करून जीवन व्यर्थ घालू नये. समस्या, विघ्न यास परीक्षा समजून हिंमत, संयम व सहनशक्ती ने यावर विजय मिळविणे आवश्यक आहे. जीवनात परिवर्तन आणून श्रेष्ठ चरित्रवान बनणे आवश्यक आहे, असे झाले तर कारागृह नाही तर जीवन सुधारगृह आहे हे सिद्ध होईल.</span></p><p><span style="font-size: medium;">यावेळी भगवान भाई यांनी सांगितले कि, जो जसे कर्म करेल तसे तो फळ चाखेल. आपल्या मनात पहिले विचार येतात कृती नंतर होत असते. विचारानेच इतराबद्दल प्रेम, द्वेष, या भावना निर्माण होत असतात. जर आपणास इतराबद्दल चांगले विचार केले तर इतरांमध्ये देखील आपल्याप्रती चांगले विचार निर्माण होतील. जो दुसर्यांना दुःख देतो त्याला दुसर्याकडून सुख मिळणार नाही तर दुःखचं मिळेल. जो दुसर्यांना सुख देईल त्यास दुसर्याकडून सुखच मिळेल हा कर्माचा व विचाराचा सिद्धांत आहे. चूक करणार्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो. आपण सर्वजण ईश्वराची लेकरे आत्मा आहोत. जीवन हे अनमोल आहे याचा उपयोग श्रेष्ठ कर्म करण्यासाठी झाला पाहिजे. आपण जीवनाच्या अंतिम स्वाश असेपर्यंत सदैव श्रेष्ठ कर्म केले पाहिजे असे यावेळी भगवान भाई यांनी सांगितले.</span></p><p><span style="font-size: medium;">यावेळी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवाकेंद्र कैलाशनगरच्या बी के आर्चना बहन जी ने सांगितले कि जर ईश्वराला सर्व संबंधाने आठवण केली तर त्यांची शक्ती व गुण आपल्यात येतात व आपण कितीही अडचणीत असलो तरी त्यावर मार्ग निघतो व आपण सुखात, आनंदांत, समाधानात राहू शकतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले. यावेळी कारागृह अधीक्षक सुभाष सोनावने यांनी सांगितले कि जो जसा विचार करेल तसे तो बनतो. यासाठी आपण सदैव चांगले विचार केले पाहिजे असे सांगितले व ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र कैलाशनगर व भगवान भाई याना विशेष असा कार्यक्रम घेतल्याबद्दल धन्यवाद दिले. भविष्यात असे अनेक कार्यक्रम घेण्यासाठी येत राहावे असे आमंत्रण दिले.</span></p><p><span style="font-size: medium;">यावेळी कारागृह उपअधीक्षक रविन्द्र रावे म्हणाले कि भगवान भाई यांनी सांगितलेले विचार जर आत्मसात केले तर आपल्यातून वाईट विचार नष्ट होतील व आपण एक चांगले व्यक्ती बनून स्वतःची व देशाची सेवा करण्याची पात्रता आपल्यात येईल. कार्यक्रमाच्या शेवटी तणावापासून दूर राहावे व मनोबल वाढविणे यासाठी राजयोग मेडिटेशन राजयोगी भगवान भाई यांच्याद्वारे घेण्यात आले.</span></p><p><span style="font-size: medium;">यावेळी सेवाकेंद्र कैलाशनगर चे में बी के नागनाथ भाई यांनी भगवान भाई यांचा परिचय सर्वाना सांगितला व कार्यक्रम घेण्याची संधी दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक मा.सुभाष सोनवणे, उप अधीक्षक मा. रवींद्र रावे यांचे आभार मानले. यावेळी सेवाकेंद्र कैलाशनगरचे बी के माधव भाई यांची प्रामुख्याने उपस्तीथी होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजयोगी भगवान भाई यांचा कारागृह अधीक्षक व उप अधीक्षक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारागृहाची टीम यांनी मोलाची भूमिका बजावली.</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-23050631910043756012023-07-01T09:11:00.001+05:302023-07-01T09:11:12.069+05:30छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये स्मारक उभारण्यासाठी अडथळे दूर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL<p><span style="font-size: medium;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjtmJfK-Jjq8fsY2RX0Vkg50lc7q08x3WfRGHe8KkOZfFfhKTT2uV3Gv_YltSg4IHhNV1cL0cfWurNeSNUU9OYRk8_dUOxJHMWVvjCoR4VciTZ082C2DurQDhZhp5YXxVprw2cL6kroBtoWmxXvXMKJp8-SZOIUUu5zFGQIobCRRjMd-d739xETk3moaDE/s1280/beed.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="853" data-original-width="1280" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjtmJfK-Jjq8fsY2RX0Vkg50lc7q08x3WfRGHe8KkOZfFfhKTT2uV3Gv_YltSg4IHhNV1cL0cfWurNeSNUU9OYRk8_dUOxJHMWVvjCoR4VciTZ082C2DurQDhZhp5YXxVprw2cL6kroBtoWmxXvXMKJp8-SZOIUUu5zFGQIobCRRjMd-d739xETk3moaDE/w640-h426/beed.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-size: medium;"><b><br />बीड| </b>छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये सर्वोत्तम असे स्मारक उभारण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरील याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाकडे आणण्यात आले आहे. उच्च न्यायालयात पर्यावरण पूरक काम करून शिवस्मारक पूर्ण करण्यात येईल, अशी बाजू सरकारतर्फे पटवून देण्यात येईल. स्व. विनायक मेटे यांचे शिवस्मारक उभारणीचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.</span><p></p><p><span style="font-size: medium;">बीड येथे आयोजित स्व. विनायकराव मेटे यांच्या प्रथम जयंती कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रथम स्व. विनायकराव मेटे यांच्या स्मृती स्थळास भेट दिली व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री अतुल सावे, खासदार प्रताप चिखलीकर, आमदार नमिता मुंदडा, आमदार संदिप क्षीरसागर, आमदार भारती लव्हेकर, माजी मंत्री महादेव जानकर, प्रविण दरेकर, शिवसंग्रामच्या डॉ ज्योतीताई मेटे, आशुतोष मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर आगमनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.</span></p><p><span style="font-size: medium;">यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले, मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्यासाठी स्व.विनायकराव मेटे यांनी केलेले प्रयत्न बहुमोल आहेत. राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विनायक मेटे काम करत होते. मराठा समाजातील गरीब व दुर्बल लोकांसाठी ते झटले. त्यांच्या प्रयत्नामुळे सारथी या शासकीय संस्थेच्या उभारणीत योगदान आहे. विद्यार्थ्यांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून त्यांचे प्रयत्न सुरू होते. या सारखी संस्थेच्या माध्यमातून 103 विद्यार्थी मोठे यश संपादन करत त्यांची महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. त्यांच्या कार्याला पूर्ण करताना मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असा पुर्नउच्चार उपमुख्यमंत्री महोदयांनी केला.</span></p><p><span style="font-size: medium;">ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देताना मेटेंचा थेट सहभाग होता. त्यांच्या विचारांच्या धर्तीवर काम करताना आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांना संरक्षण देत नियुक्त करण्याचा मोठा ताकदीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यांच्या विविध कार्याबद्दलच्या आठवणी यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नमूद केल्या.</span></p><p><span style="font-size: medium;">बीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस त्यांचे नाव देण्यात येणार असून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी तेथे स्व. विनायक मेटे पुतळा उभारण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मुंबई जवळ अरबी समुद्रातील शिवस्मारक पूर्ण झाल्यानंतर सगळेजण नक्कीच यासाठी स्व. विनायक मेटे यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण काढतील व नाव घेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.</span></p><p><span style="font-size: medium;">यावेळी पालकमंत्री श्री.सावे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. बीड जिल्ह्याच्या विविध विकास कामांमध्ये त्यांचे योगदान ठळक दिसते आहे. मराठा आरक्षण यासह अनेक सामाजिक विषयांमध्ये त्यांनी दिलेला लढा महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यानंतर हे समाजकार्य अविरत सुरु राहण्यासाठी आम्ही देखील मेटे परिवाराच्या पाठीशी उभे असून त्यांच्या कार्यात पाठिंबा देऊ, असे ते म्हणाले,</span></p><p><span style="font-size: medium;">याप्रसंगी प्रवीण दरेकर, ज्योतीताई मेटे, तानाजीराव शिंदे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यासपीठावरील स्व. विनायक मेटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी आशुतोष मेटे यांनी बीड येथील नियोजित विद्यार्थी विद्यार्थिनी वस्तीगृहाच्या मागणी बाबत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना निवेदन दिले.</span></p><p><span style="font-size: medium;">उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते यावेळी बीड जिल्ह्यातील लोकसत्ता चे जिल्हा प्रतिनिधी वसंत मुंडे यांचा लोकमत एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार भीमराव धोंडे, अनिल जगताप, अशोक पाटील, कुंडलिक खांडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-39458563640549592952023-07-01T09:07:00.003+05:302023-07-01T09:07:40.435+05:30पंढरपूर, देहू, आळंदी, पैठणसह सर्व मंदिरे-तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत ! - पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी -NNL<p><span style="font-size: medium;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh5WyWwxjG4pv5xZwHiu0j-k0pf40k86TKlpfLwucFWwxFV6HpvDo6TyI8er8INqquRUQZYc6f0eq4oOfMI4jh31ncjtloc4yUiWEummaeAD9dkutF0Y7wOecLarIl9EBBYrAuP2ybdUufFVDiNS0S8XNZHaW15F3si2dnXo3NZml9OuK7metfwOLTm_gY/s5999/varakari_adhivaton_kokaore_mahraj.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3254" data-original-width="5999" height="348" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh5WyWwxjG4pv5xZwHiu0j-k0pf40k86TKlpfLwucFWwxFV6HpvDo6TyI8er8INqquRUQZYc6f0eq4oOfMI4jh31ncjtloc4yUiWEummaeAD9dkutF0Y7wOecLarIl9EBBYrAuP2ybdUufFVDiNS0S8XNZHaW15F3si2dnXo3NZml9OuK7metfwOLTm_gY/w640-h348/varakari_adhivaton_kokaore_mahraj.JPG" width="640" /></a></b></span></div><span style="font-size: medium;"><b><br />पंढरपूर/मुंबई| </b>पंढरपूर - ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी अन् पैठण ही तीर्थक्षेत्रे, तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा; पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी; सर्व तीर्थक्षेत्रे, मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करावी, अशी एकमुखी मागणी पंढरपूर येथील ‘भव्य वारकरी अधिवेशना’त करण्यात आली.</span><p></p><p><span style="font-size: medium;">वारकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे ‘वारकरी संप्रदाय’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती’ यांच्या संयुक्त हे वारकरी अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात संतमहंत, मान्यवर, हरि भक्त परायण, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल उत्पादने’ विकत घेणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. या अधिवेशनासाठी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.</span></p><p><span style="font-size: medium;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjCLLc7_FA87DgDx9CS6UqnxwiXUitALFK80xy_3IVgOUE2-BWwCUJLYUa5vqHbxy3pR37RgYqoNV9q-M6-ePtdyZbXQrzm5mWhhaYF3WvvRsURURIFQ_w48GHZ-qr_X_m0eH0sI9w9SIUFkQU7E86EXPDgx3fRo3tbTUDS9fTyxkGowticsd40eTqGlUs/s776/varakari_adhivaton.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="776" data-original-width="774" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjCLLc7_FA87DgDx9CS6UqnxwiXUitALFK80xy_3IVgOUE2-BWwCUJLYUa5vqHbxy3pR37RgYqoNV9q-M6-ePtdyZbXQrzm5mWhhaYF3WvvRsURURIFQ_w48GHZ-qr_X_m0eH0sI9w9SIUFkQU7E86EXPDgx3fRo3tbTUDS9fTyxkGowticsd40eTqGlUs/w638-h640/varakari_adhivaton.JPG" width="638" /></a></span></div><span style="font-size: medium;"><br />उपस्थित मान्यवर - ह.भ.प. जय महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. रामेश्वर शास्त्री, ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी, ह.भ.प. मारुती महाराज तुणतुणे शास्त्री, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता आशुतोष अनिल बडवे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण समितीचे अध्यक्ष श्री. गणेश लंके, ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर, ह.भ.प अनंत सातपुते, ह.भ.प. वनवे महाराज, ह.भ.प. सुभाष महाराज शिंदे आणि ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे आदी उपस्थित होते.</span><p></p><p><span style="font-size: medium;">अधिवेशनात करण्यात आलेले ठराव ! - वरील ठरावांसाह सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करावीत; हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा; गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी; लव्ह जिहाद, धर्मांतरबंदी कायदे लागू करण्यात यावेत; हिंदु देवी-देवता, संत, श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा; गीता-रामायण अन् संत साहित्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा; गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवून त्या जमिनी गोमातेसाठी संरक्षित करावी यांसह विविध ठराव अधिवेशनात संमत करण्यात आले.</span></p><p><span style="font-size: medium;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpboE7edDvcBqBHqf5aMX0gEWD6jcQu_H-VjThqifCiwwQe9rj-hqqOqclCPgM70SEBLH_MT5miRVYa83IeoO7n_DtNLFcgBSvPABmtLB35irhlX2GSpjViXZgeEJ6MK2UljMd0x6dZ_0To0nFxM2k3w2-8AqHxU2y-fmCfQqmcYSiVhCvW9ROPqM40SU/s5902/uapsthiti_adhivation1.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="2461" data-original-width="5902" height="266" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpboE7edDvcBqBHqf5aMX0gEWD6jcQu_H-VjThqifCiwwQe9rj-hqqOqclCPgM70SEBLH_MT5miRVYa83IeoO7n_DtNLFcgBSvPABmtLB35irhlX2GSpjViXZgeEJ6MK2UljMd0x6dZ_0To0nFxM2k3w2-8AqHxU2y-fmCfQqmcYSiVhCvW9ROPqM40SU/w640-h266/uapsthiti_adhivation1.JPG" width="640" /></a></span></div><span style="font-size: medium;"><br />या प्रसंगी ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदायात हिंदुत्वाचे कार्य करण्याची शक्ती रक्ताच्या थेंबाथेंबात आहे हे वैकुंठवासी पूजनीय वक्ते महाराज यांनी दाखवून दिले आहे. सर्व प्रकरच्या ‘जिहाद’ला प्रत्युत्तर देण्यासाठी वारकरी संप्रदायाने प्रत्येक ठिकाणी हिंदूंचे प्रबोधन केले पाहिजे. यापुढील काळात कीर्तनकारांचे प्रबोधन करण्यासाठी त्यांचे अधिवेशन घेण्याची आवश्यकता आहे. जे ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणतात त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे.’’</span><p></p><p><span style="font-size: medium;">ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज म्हणाले, ‘‘पंढरपूर हे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही येथे सर्रास मद्य-मांस विक्री होते हे दुदैवी आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मद्य-मांस विक्रीवर बंदी असावी. त्यासाठी कठोर कायदा व्हावा, यासाठी समस्त वारकरी आणि हिंदू यांनी सरकारवर दबाव आणायला हवा.’’ या प्रसंगी ह.भ.प. मारुती महाराज तुणतुणे म्हणाले, ‘‘वैदिक धर्म हा अनादी-अनंत असून त्याची परंपरा अब्जावधी वर्षांची आहे. त्याचा आपल्याला अभिमान नसल्याने परधर्मियांचे आपल्यावर आक्रमण होत आहे. वारकर्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिंडीत परधर्मियांना प्रवेश देता कामा नये.’’</span></p><p><span style="font-size: medium;">या प्रसंगी ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी म्हणाले, ‘‘सध्या शालेय शिक्षणात खरा इतिहास शिकवला जात नाही. मुघलांचा इतिहास अधिक शिकवला जात आहे. खरे तर संत साहित्य पाठ्यपुस्तकांतून शिकवले पाहिजे.’’ ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर म्हणाले, ‘‘मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम मागील अनेक वर्षांपासून आपण भोगत आहोत. धर्मावर होणारे हे आघात रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावेत.’’</span></p><p><span style="font-size: medium;">या प्रसंगी ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘दिनांक 9 मार्च 2004 रोजी सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.एम्. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शिवराज पाटील यांच्या खंडपीठाने ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांत नगरपालिका प्रशासनाने आणलेली ‘मांस-मद्य’ यांवरील बंदी कायम ठेवली होती. त्याचधर्तीवर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय राज्यात तात्काळ लागू करावा. सर्व हिंदूंनी हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकून ‘हलाल जिहाद आणि हलाल उत्पादनांची सक्ती’ देशातून हद्दपार करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे.’’</span></p><p><span style="font-size: medium;">यावेळी प्रस्तावना करतांना ‘हिंदु जनजागृती समिती’चे सोलापूर, बीड आणि लातूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे म्हणाले, ‘‘मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी केवळ 4 महिन्यांत महाराष्ट्रातील 145 हून मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. पुढील काही महिन्यांत 1 हजार मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’’ अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. श्रीपाद पेठकर यांनी केले. तर हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी गड-किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण आणि त्या संदर्भात दिलेला लढा याची माहिती दिली. पसायदानाने वारकरी अधिवेशनाची सांगता झाली.</span></p><p><b><span style="font-size: medium;">....श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड ,हिंदु जनजागृती समिती (संपर्क : 70203 83264) </span></b></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-14690367702212565662023-07-01T09:00:00.003+05:302023-07-01T10:31:05.115+05:30ढोल ताशांचा गजर.... बम बम भोलेचा नामघोष करत ७१ यात्रेकरूंच्या पहिल्या जत्था अमरनाथ यात्रेला रवाना -NNL<p><span style="font-size: medium;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgO2K62a3DBeZ-LaXwuWnw4nF7DscE8Fjx1G52tlyOrTc5ueDnkXxqF5AD4Cwayfx27jGdlXjn1H8i1eoMW2Fmj64nLNrpTe09GxL8ee91t--ybZLLpjFq1YWgIYatIZpjSKgmpRrJAdyN1Ca7ajtXStBzrneS6DECGhPCJFc3aztyKHo8FwZ2S2E-T8VE/s1600/IMG-20230630-WA0109.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1063" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgO2K62a3DBeZ-LaXwuWnw4nF7DscE8Fjx1G52tlyOrTc5ueDnkXxqF5AD4Cwayfx27jGdlXjn1H8i1eoMW2Fmj64nLNrpTe09GxL8ee91t--ybZLLpjFq1YWgIYatIZpjSKgmpRrJAdyN1Ca7ajtXStBzrneS6DECGhPCJFc3aztyKHo8FwZ2S2E-T8VE/w640-h426/IMG-20230630-WA0109.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-size: medium;"><b><br />नांदेड| </b>ढोल ताशांच्या गजरात बम बम भोले चा गजर करत २१ व्या अमरनाथ यात्रेला धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या ७१ यात्रेकरूंच्या पहिल्या जत्थाला शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी तसेच नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे नांदेड रेल्वे स्थानकाला जत्रेचे स्वरूप आले.</span><p></p><p><span style="font-size: medium;">शुक्रवार दि.३० जून रोजी सकाळी दहा वाजता यात्रेकरू काळे टी शर्ट व भगवी टोपी घालून परिधान करून स्टेशन वर आले. लंगर साहब गुरुद्वारा तर्फे बाबा सुबेकसिंघ यांनी सर्व यात्रेकरूंचा शिरोपाव व मोत्याची माळ देऊन सत्कार केला. यावेळी कामाजी सरोदे, सुरेश शर्मा,शिवा लोट,राजेशसिंह ठाकूर यांनी यात्रेकरुंवर पुष्पवृष्टी करण्यात आली.</span></p><p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhTP59rOPghaW24b_1hYvrUFucqIu6Sx9eqpvIyaJg_3H2Z2JDQJ1M51AyGRlzZEfVgnVDzAe7xWnRKrOQzAgZfR2Sp6UWNGd-tFyFJwL4utpRY_9bjCU7whKUi9OlJNoMYwqg7t1EW_ob91d_xwcLlvZM5X3wsE0a9YBMhTmLf6yS8y2uFdvKQxVzQOF8/s1600/IMG-20230630-WA0113.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: medium;"><img border="0" data-original-height="1063" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhTP59rOPghaW24b_1hYvrUFucqIu6Sx9eqpvIyaJg_3H2Z2JDQJ1M51AyGRlzZEfVgnVDzAe7xWnRKrOQzAgZfR2Sp6UWNGd-tFyFJwL4utpRY_9bjCU7whKUi9OlJNoMYwqg7t1EW_ob91d_xwcLlvZM5X3wsE0a9YBMhTmLf6yS8y2uFdvKQxVzQOF8/w640-h426/IMG-20230630-WA0113.jpg" width="640" /></span></a></div><span style="font-size: medium;"><br />यात्रे दरम्यान अन्नदान करणारे सतीश सुगनचंदजी शर्मा, डॉ. अजयसिंह ठाकूर ,नवनाथ सोनवणे उदगीर, नागेश शेट्टी, प्रतिमा राजेंद्र चौधरी, मनोज शर्मा नागपूर,हृदयनाथ सोनवणे,सुभाष बंग,ज्ञानोबा जोगदंड, सरदार कुलदीपसिंघ, ओमप्रकाश पाम्पटवार,सरदार जागीरसिंघ, सरदार प्रताप फौजदार, अशोक जायस्वाल ,स्नेहलता जायसवाल ,शेंदूरवाडकर व रावके, प्रदीप शुक्ला, अरुण लाठकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. नांदेड जिल्हा केमिस्ट व ड्रगिष्ट्र असोशियन तर्फे मोफत औषधी देण्यात आल्या. सुरेश लोट यांनी आयुर्वेदिक औषधी दिल्या.</span><p></p><p><span style="font-size: medium;">क्षत्रिय राजपूत महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सुषमा ठाकूर यांनी मिनरल वॉटरची व्यवस्था केली.१३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, दिल्ली, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी जेष्ठ पत्रकार विश्वनाथ देशमुख यांच्या सह भाजपा,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, लायन्स क्लब, एन्जॉय स्विमिंग ग्रुप, शिवा संघटना, शिवसेना, अमरनाथ यात्री संघ, पतंजलीचे सदस्य मोठ्या प्रमाणात आले होते. संयोजक दिलीप ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले.</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-9727146657045157162023-07-01T08:48:00.001+05:302023-07-01T08:48:13.416+05:30महाराष्ट्रात शिंदे व फडणवीस सरकारकडून वचनपूर्ती -NNL<p><span style="font-size: medium;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6Rd0rGQ0aJRPRJLjDrpGcrVi-85Vnl9FW4g6wCRgcHCj3kZ_bD-kyVszg1_lm-6ckaHO4x6UtlW1AJuxYw2siSbDstPQQccOMI8BSUd2fLFPyYvUAhQngE297Y6YF_VuKnapS5kjuu3nzMByJggmQaWayPzlkdomIfAk7d1dZq7kStgJkpKnHSLyt6ik/s700/510657-edmahapti.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="400" data-original-width="700" height="366" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6Rd0rGQ0aJRPRJLjDrpGcrVi-85Vnl9FW4g6wCRgcHCj3kZ_bD-kyVszg1_lm-6ckaHO4x6UtlW1AJuxYw2siSbDstPQQccOMI8BSUd2fLFPyYvUAhQngE297Y6YF_VuKnapS5kjuu3nzMByJggmQaWayPzlkdomIfAk7d1dZq7kStgJkpKnHSLyt6ik/w640-h366/510657-edmahapti.jpg" width="640" /></a></span></div><span style="font-size: medium;"><br />महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडींचे सरकारला एक वर्षपूर्ण झाले आहे. या सरकारने आमचे सरकार हे सामान्यांचे असेल,असे वचन दिले! त्यानंतर त्यांनी लोकहिताचे सूमारे 14 हजाराच्यावर निर्णय घेतले आहेत.तेंव्हा हे सरकार गतीवान आणि वेगवान असल्याचे अनुभूती येते!आतापर्यंत इतिहासात याच सरकारने बळीराज्याचे सर्वाधिक मदत दिलेली आहे! हे सरकार,गरीब,आदिवासी, अल्पसख्याक,सर्व घटकांचा विचार केला आहे. यामुळे 'हे सरकार आमचे आहे,आम्ही सरकारचे आहोत' अशी जनभावना आहे. </span><p></p><p><span style="font-size: medium;">महाराष्ट्रात 2022 व 2023 यावर्षात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.शेतकरी वर्गाकडून राज्य शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात होती.शेतकरी संकटात आल्याचे दिसताच महाराष्ट्र सरकार हे शेतकर्यांचे मागे खंबीरपणे राहिल,वार्यावर सोडणार नाही, अशा शब्दात धैर्य दिले.जून -ऑक्टोबर या कलावधीत 62 लाख 66 हजार शेतकर्यांना शेती नुकसानीचे 7 हजार 96 कोटी 19 लाख रूपये देण्यात आले.पुन्हा मार्च 2023 मध्ये अवकाळीपावसाचा शेतकर्यांना फटका बसला.यावेळी सरकारने मदतीसाठी धावून आले! यासाठी 117 कोटी 80 लाखाचा निधी देण्यात आला.तर विदर्भ व पुणे विभागातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 222 कोटी 32 लाख रुपयांची मदत दिली. शंखी गोगलगाईमुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान झाले. त्यांना 98 कोटी 58 लाख रुपायाची मदत देण्यात आली आहे. </span></p><p><span style="font-size: medium;">तसेच पंतप्रधान पीक विमा अंर्तगत शेतकरी व राज्य शासनाला आपला वाटा भरावा लागत असे ! तेंव्हा या सरकारने शेतकर्यांना विम्याचा वाटा भरण्याचा निर्णय घेतला.तेंव्हा शेतकर्यांनी पीक विमा केवळ एक रूपाया भरावा लागणार आहे.हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला.केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकर्यांना 3 महिन्याला दोन हजार या प्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये थेट खात्यावर जमा होतात, यात महाराष्ट्र सरकारने 6 हजार भर घातली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांना वार्षिक 12 हजाराची मदत मिळत आहे.तसेच शेतकर्यांची गोपीनाथ मुंढे अपघात योजनेची अंमलबजावणी आता प्रशासनाकडून आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">शेतकर्यांना खत, बियाणे,आदी बाबत अनुदान दिले जात आहे. महात्मा फुले योजने अंतर्गत कर्ज मुक्ती योजनेनुसार 12 लाख 84 हजार लाख शेतकर्यांना प्रत्येकी 50 हजार रुपायाप्रमाणे 4683 कोटी रूपये देण्यात आले. भूविकास बँकेचे सुमारे 38 हजार 788 शेतकऱ्यांकडे 964 कोटी 15 लाख रुपायांचे कर्ज माफ केले. त्याप्रमाणे 86 हजार 73 कृषी पंपाची वीज जोडणीचे प्रकरणे प्रलंबित होते. या सरकारने तातडीने वीज जोडणी करण्याचा निर्णय घेतला! शेतकर्यांना कृषी पंपासाठी वीज सवलत दिली जात असून महावितरणला 351 कोटी रुपये अनुदान देण्यात आले. तसेच कांदा उत्पादकांना प्रति 350 रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला गेला. राज्यातील बळीराजावर अनेक नैसर्गिक संकटे आली,त्यांना मदत करण्यास शिंदे- फडणवीस हे सरकार कोठेही कमी पडलेले नाही, त्यासाठी सरकारने आखडता हात घेतलेला नाही,अथवा आर्थिक चिंता व्यक्त केली नाही. </span></p><p><span style="font-size: medium;">शेतकर्याप्रमाणे या सरकारने गरीब कुटुंबासाठी दिवाळी, गुडीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने 58 लाख कुटुंबांना शंभर रुपायात 5 जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. त्यामुळे गरीब कुटुंब यावर्षी सण, उत्सव गोड झाले! समाजातील प्रत्येक घटकाचा सरकारने मदत देण्याचे निर्णय घेतला, त्यात स्वच्छता विभागात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कामगारांना नोकरी व घरे. अंगणवाडी, मदतनीस, कोतवाल, आशा वर्कर यांचे मानधनात वाढ तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत वृध्द महिला व पुरुषांना प्रति महिना 1 हजार रुपये दिली जात होती.यात सरकारने यात 500 रूपये वाढ केली आहे. </span></p><p><span style="font-size: medium;">सरकारच्या वाढीव मदतीचा गरीब परिवारांनी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशातील प्रत्येक कुटुंबाचे स्वत: च्या घरांचे स्वप्न करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्र सरकारने यावर्षी 10 लाख घरे बांधून देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. मोदी आवास योजने अर्तंगत इतर मागारवर्गीयांसाठी 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचा निर्धार केला आहे. 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे कधी नाही ते बसस्थानकात गर्दी दिसतेय ! बसेस खच्चखच्च भरुन जाताना आहेत ! एस.टी महामंडळाला चांगले दिवस आले आहेत. </span></p><p><span style="font-size: medium;">या सरकारने राज्यातील 70 हजार कोटीच्या प्रकल्पांना मंजूरी दिली. त्यात मराठवाड्याचा विचार करण्यात आला आहे. कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पातून धाराशीव, बीड जिल्ह्यातील 113 गावांना सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी सुधारित 11 हजार 626 कोटी रुपायाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे धाराशीव, बीड जिल्ह्यातील तालुक्यांना दुष्काळ- मुक्त करण्यासाठी 11 हजार 726 कोटी 91 लाखाच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. छत्रपती संभाजीनगर ब्रह्मगव्हाण येथील उपसा सिंचन प्रकल्पाच्या 8 कोटी 90 लाख 64 हजाराच्या खर्चास मान्यता दिली. हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र तर सिल्लोड भागात मका संशोधन स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. छत्रपती संभाजीनगर व लातूर येथील गंभीर रुग्णावर उपचार करणारे रूग्णालये त्वरित सुरु करण्यासाठी कामाला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. हिंगोली, जालना येथे मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूरधर्तीवर विकास करण्यात येणार आहे. </span></p><p><span style="font-size: medium;">राज्याच्या सीमेवर असलेल्या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची अनेक गावांची तक्रार होती. याची राज्य सरकारने दखल घेतली व त्या गावात पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्याच्या सोयी उपलब्ध करुन देण्याचे वचन सरकारने दिलेले आहे. सरकारच्या सततच्या प्रयत्नामुळे लातूर येथे 120 वंदेमातरम् रेल्वे डब्याची निर्मीती करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारचा धाडशी निर्णय घेतला आहे. सरकारला रेतीच्या लिलावातून कोट्यवधी मिळत होते परंतु पर्यावरणाला धोका व वाळू माफियांची गुंडगिरी वाढत होती. त्याला लगाम घातला गेला आहे. रेती उत्खन्नाच्या धोरण बदल केला गेला. सामान्य माणसाला प्रतिब्रास 600 रुपये दराने वाळू दिली जाणार आहे. या सरकारने सर्व क्षेत्राचा, समाजातील सर्व अपेक्षित माणसाला न्याय देणारे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सरकारच्या मदतीपासून कोणीही वंचित राहू नये याची काळजी सुक्ष्म पध्दतीने घेतली आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">आज महाराष्ट्रात विदेशी चार लाख कोटी रूपयांची गुंतवणूक झालेली आहे. ती देशाच्या एकूण गुंतवणुकीत राज्याचा 29 टक्के वाटा आहे. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत ! तेंव्हा महाराष्ट्र राज्य 'सुजलाम सुफलाम' होण्यास वेळ लागणार नाही.</span></p><p><b><span style="font-size: medium;">......कमलाकर जोशी, ज्येष्ठ पत्रकार नांदेड.</span></b></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-88239740988024964892023-06-30T22:10:00.003+05:302023-07-01T08:52:44.010+05:30शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड – पडीक जमिनीत उसापेक्षा जास्त उत्पन्न -NNL<p><span style="font-size: medium;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTKEooqdioYFwFpnVPjMzNxzDc8z8gsRPfIwQAIMqroPuj0ZZjhCWyU38xoK04nhsceWa2X_47rWUxilyHty8S0E9BsVsp-kaxBCNNsCLxHLggA9cCanJkwUOcU-opdVXjhN1PmoyxzKZRBdy1z1MMDkzakcTxhz9JFUW0aQvkZ4gwOXi1h1vjVHUDITQ/s320/images%20(50).jpeg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="180" data-original-width="320" height="360" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTKEooqdioYFwFpnVPjMzNxzDc8z8gsRPfIwQAIMqroPuj0ZZjhCWyU38xoK04nhsceWa2X_47rWUxilyHty8S0E9BsVsp-kaxBCNNsCLxHLggA9cCanJkwUOcU-opdVXjhN1PmoyxzKZRBdy1z1MMDkzakcTxhz9JFUW0aQvkZ4gwOXi1h1vjVHUDITQ/w640-h360/images%20(50).jpeg" width="640" /></a></span></div><span style="font-size: medium;"><br />बांबू लागवड उपक्रमाकरिता प्रायोगिक तत्वावर सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. बांबू लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शासकीय विभागांस सार्वजनिक ठिकाणी, वनक्षेत्रे, नदीकाठी, रस्त्याच्या दुतर्फा, पाणीसाठ्याच्या चारीबाजूस जास्तीत जास्त बांबू लागवड करण्याबाबत निर्देश दिलेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून शासकीय योजनेचा लाभ घेऊन शेती पूरक व्यवसायातून आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन ही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.</span><p></p><p><span style="font-size: medium;">महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात बांबू लागवड अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये 10 गुंठ्यांपासून 1 हेक्टरपर्यंत बांबू लागवड करता येते. बांबू हे शेतकऱ्यांसाठी बुहउद्देशीय उपयोगी पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांबू लागवड माध्यमातून जोड धंदा मिळवा म्हणून शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. उसापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त उत्पादन देणाऱ्या आणि कपडयापासून टुथ ब्रश पर्यंत आणि टोपी, चप्पल बुटापासून इथेनॉलपर्यंत हजारो वस्तू तयार होणाऱ्या बांबूच्या जाती आहेत. सध्या भारतात देखील बांबूपासून 1800 प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. ऊस लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रति टन किमान 2500 मिळतो तसेच बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रति टन किमान 4000 मिळतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत.</span></p><p><span style="font-size: medium;"><span>तिसऱ्या वर्षापासून बांबूचे उत्पादन सुरू होते. जमिनीची धूप व जलसंवर्धन होते. बांबूचे जीवनचक्र 40 ते 100 वर्षाचे आहे. पहिली दोन वर्ष त्यामध्ये आंतरपीक घेता येते. क्षारपड व नापिक जमिनीवरही बांबू लागवड करता येते. </span>कृषि अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी बांबू पासून इथेनॉल निर्मिती केली जाते. 1 हेक्टर ऊस लावला तर 2 कोटी लिटर पाणी लागते व 1 टन ऊस गाळला तर 80 लीटर इॅथेनॉल निघते. आणि 1 हेक्टर बांबू लावले तर 20 लाख लीटर पाणी लागते. 1 टन बांबू गाळला तर 400 लीटर इथेनॉल निघते. तसेच प्रति एकरी 40 टन उत्पादन मिळते ज्याची अंदाजे किंमत 4000/- ते 25000/- प्रति टन आहे. केंद्र शासनाने 2017 पासून बांबू हे गवतवर्गीय असल्याचे घोषित केल्याने आता, वन सरंक्षण कायदयानुसार बांबू तोडण्यास, कापण्यास व वाहतुकीस आता परवानगीची आवश्यकता नाही. देशातील सर्व औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 10 टक्के बायोमास वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता बांबू व बांबूसारखे इतर बायोमासची आवश्यकता भासणार आहे. </span></p><p><span style="font-size: medium;">जिल्हयात बांबू लागवड कार्यक्रम राबविण्यासाठी माजी अध्यक्ष व महाराष्ट्र बांबू समितीचे सदस्य पाशा पटेल यांचे समवेत विजया यादव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) व इतर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांनी मौजे बामणोली व मौजे दरे या गावांमध्ये भेट देवून जनजागृती करण्यासाठी लोकांना मार्गदर्शन केले. बांबू लागवडी बाबत लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बांबूची शेती करणार असल्याचे शेतकरी यांनी सांगितले. बांबूची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत लागवड करण्यास वाव आहे. सदर कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी अध्यक्ष व महाराष्ट्र बांबू समितीचे सदस्य पाशा पटेल यांचे समवेत जिल्हास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली. </span></p><p><span style="font-size: medium;">जिल्हयास 27 हजार 500 हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाल्याने जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवड करण्याबाबत जिल्हास्तरावरून ग्रामपंचायत विभागाला 10 हजार हेक्टर कृषी विभागाला 7 हजार 500 हेक्टर व सामाजिक वनीकरण विभागास 10 हाजर हेक्टर असे एकूण 27 हजार 500 हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">सामाजिक वनीकरण विभागाकडे लहान 92 हजार 900 व 58 हजार 355 अशी एकुण 1 लाख 51 हजार 255 बांबुची रोपं उपलब्ध आहेत. सामाजिक वनीकरण विभागामार्फत स्थानिक शेतकऱ्यांना बांबुलागवडीसाठी मार्गदर्शन व प्रोत्साहित करण्याचे काम सुरु असून मनरेगा अंतर्गत एकूण 86 हेक्टर वर 105 लाभार्थ्यांची माहिती व प्रस्ताव प्राप्त करण्याची कार्यवाही सुरु आहे. ग्रामपंचायत विभागामार्फत वैयक्तिक क्षेत्रावरील 148 प्रस्ताव प्राप्त झाले असून 21 लाभार्थ्यांची 8.53 हेक्टरवर सद्यस्थितीत कामे सुरु करण्यात आली आहेत. ग्रामपंचायत विभागामार्फत ग्रामपंचायतीकडील गायरान सार्वजनिक क्षेत्रावर 44.4 हेक्टरवर बांबू लागवड करण्याबाबतचे नियोजन केले आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">वन विभागाकडील रोपवाटिकांमध्ये 81 हजार 250 बांबूची रोपे उपलब्ध असून 130 हेक्टरवर व वन्यजीव विभाग बामणोली मार्फत 20 हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे नियोजन केले आहे. तसेच कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग कोयनानगर यांनी कोयना प्रकल्पाकरिता संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी मौजे मुनावळे ता.जावली व मौजे दरे ता.महाबळेश्वर या दरम्यान बुडीत क्षेत्राबाहेर शिल्लक क्षेत्र एकूण 43 एकर 25 गुंठे असून या क्षेत्रावर बांबू लागवड करणे शक्य असून या क्षेत्रावर विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभागामार्फत लागवड करण्याबाबत नियोजन केले आहे. तसेच कोयना जलाशयाच्या उत्तरेकडील तिरावर 28 गावांचे सर्वेक्षण करून सदर जागेवर जलाशया भोवती 244 हे. क्षेत्र उपलब्ध असून यामध्ये जावली तालुक्यातील 14 गावे, व महाबळेश्वर तालुक्यातील 14 गावांमध्ये बांबू लागवड करणे शक्य आहे. परंतु सदर क्षेत्र खाजगी, शासकीय क्षेत्र आहे याची खातरजमा तहसिलदार जावली व महाबळेश्वर यांचेमार्फत करण्यात येऊन सदरचे उपलब्ध क्षेत्र खाजगी असलेस संबंधित खातेदारांना बांबू लागवडीबाबतची महिती देऊन मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीकरिता प्रेरित करणेबाबत सूचना दिल्या आहेत.</span></p><p><span style="font-size: medium;">शेतकऱ्यांच्या पडीक जमीनी, बांधावर बांबू लागवड करण्यासाठी दि.12 एप्रिल 2018 चे सामाजिक वनिकरण विभागाकडील अंदाजपत्रकांस मान्यता देण्यात आली आहे. या नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामंपचायत विभाग, कृषि विभाग, व सामाजिक वनिकरण विभागामार्फत इच्छूक लाभार्थी यांना बांबू लागवडीकरिता मदत व मार्गदर्शन प्राप्त होईल. याकरिता लाभार्थी यांनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा तालुकस्तरावरील पंचायत समिती विभाग, कृषि विभाग, व सामाजिक वनिकरण विभाग कार्यालयास भेट द्यावी. वैयक्तिक बांबू लागवडी अंतर्गत 3 मी X 3मी. या अंतरानुसार 1 हेक्टरमध्ये 1100 रोपांची लागवड केलेस 3 वर्षापर्यंतच्या कालावधीत लाभार्थी यांना एकुण 6 लाख 90 हजार 90 रक्कमेपर्यंतचा लाभ मजुरी व इतर खर्चाच्या स्वरुपात प्राप्त होईल.</span></p><p><span style="font-size: medium;">याशिवाय पर्यावरणाच्या रक्षणसाठीही बांबूची लागवड फायदेशीर ठरत आहे. पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत असलेने ग्लोबल वार्मिंगमुळे संपूर्ण जग होरपळत चालले आहे. पर्यावरणातील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करावयाचे असल्यास मोठया प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या झाडांची लागवड केली पाहिजे. तरच हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होवून पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो. सर्वसाधारण एका व्यक्तीस एका वर्षास किमान 280 किलो ऑक्सिजनची आवश्यकता असते, तर एका बांबू एका वर्षात 320 किलो ऑक्सिजन हवेत सोडत असतो. एक एकर क्षेत्रामधून सर्वसाधारण 60 टन ऑक्सिजन तयार होतो. त्याचप्रमाणे एक हेक्टर क्षेत्रामधून सर्ववसाधारणपणे 200 टन इतका र्काबन डायऑक्साईड हवेतून बांबूव्दारे शोषला जातो. त्यामुळे बांबू लागवड केलेस तापमान कमी करण्यासाठी मदत होणार आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">सर्वाधिक कार्बनचे उत्सर्जन कोळशावर चालणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पातून होते. कारण हजारो प्रकल्पात रोज लाखो मेट्रीक टन कोळसा जाळला जातो. यातून रोज लाखो मेट्रीक टन कार्बनडाय ऑक्साईड हवेत जात आहे. यामुळे पृथ्वीचे तापमान प्रचंड वाढत आहे. तापमान वाढल्यामुळे निसर्गाचे चक्र उलटे फिरु लागले आहे. पृथ्वी विनाशाच्या उंबरठयावर येऊन थांबली आहे. तिला वाचवण्यासाठी पृथ्वीचे तापमान किमान 2 डिग्रीने कमी करावे लागणार आहे. यासाठी दगडी कोळशावर चालणारे जगभरातील प्रकल्प बंद करावे लागतील. यावेळी बांबू व बांबूसारखे इतर बायोमास वापरणेशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. तसेच दगडी कोळसा व बाबूंचा उष्मांक एकच आहे. कोळसा जाळल्यामुळे जमिनीच्या पोटातील कार्बन हवेमध्ये सोडला जातो. हे बांबू मुळे थांबवले जाऊ शकते.</span></p><p><span style="font-size: medium;">जगभरात औष्णिक ऊर्जा तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात कार्बन निर्माण होतो. या जागतिक समस्येवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने बांबू मिशन योजना अस्तित्वात आणली आहे. जगात अत्यंत शीघ्र गतीने वाढणारी वनस्पती म्हणून बांबू समजली जाते. जंगल वाढवण्यासाठी बांबू ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. जगामध्ये औष्णि प्रकल्प राबविणेसाठी दगडी कोळसा जाळावा लागतो. त्यापासून लाखो टन कार्बन निर्माण होतो. भविष्यात या ग्लोबल वार्मिंगमुळे समुद्र पातळी वाढून जगातील अनेक बेटे पाण्याखाली जाण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जंगल वाढवणे आणि त्यासाठी शीघ्र गतीने वाढणाऱ्या बांबूची लागवड करणे महत्त्वाचे आहे.</span></p><p><b><span style="font-size: medium;">.......संकलन , जिल्हा माहिती कार्यालय, सातारा</span></b></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-76082597191627271952023-06-30T22:07:00.001+05:302023-06-30T22:07:05.065+05:30आदिवासी महिलांना मारहाण कणाऱ्या वन अधीकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा - माकप -NNL<p><span style="font-size: medium;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEirfidYQl4zFie5dE_2CanSy_JiIr6rDNEZJafI9vjXEAoE_jQA7SY7Y3T7hkesyC-9y4YmoYP0JkrF2roDXZyL0csIl59NINgl650vkr6cfKi6CVuGAH5kDz_BMctQh3HxmochTB8BvxlXfbqUCQ4ZScvcU-EJ3SURcKKm8uRN-9HO7gqMPfECAh_Hci0/s1152/IMG-20230630-WA0027.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="519" data-original-width="1152" height="288" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEirfidYQl4zFie5dE_2CanSy_JiIr6rDNEZJafI9vjXEAoE_jQA7SY7Y3T7hkesyC-9y4YmoYP0JkrF2roDXZyL0csIl59NINgl650vkr6cfKi6CVuGAH5kDz_BMctQh3HxmochTB8BvxlXfbqUCQ4ZScvcU-EJ3SURcKKm8uRN-9HO7gqMPfECAh_Hci0/w640-h288/IMG-20230630-WA0027.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-size: medium;"><b><br />नांदेड।</b> शिवणी ता.किनवट येथील आदिवासी महिलांना कपडे फाटेपर्यंत मारहाण करून जखमी करणाऱ्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर करावाई करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.</span><p></p><p><span style="font-size: medium;">तसे निवेदन दि.३०जून रोजी निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्ठमंडळाने दिले आहे. आंध आदिवासी असलेल्या पीडित महिलांचा मन हेलावणारा हृदयद्रावक व्हिडीओ समाज माध्यमातून वायरल झाला असून संतापाची लाट उसळली आहे. </span></p><p><span style="font-size: medium;">मागील वीस वर्षांपासून शिवणी येथील आदिवासीच्या ताब्यात असलेली आणि कसत असलेली जमीन कास्त करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतातून हुसकावून लावण्याचे काम वन खात्या कडून केले जात आहे. एकीकडे गायरान,नवाटी,परंमपोक आणि फ़ॉरेस्टच्या जमिनीवर अतिक्रमण असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने पट्टे करून देण्याचे कार्य महाराष्ट्रात सुरु असून नांदेड जिल्ह्यात मात्र असाह्य आदिवासी व गरीब शेतकऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून कपडे फाटे पर्यंत मारहा करण्यात येत आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">या मारहाणीच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभे च्या वतीने निषेध करीत आंदोलनाची हाक देण्यात आली असून सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.आदिवासी महिलांना मारहाण करणाऱ्या फॉरेस्ट अधिकारी या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी माकपच्या वतीने वतीने करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रति आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आल्या आहेत. </span></p><p><span style="font-size: medium;">मकपचे आमदार कॉ.विनोद निकोले यानं निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर माकप राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ. उज्वला पडलवार, जिल्हा कमिटी सदस्य तथा नांदेड तालुका सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-52950295994228526302023-06-30T21:55:00.004+05:302023-07-01T08:53:25.181+05:30बळीराजा तुझ्यासाठी..! -NNL<p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjHb01PWcX7_vF-iDPX_EXBRDokq_IeFKrC7JAImq5RhAV_MxhzbmEqQ8tZ7_mTq14_yt_TYe6EFaaoB8szWzbV0s6KFkammab9nFi1qBfsFqmHjo8A_3DSj-Ly99dnletdQ9Dei8IhuCs5LVhln6GYF3HFXMx52ayzmbMTlcPirkVZAKHLbIpPIQZ28Q4/s1024/0.37377100_1563954075_gettyimages-498281885.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: medium;"><img border="0" data-original-height="402" data-original-width="1024" height="252" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjHb01PWcX7_vF-iDPX_EXBRDokq_IeFKrC7JAImq5RhAV_MxhzbmEqQ8tZ7_mTq14_yt_TYe6EFaaoB8szWzbV0s6KFkammab9nFi1qBfsFqmHjo8A_3DSj-Ly99dnletdQ9Dei8IhuCs5LVhln6GYF3HFXMx52ayzmbMTlcPirkVZAKHLbIpPIQZ28Q4/w640-h252/0.37377100_1563954075_gettyimages-498281885.jpg" width="640" /></span></a></div><span style="font-size: medium;"><br />मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना आषाढी एकादशी निमित्ताने त्यांनी पांडुरंगाचरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सुखी, समृद्धी करण्याचे साकडे घातले. बळीराजा संपन्न व्हावा, त्याची संकटे दूर व्हावीत हीच भावना शासनाची असल्याचे त्यातून दिसून आले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षभरात शासनाने तसे निर्णयही घेतले आहेत.</span><p></p><p><span style="font-size: medium;">‘सततचा पाऊस’ ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सततच्या पावसाचा दुसरा ट्रीगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यात येईल आणि 33 टक्के पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले असल्यास मदत देण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 1 हजार 500 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना 7 हजार 93 कोटी 19 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम आणि दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेत राज्यातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याने केंद्र आणि राज्याचे मिळून आता शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार आहेत. राज्यातील सुमारे 1 कोटीपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना यांचा लाभ होणार आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्य शासनाने सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ 1 रुपये भरुन पीक विम्याचा लाभ देण्याकरिता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यास त्यामुळे मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा हप्त्याचे 3 हजार 312 कोटी रुपये सरकार भरणार आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ निर्णयच नाही तर प्रत्यक्षात कार्यवाही करून 12 लाख 84 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार 683 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.</span></p><p><span style="font-size: medium;">शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषि वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण करण्यात येणार आहे. याचा लाभ 9 लाख 50 हजार शेतकऱ्यांना होणार असून शेतीसाठी दिवसा 12 तास वीज उपलब्ध होऊ शकेल. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 20 हजार गावात 6 लाख संरचना तयार होऊन गावे जलयुक्त झाली होती. हे अभियान 5 हजार गावात परत सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होण्यास मदत होणार आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">सिंचन विकासासाठी जलसंपदा प्रकल्पांना वेग देण्यात येत आहे. आजतागायत 29 प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली. त्यामुळे 6 लाख 50 हजार हेक्टर जमीन सिंचीत होणार आहे. शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजनादेखील सुरू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त ‘श्रीअन्न अभियान’ अंतर्गत 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">शेतीसाठी शासनाने घेतलेल्या या गतीमान निर्णयांमुळे शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा मिळण्यासोबत शेतीचे उत्पादन वाढवून आर्थिक स्थैर्यासाठीदेखील मदत होणार आहे. वर्षभरातील या सकारात्मक आणि क्रांतीकारी निर्णयांमुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येऊ शकेल.</span></p><p><b><span style="font-size: medium;">......जिल्हा माहिती कार्यालय पुणे.</span></b></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-38627629112927234882023-06-30T21:38:00.001+05:302023-06-30T22:14:54.945+05:30माहुरमध्ये गोरक्षकावर लाठी काठी रॉडने हल्ला; गंभीर जखमींवर यवतमाळ येथे उपचार सुरू -NNL<p><span style="font-size: medium;"><strong></strong></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: medium;"><strong><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPmHD1b5lG3Ir6MY_OK05YyEkLOksDvObm1K7OP4HrRRgI4WH3P2Z_cRaKW2GkVuSfGhqAOM5dlhIGp9i5Xh3CctceeePKrP0X8u6zi2EHWNalVJlR5rTEvDXQezmsDzahfRkdo1fYcluQ8luhrpvLgj4ZZMLyhHK30poTKizYXyGj_NeR_zOTfiDku_c/s960/IMG-20230630-WA0009.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="960" data-original-width="951" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPmHD1b5lG3Ir6MY_OK05YyEkLOksDvObm1K7OP4HrRRgI4WH3P2Z_cRaKW2GkVuSfGhqAOM5dlhIGp9i5Xh3CctceeePKrP0X8u6zi2EHWNalVJlR5rTEvDXQezmsDzahfRkdo1fYcluQ8luhrpvLgj4ZZMLyhHK30poTKizYXyGj_NeR_zOTfiDku_c/w634-h640/IMG-20230630-WA0009.jpg" width="634" /></a></strong></span></div><span style="font-size: medium;"><strong><br />श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर।</strong><span> बैलजोडी कुर्बानीसाठी घेऊन जात असल्याची माहीती मिळाल्यावरून गौरक्षक सोनु चौधरी व त्याचे मित्र यांनी पायी बैल जोडी नेत असलेल्या ईसमास विचारपुस केली. यावेळी चौकात असलेल्या सलिम याने "ईसका बहोत हो रहा है" म्हणत लोखडी रॉडने मारहान केल्याची घटना दि,२९ रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.</span></span><p></p><p><span style="font-size: medium;"><img alt="" class="alignnone wp-image-14489 size-large" height="288" src="http://nandednewslive.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230630-WA0007-1024x461.jpg" width="640" /></span></p><p><span style="font-size: medium;"><span>गुरुवार दि,२९ रोजी बकरी ईद दिनी साय,६.३० वा गोरक्षक सोनु चौधरी वय २३ (फ्रेंड्स जीम चालक)व त्याचा मित्र अतिष राठोड वय २५ हे मोटार सायकलने जीम कडे जात असताना सोनूस फोन आला की, दत्तनगर येथील अरविंद जयस्वाल याच्या घरा समोरून एक इसम पायी बैल जोडी नेत असुन, सदरील बैलजोडी कुर्बानी करीता नेत आहे असे समजले. त्यामुळे चौधरी ने त्याचे मित्र मंगेश सुर्यवंशी, कालीदास नैताम, सचिन राठोड यास बोलावून टिपु सुलतान चौकातुन जयस्वाल याच्या घराकडे </span><span>जात असतांना संजय किसन गायकवाड हा दोन बैल घेउन ईलु चौकाकडे येत होता.</span></span></p><p><span style="font-size: medium;"><img alt="" class="alignnone wp-image-14490 size-large" height="288" src="http://nandednewslive.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230630-WA0008-1024x461.jpg" width="640" /></span></p><p><span style="font-size: medium;">त्यास विचारपुस केली असता सदरील बैलजोडीचे दाखले सलीम कुरेशी याच्या कडे आहेत. त्याला फोन लाउन बोलावतो असे गायकवाड म्हणाल्याने सोनु चौधरी यांने मंगेश व कालीदास यास पोलीस मदत बोलाविण्या करीता पोलीस स्टेशनला पाठविले. त्यादरम्यान सचिन व सोनु त्याठिकानी थाबले त्याचवेळी सलिम कुरेशी, बाबुशा ठेकेदार,आसिफ हसन,सलिम ॲटोवाला,अनिस चिनी ऊर्फ शोयब शेख, एजाज,सोहल शेख व मोईन व ईतर लोक तेथे आले व "ईसका बोहोत हो रहा है ईसे आज खत्म करेंगे" असे म्हणून सलीम ॲटोवालाने रॉड डोक्यात मारला व इतरांनी त्यांच्या हातातील काठ्यानी लाथाबुक्याने व दगडाने सोनु चौधरी यास जिवे मारण्याच्या उदेश्याने मारहान करत होते.</span></p><p><span style="font-size: medium;">दरम्यान चौधरी यांचे मित्र व पोलीस येतांना दिसताच सर्वांनी घटनास्थळावरून पळ काठला. यात सोनु चौधरी यास मोठ्या प्रमानात डोक्यात मार लागला असुन, प्रथम माहूरच्या ग्रामीण रूग्णालय दाखल केले. डोक्यास अधिक मार असल्याने पुढील उपचार करीता यवळमाळ येथे हलविण्यात आले. घटनेचे गाभिर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकुष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरने यांनी रात्रीच धावघेत पाच जनाना अटक केली आहे. तर अनेक जण फरार झाले असून, त्यांचा शोध सूरू आहे. या घटनेच्या निषेर्धान माहुर शहर दि ३० रोजी बंद पुकारण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दाखल झाला असुन, माहूर शहरात तनावपूर्ण शातता आहे.</span></p><p><span style="font-size: medium;">दि.२९ रोजी माहूर येथे सोनू चौधरी यास काही लोकानी मारहाण केली होती. त्या बाबत माहूर पोलिस ठाण्यात 10 आरोपी आणि त्यांच्यासोबत इतर यांच्या विरोधात भादवी 307(जीवे मारण्याचा प्रयत्न), 395( दरोडा) पोलिस आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. त्यातील महत्वाचे 5 आरोपी आता पर्यंत अटक केलेले आहेत . सर्व माहूर वासियानी खुप सहकार्य केलेले आहे असेच सहकार्य करून माहूर शरहरात शांतता राहील यासाठी मदत करावी. असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे . कोणतीही अफवा पसरू नका काही आक्षेपार्ह समजले तर तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क करावा असेही पोलिस निरीक्षक माहूर यांनी कळविले आहे.</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-61270336212487056402023-06-30T21:36:00.001+05:302023-06-30T21:36:03.396+05:30सामाजिक वनीकरण विभागाला भ्रष्टाचाराची वाळवी; हदगांवच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह सहा अधिकारी- कर्मचारी निलंबित -NNL<p><strong style="font-size: 18px;"></strong></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><strong style="font-size: 18px;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjcidmIFvGfhofwCpRlFsATpa9GCNxH9cg8S006Vc923DlKR1--MwkJ_F6kfacQK_TieSy-nNEK9GhE6o1g6lKG5q38PdQPAlPzfyCN5EfOeRBOjhWXC_Zzff0nwhQPHJlASEfQW5QqT9-ZZFCxYozJcYNTmk4sDs9XchANjxragaGKKiuYs9ETvLdsnwQ/s400/admin-ajax.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="316" data-original-width="400" height="506" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjcidmIFvGfhofwCpRlFsATpa9GCNxH9cg8S006Vc923DlKR1--MwkJ_F6kfacQK_TieSy-nNEK9GhE6o1g6lKG5q38PdQPAlPzfyCN5EfOeRBOjhWXC_Zzff0nwhQPHJlASEfQW5QqT9-ZZFCxYozJcYNTmk4sDs9XchANjxragaGKKiuYs9ETvLdsnwQ/w640-h506/admin-ajax.jpg" width="640" /></a></strong></div><strong style="font-size: 18px;"><br />नांदेड/हदगाव/हिमायतनगर।</strong><span style="font-size: 18px;"> संबंध महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेल्या भोकरपाठोपाठ हदगांव-हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाकडून केलेल्या वृक्षलागवड व संगोपण कामाच्या गैरव्यवहारात हदगांवच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती आरती पुणसे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वनपाल अण्णासाहेब वडजे,गंगाधर टेकाळे व वनरक्षक कु.मनुका राठोड,राजरत्न साबने,कु.ज्योती कुटे पाटील यांना निलंबित करण्यात आलेले असून याच गैरव्यवहारात यापूर्वी तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक व अतिरिक्त कार्यभारात असलेले येथिल विभागीय वन अधिकारी आशिष हिवरे यांना तसेच, तत्पूर्वी भोकरच्या अधिकारी- कर्मचारी यांनाही निलंबित करण्यात आल्याने या विभागाला जणू भ्रष्टाचाराचीच वाळवी लागल्याचे दिसून येते. पहिल्यांदाच या विभागात कारवाईच्या मालिकांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने धास्तीनेच या गैरव्यवहारात अडकलेले अनेकजण स्वतःच्या बचावासह क्लीनचिट मिळविण्यासाठी जोमाने प्रयत्न करित असल्याची चर्चा रंगली आहे.</span><p></p><p><span style="font-size: 18px;">याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून पर्यावरणसमृद्धीसह जलसिंचन वाढ व अन्य बाबीदृष्टीने विविध योजनांपाठोपाठ गत कांही वर्षात कोटींची उड्डाने घेत महत्वाकांक्षी योजना म्हणून वृक्षलागवडीसह त्यांच्या संगोपनासाठीही कोट्यावधीचा खर्च करण्यात आलेला असतांना मुख्यत्वे नांदेड जिल्ह्यात मात्र तो जणू कागदावरच राहिल्याचा प्रत्यय या प्रकरणाच्या माध्यमातून येत असून नांदेडच्या सामाजिक वनीकरण विभागात बहुतांश परिक्षेत्रात वृक्षलागवडच नसल्याने संगोपन दूरच राहिले मात्र यावरचा खर्च उचलून मात्र संगनमतातून वाटाघाटीत अनेकांनी आर्थिक उंची गाढली आहे.याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीसह वनप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व जागरुक नागरिकांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. अनेक वृत्तपत्रांतून पुराव्यानिशी वृत्तही प्रकाशित झाले परंतु, कुंभकर्णी झोपेच्या सोंगाधीन बनलेल्या या विभागाच्या बहुतांश वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्षच केले होते. अनेकांना आर्थिक वाटेकरी बनवून थंड करतांनाच काहीजण सामाजिक भावनेतून सातत्याने पाठपुरावा करित असल्याने त्यांच्यावरही उपाययोजनांची प्रसंगी दमदाटीही झाली. </span></p><p><span style="font-size: 18px;">तरिही येथिल वनविभाग प्रकरणनिहाय चौकशीसह सद्यातरी कारवाईपासून दूर आहे.मात्र सामाजिक वनीकरण विभाग चांगलाच चर्चेत आला. त्यासाठीचे निमित्त ठरले महाराष्ट्र विधीमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन. वनपरिक्षेत्र व सामाजिक वनीकरण विभागातील वृक्षलागवड व संगोपनाच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा येथे चा॔गलाच चर्चीत आला अन् सामाजिक वनीकरण विभागातील भोकरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले.तर,हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील सन् २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील कामाची चौकशी लातूर,उस्मानाबाद, जालना व परभणी येथिल सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. या चारही नियुक्त चौकशी पथकप्रमुखांना सहकार्यासाठी वनपरिक्षेत्रातील अन्य चार अधिकारी नियुक्त करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रारंभी या गंभीर बाबीकडे वेळ मारुन नेत जणू दुर्लक्षच केले काही काळानंतर त्यातील काहींनी चोख कर्तव्य बजावले तर, कांहीनी चौकशीचा फार्सच आळविला.</span></p><p><span style="font-size: 18px;"> त्यात भरिस भर देत औरंगाबादच्या वनसंरक्षकांकडून क्षेत्रीय पहाणीच्या गोंडस नावाखाली हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील निवडक कामांची पहाणी करुन त्यांच्या विभागाचे क्षेत्र नसतांनाही नियमबाह्यपणे किनवट तालुक्यातील इस्लापूरमध्ये चांगलाच पाहूणचार घेतला होता.विशेष बाब म्हणजे त्यांचेसमवेत एका चौकशीपथकानेही चालू चौकशीचे कार्यक्षेत्र सोडून याठिकाणी आलेले होते.त्यांच्या या कार्यपद्धतीसह वरिष्ठांनी दिलेल्या विहित कालमर्यादेत चौकशी पथकांकडून चौकशीसह याबाबतचा अहवालाच्या विलंबामूळे हा केवळ चौकशीचा फार्सच असल्याचे जाणवत असल्यानेच या प्रकरणात आम्ही परखडपणे लिखाण केलेले होते. वरिष्ठांकडून प्राप्त आदेशानुसार व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अभिलेखे व दस्तावेज ताब्यात घेऊनच संयुक्त स्थळ पहाणी व तपासणी करणे अत्यावश्यक असले तरिही चारही चौकशी समित्यांनी वेळकाढूपणा करित सोयीनुसारच चौकशी केली होती.</span></p><p><span style="font-size: 18px;">प्रारंभी लातूर व उस्मानाबादच्या विभागीय वन अधिकाऱ्यांकडून विविध कामांची पहाणी व तपासणी करण्यात आली होती तर,कांही दिवसांपूर्वी परभणी येथिल विभागीय वन अधिकाऱ्यांनी औरंगाबादचे प्रभारी वनसंरक्षक अमित मिश्रा या आपल्या वरिष्ठांसह मोजक्याच कामांना भेटी देऊन किनवट तालुक्यातील ईस्लापूर येथे नियमबाह्यपणे पाहूणचार घेऊन भोकरमार्गे नांदेड मुक्कामी येऊन अर्धवट चौकशी करून निघून गेले होते तोच कित्ता गिरवित जालना येथिल विभागीय वन अधिकाऱ्यांनीही मोजक्याच कामांना भेटी दिल्यानंतर त्यांच्याकडे साक्ष व जवाब नोंदविण्यासाठीही संबंधित स्थानिकांनी पाठ फिरवली होती त्यामूळेच या चारही चौकशी पथकांकडून स्थळ पहाणी व तपासणी झाल्याने व भोकरच्या प्रकरणात दोषी असतांनाही निवडक वरिष्ठांची मेहरनजर असलेले आशीष हिवरे हे वरिष्ठ पाठीशी असल्यानेच संबंधित अधिकारी व कर्मचारी आपल्यालाही क्लीनचिट मिळणार असल्याच्या अविर्भावात होते.</span></p><p><span style="font-size: 18px;"> परंतू, अचानकपणे लातूर व उस्मानाबाद विभागीय वन अधिकाऱ्यांनी पूनश्च नांदेडात येऊन केलेल्या स्थळ पहाणी व तपासणीबाबत संबंधित स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांची साक्ष व जवाब नोंदविली तर,या प्रकरणात अन्य दोन चौकशी पथकप्रमूखांनी अर्धवट चौकशी करुन काढलेला पळ त्यांच्या चांगलाच अंगलट येत असल्याने त्यांनीही पूनश्च नांदेडवारी करुन त्यांच्यासह या चारही चौकशी पथकांकडून विविध कामांची स्थळ पहाणी व तपासणी पूर्ण केली होती. महत्वाचे म्हणजे,या चौकशीच्या कालावधीत ऐन उन्हाळ्यात वृक्षलागवड करण्यात आली सोबतच,दोषी असलेल्या आशीष हिवरे यांना पदावर ठेवूनच त्यांच्या व संबधितांच्या मर्जीप्रमाणेच कामांच्या स्थळ पहाणी व तपासणी करण्याचा प्रयत्न प्रारंभी झाला होता.या प्रकरणात प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवूनच याबाबत आम्ही सातत्याने व परखडपणे लिखाण केलेले होते त्याच अनुषंगाने हिवरे यांच्याकडून विभागीय वन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेत येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांना देण्यात होता परंतू,पडद्यामागून सर्वच सूत्रे हिवरे यांच्याकडे असल्याचे दिसून येत असल्यानेच तेच येथिल कारभारी असल्याचा व वाबळे हे जणू नामधारी बनल्याचाही प्रत्यय यापूर्विही येत होता.</span></p><p><span style="font-size: 18px;">प्रत्येक वरिष्ठांपर्यंत स्वतःचे संगनमत असल्याच्या अविर्भावात त्यांच्याकडून बोलल्या जात असल्याने त्यांच्यासह या प्रकरणातील दोषींविरुद्ध ठोस कारवाई होत नव्हती.त्यातच,भोकर तालुक्यातील अधिकारी- कर्मचारी यांच्यावर कारवाईपूर्वि त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा असतांनाही त्याऐवजी त्यांच्याकडेच येथिल विभागीय वन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांच्याकडूनच भोकरच्या तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल व वनपाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती. प्रकरणनिहाय तक्रारीत तथ्य असले तरिही हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील कामांच्या चौकशीसह याबाबत अनेक शकल लढविण्यात आल्या त्यात थेट चौकशीवेळी ऐन उन्हाळ्यात वृक्षलागवड करुन दर्जेदार कामे दाखवून सर्वच कामे तपासणीऐवजी निवडक कामांची स्थळ पाहणीतून कागदोपत्रीच चौकशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता.परंतू,चौकशी केलेल्या निवडक कामामध्येही मोठा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट नमूद करुनच चारही नियुक्त चौकशी पथकांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात दोषींविरुद्ध कारवाईची मालिका सुरु झालेली आहे.</span></p><p><span style="font-size: 18px;">या प्रकरणात आपल्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होणार नसल्याच्या अविर्भावात असतांनाच तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक व अतिरिक्त कार्यभार असलेले विभागीय वन अधिकारी आशिष हिवरे यांच्यावर राज्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या पूणे येथिल प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ.सुनिता सिंग यांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केल्याने अनेक दोषींविरुद्ध कारवाई होणार असल्याचे निश्चित झालेले होते.परंतू,हिवरे यांना प्रकरणात तातडीने क्लीनचिट मिळावी यासाठी वरिष्ठांकडून आदेश असतांनाही काहीजण अन्य दोषींच्या बचावासाठी प्रयत्नशील होते.त्यामूळेच या प्रकरणात अनेकांवर कारवाई होणे अपेक्षित असतांनाही सध्यातरी कार्यरत अधिकारी- कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.</span></p><p><span style="font-size: 18px;">हदगांवच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती आरती नामदेव पुणसे यांच्यावर संपूर्ण प्रकरणात कामाच्या गुणवत्तेत व परिमाण राखण्याच्या बाबतीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्याने तसेच,जाणीवपूर्वक गैरव्यवहार आणि कामाचे परिमाण कमी दाखविले असतांना संपूर्ण कामावर प्रस्तावित रक्कम खर्ची घालून शासकीय रक्कमेचा संगनमताने अपहार झाल्याचे निदर्शनास येते आणि ज्याअर्थी चौकशी अहवालात कामे न झाल्याचे निष्पन्न झाल्यावर नव्याने अवकाळी म्हणजे उन्हाळ्यात रोपे लावून चौकशी समितीची दिशाभूल करुन प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून औरंगाबाद येथिल सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.</span></p><p><span style="font-size: 18px;">क्षेत्रीय कामांमध्ये कर्तव्य परायणता न ठेवणे,नितांत सचोटी न राखणे, हेतूपरस्पर कर्तव्यामध्ये कसूर करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, स्वतःचा आर्थिक लाभ करुन घेण्याच्या हेतूने कोणत्याही आर्थिक किंवा ईतर आवबंधनामध्ये गुंतवून घेणे, नागरी सेवक म्हणून पदांचा गैरवापर करुन आर्थिक लाभ मिळविणे आदी विविध गंभीर स्वरुपाच्या अनियमितता आढळून आल्याने सामाजिक वनीकरण विभागातील हदगांव येथिल वनपाल अण्णासाहेब देविदास वडजे,गंगाधर पुरभाजी टेकाळे यांच्यासह वनरक्षक कु.मनुका गणेश राठोड,राजरत्न कोंडिबा साबणे,कु.ज्योती ज्ञानोबाराव कुटे पाटील यांना निलंबित करण्यात आलेले असून, येथिल सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांच्याकडून संबधितांवर सदरची निलंबन कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान निलंबित करण्यात आलेल्या हदगांव कार्यालयातील दोन वनपालासह तिन्ही वनरक्षकांना निलंबन कालावधीत वनपरिक्षेत्र अधिकारी (सा.व.), नांदेड हे मुख्यालय देण्यात आलेले असून याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत.</span></p><p><span style="font-size: 18px;"><strong>अनेक दोषींविरुद्ध कारवाईची टांगती तलवार !</strong></span><br /><span style="font-size: 18px;">महत्वाचे म्हणजे या प्रकरणात हदगांव-हिमायतनगर तालुक्यातील तत्कालीन अनेक अधिकारी-कर्मचारी क्लीनचिट मिळविण्यासाठी चांगलेच प्रयत्नरत बनल्याचे बोलल्या जात असले तरिही याच प्रकरणात कांही वरिष्ठांचेही हात गुंतलेले असल्याने त्यांच्याकडूनही बचावात्मक पावित्रा घेण्यात येत आहे. या प्रकरणातील प्राप्त चौकशी अहवालात आढळून आलेल्या सर्वच दोषींविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत नांदेड न्यूज लाईव्हने सतत पाठपुरावा केल्यामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमात भ्रष्टाचार करून गलेलठ्ठ झालेल्या अधिकारी व काही स्वार्थी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही झाली. तर काहींवर निलंबनची टांगती तलवार दिसते आहे.</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-55005209605127720172023-06-30T21:33:00.003+05:302023-06-30T21:39:43.320+05:30पर्वीचे नायब तहसिलदार आता हदगाव तालुक्याचे तहसिलदार व उपविभागीय आधिकारी -NNL<div><span style="font-size: 18px;"><strong><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjGDkDvh1aGWyRUhDKbgL8JstgPLny-UgUQXU1bHcgPaW_zxYH-Br7KjggsBp935SENxExphvJlYLMgJtrb9zaCDL626JS_24RPSOHMa7MxrdMfx3h11f1jaZXrRNvnxQZA-UP2YAlHgojwqijnQsg8n4jpR_6UflZjWJ8VCN9cFdYNLgl-AfU0JRYmCVQ/s1280/Sand-cover.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="809" data-original-width="1280" height="404" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjGDkDvh1aGWyRUhDKbgL8JstgPLny-UgUQXU1bHcgPaW_zxYH-Br7KjggsBp935SENxExphvJlYLMgJtrb9zaCDL626JS_24RPSOHMa7MxrdMfx3h11f1jaZXrRNvnxQZA-UP2YAlHgojwqijnQsg8n4jpR_6UflZjWJ8VCN9cFdYNLgl-AfU0JRYmCVQ/w640-h404/Sand-cover.jpeg" width="640" /></a></div><br />हदगाव, शे.चांदपाशा|</strong> काही वर्षापुर्वी हदगाव तहसिल कार्यालयामध्ये तलाठी व नायब तहसिलदार म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी व अधिकारी आता तेच नायब- तहसिलदार व तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी व हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी म्हणून नुकताच काही दिवसापुर्वी ह्या तीन अधिका-यानी प्रशासकीय पदभार घेतलेला आहे.</span></div><div> </div><div><span style="font-size: 18px;">हा तालुक्याच्या दृष्टीने 'योगायोग' म्हणावे लागेल. यापुर्वी आनिल तामसकर हे अंदाजे २००९ च्या दरम्यान हदगाव तहसिल कार्यालयमध्ये तलाठी म्हणून रुजू झाले होते. ते आता ते नायब तहसिलदार (महसुल २) मध्ये रुजु झालेले आहे. यानंतर १० ते १५ वर्षापुर्वी विनोद गुड्डमवार हे नायब तहसिलदार म्हणून कार्यरत होते. आता तेच हदगाव तहसिल कार्यालयचे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी म्हणून त्यांनी पदभार घेतलेला आहे. अणखीन विशेष म्हणजे अरुणा संगेवार ह्या पण हदगाव तहसिल कार्यालय मध्ये काही वर्षापुर्वी नायब तहसिलदार म्हणून कार्यरत होत्या. आता त्या हदगाव व हिमायनगर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी म्हणून आलेल्या आहेत.</span></div><div> </div><div><span style="font-size: 18px;">हे तिन्ही अधिका-याना हदगाव तालुक्याच्या राजकीय सामाजिक जाण असली तरी १० ते १५ वर्षापुर्वीची राजकी परिस्थिती व आताच्या राजकीय वातावरणात खुप फरक आहे. तालुक्यात सध्या गौणखनिज माफीयांनी चांगलेच बस्तान बसविलेले आहे. या तिन्ही अधिका-यासमोर मोठ अवाहन राहणार आहे. हे अधिकारी कशी राजकीय परिस्थिती हातळणार आहेत. याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.</span></div><div> </div><div><span style="font-size: 18px;">रेती माफीया मुळेच हदगाव तालुकूयातील रेतीघाट खूले करण्यात आले नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पेंनगंगा नदीवरील हदगाव हद्दजवळ विदर्भातील उमरखेड तहसिल कार्यालय गुरफळी गट रेतीघाट सुरु होते. पण हदगाव तहसिलच्या गौण खनिज विभागाने सुरु न केल्याने रेती तस्कांराना संधी मिळाली. यावर आता हे तहसिलदार व उपविभागीय अधिकारी कश्या प्रकारे या रेती तस्कारावर आळा घालतील. हे येणारा काळच ठरविणार आहे हे आवर्जून उल्लेख करावा लागेल. </span></div>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-9460714920562885782022-12-30T07:09:00.001+05:302022-12-30T07:09:20.492+05:30सोनारी फाटा येथे ४ जानेवारीला भव्य एकदिवसीय बौद्ध धम्म परिषद -NNL<p><b><span style="font-size: large;">भन्तेजींची धम्मदेसना,विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, बुद्ध-भिम गिते व सत्यपालाची सत्यवाणी आदी भरगच्च कार्यक्रम</span></b></p><p><b><span style="font-size: large;">संयोजक त्रिरत्नकुमार भवरे व निमंत्रक कैलासराव माने पोटेकर, सुधाकर पाटील सोनारीकर यांनी दिली माहिती</span></b></p><p><span style="font-size: large;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhCQPCXiycrLtsUGPD_RiOHNcC6aXCyRu1K_7JAiAz406iKAdm4L5XKqM5XwmWZQGRkhUo2lZZtpnAEMCbogQ0h2KxXwflT-NPkY-P6k-fi6WYb6NaiVrWVYoBYxX2sQnzhOecNLniSK4myT2ZYSckwB3RvGbdlyCS-O8nS_GtcUEpTh_GORqsg-USO/s1018/IMG-20221230-WA0000.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1018" data-original-width="676" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhCQPCXiycrLtsUGPD_RiOHNcC6aXCyRu1K_7JAiAz406iKAdm4L5XKqM5XwmWZQGRkhUo2lZZtpnAEMCbogQ0h2KxXwflT-NPkY-P6k-fi6WYb6NaiVrWVYoBYxX2sQnzhOecNLniSK4myT2ZYSckwB3RvGbdlyCS-O8nS_GtcUEpTh_GORqsg-USO/w424-h640/IMG-20221230-WA0000.jpg" width="424" /></a></b></span></div><span style="font-size: large;"><b><br />हिमायतनगर।</b> हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड द्वारा दि. ४ जानेवारी रोजी एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी परिसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमस्थळी जय्यत तयारी सुरू झाली असून यंदाच्या धम्म परिषदेला महाराष्ट्रातील थोर सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा सत्यवाणी कार्यक्रम होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने आयोजक व निमंत्रकांनी जय्यत तयारी सुरू केली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला बोलताना दिली.</span><p></p><p><span style="font-size: large;">एक दिवसीय धम्म परिषदेचे अध्यक्ष हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर तर उदघाटक म्हणून किनवट- माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम व स्वागताध्यक्ष प्रा.मोहन मोरे माजी नगराध्यक्ष पूर्णा हे उपस्थित राहणार आहेत. एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदे निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२२- २३ प्राप्त अभि.प्रशांत ठमके, भाजपा नेते बालाजी बच्चेवार, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ अध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी. माळोदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहाय्यक वनसंरक्षक बी.एन. ठाकूर,डॉ.आनंद सूर्यवंशी, सेवानिवृत्त शिक्षिका जनाबाई मारुतीराव पोपुलवार,</span></p><p><span style="font-size: large;">हिंगोलीचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके, बी.एस.चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी हिमायतनगर,अनिल महामुने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती किनवट, बि.डी. भुसनूर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिमायतनगर,समतादूत राणीपद्मावती बंडेवार,डॉ.राजेंद्र वानखेडे हिमायतनगर, पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे, नांदेड जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे, अभि. श्रीराज भवरे, साहित्यिक डॉ.मारुती वाघमारे आंदेगावकर, सौ. उजमा पठाण ग्रामसेविका धानोरा, अभि.भरतकुमार कानिंदे एकंबेकर आदी मान्यवरांना या ठिकाणी गौरवण्यात येणार असल्याची माहिती निमंत्रक कैलासराव पोटेकर व सुधाकर पाटील यांनी दिली.</span></p><p><span style="font-size: large;">सोनारी फाटा येथील एकदिवशीय बौद्ध धम्म परिषदेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शांताबाई पवार, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर, शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर,माजी आमदार विजयभाऊ खडसे उमरखेड, लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर,माजी महापौर शीलाताई किशोर भवरे,शफकत आमना मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर, डी.एन. गायकवाड तहसीलदार हिमायतनगर, एम.डी.आंदेलवाड गटविकास अधिकारी हिमायनगर, एस.एम.तायडे कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग भोकर,अशोक भोजराज जिल्हा जलसंधारण अधिकारी जि.प. नांदेड,</span></p><p><span style="font-size: large;">अभि. सुनील पोपुलवार,प्राचार्या शुभांगीताई ठमके, हिमायतनगर गट शिक्षण अधिकारी आर.आर. जाधव,विभागीय वन अधिकारी आशिष हिवरे,सहाय्यक वनसंरक्षक जी.डी.गिरी,वन परिक्षेत्र अधिकारी भोकर पी.एस.मोडवान,वन परिक्षेत्र अधिकारी अनिल रासने,हदगांव न.प.माजी उपगनराध्यक्ष सुनिलभाऊ सोनुले, अभि. विजय कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे, डॉ. प्रमोदकुमार अंबाळकर, डॉ. पी.बी. नामवाड, डॉ.इरवंत पल्लेवाड, बालाजी नागमवाड, जेष्ठ पत्रकार विजय जोशी, प्रकाश कांबळे, प्रदीप नागापूरकर,परमेश्वर गोपतवाड, अनिल मादसवार, बालाजी राठोड,उत्तम कानिंदे, अभि. मिलींद गायकवाड, मंगेश कदम, शाहीर नरेंद्र दोराटे,किशनराव ठमके आदी मान्यवर या धम्म परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.</span></p><p><span style="font-size: large;">बौद्ध धम्म परिषदेच्या द्वितीय सत्रामध्ये दुपारी दोन वाजता बुद्ध- भीम गीतांचा व प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. भिमशाहिर बापूराव जमदाडे, गायिका सुरेखा रंगारी चंद्रपूर, नालंदा सांगवीकर नांदेड, रविराज भद्रे मुखेड,गायक शंकर दादा गायकवाड भोसीकर यांचा दणदणीत गीतांचा कार्यक्रम होणार आहे तर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील थोर सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांची सत्यवाणी यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.</span></p><p><span style="font-size: large;">सदर कार्यक्रमाची जयत तयारी सुरू असून डॉ. मनोज राऊत, लक्ष्मणराव मा. भवरे, कानबा पोपूलवार,पांडुरंग मिरासे, शिवाजी डोकळे,विष्णू वानोळे,शेख खय्युम, नागनाथ वच्चेवाड, परमेश्वर वालेगावकर, अविनाश कदम,बसवंत कांबळे, नागोराव मेंडेवाड, सुभाष गुंडेकर, केशव माने, जगन्नाथ नरवाडे, प्रताप लोकडे, गौतम राऊत, रामकुमार गुंडेकर, संजय गुंडेकर, सुर्यकांत खिराडे, किरण वाघमारे,यशवंत थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.</span></p><p><span style="font-size: large;">परिसरातील सर्व नागरिकांनी एकदिवशीय धम्म परिषदेमधील तिन्ही सत्राच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक त्रिरत्नकुमार भवरे, निमंत्रक कैलासराव माने पोटेकर,सुधाकर पाटील सोनारीकर,बालाजी राठोड आदींनी केले आहे.</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-36751330656179989472022-12-16T17:16:00.000+05:302022-12-16T17:16:33.157+05:30ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश -NNL<p><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEgprSfKkaALlM2EJA9riAts5xhNMoSXxbY-8h_ObsI569U1JU1-0tCmC4GVNNoW3MPXAA--UlmaBIfh-I_ByfLrVVatYq378CD4V89dQFRWAioHjNFnUahdDHPrbK8CJ6cz0KCt5aCGfuHOaYSHB2Xj6kzDFSq76aoHics4c2GGsPuOEn2QJfwyR4/s800/deshidaru.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="533" data-original-width="800" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEgprSfKkaALlM2EJA9riAts5xhNMoSXxbY-8h_ObsI569U1JU1-0tCmC4GVNNoW3MPXAA--UlmaBIfh-I_ByfLrVVatYq378CD4V89dQFRWAioHjNFnUahdDHPrbK8CJ6cz0KCt5aCGfuHOaYSHB2Xj6kzDFSq76aoHics4c2GGsPuOEn2QJfwyR4/w640-h426/deshidaru.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><br />नांदेड|</b> जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3, एफएलबीआर-2, टि.डी-1 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे. </span><p></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">जिल्ह्यात मतदानाचा पूर्वीचा दिवस शनिवार दिनांक 17 डिसेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. </span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र देशी दारू नियम, 1973 चे नियम 26 (1) (सी) (2) व मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या ) नियमावली, 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (2) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-3047548957249505482022-12-16T17:14:00.001+05:302022-12-16T17:14:42.409+05:30लक्ष्मीकांत कहाळेकर याच्या वसतिगृह खर्चसाठी चिखलीकरांचा पुढाकार;७५ हजारांची रोख मदत -NNL<p><span style="font-family: Mukta; font-size: large;"><span style="background-color: white; color: #222222;"><b></b></span></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhe2sbNI_v7IN0mUQNWU7r8uWmkiFrOJpaUE8Iz-6vYOx2J4suLVoUO3wLHPCT9VNt0A0y9KWaDbq83vsUaFrZr_m3cZZ2Q8jCNz9IZRpBHsS7-OS56l_MShVbHupe9_VdMzT6Nyq5_J4hvgydzApLtOFlRefMpN1S1FArkhCmUi7pWoypOgoVVBu6c/s1080/FB_IMG_1671186460391.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="486" data-original-width="1080" height="288" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhe2sbNI_v7IN0mUQNWU7r8uWmkiFrOJpaUE8Iz-6vYOx2J4suLVoUO3wLHPCT9VNt0A0y9KWaDbq83vsUaFrZr_m3cZZ2Q8jCNz9IZRpBHsS7-OS56l_MShVbHupe9_VdMzT6Nyq5_J4hvgydzApLtOFlRefMpN1S1FArkhCmUi7pWoypOgoVVBu6c/w640-h288/FB_IMG_1671186460391.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><br />लोहा| </b><span style="background-color: white; color: #222222;">जुन्या लोह्यातील लक्ष्मीकांत चंद्रकांत कहाळेकर हा विद्यार्थी आर्थिक बिकट परिस्थितीमुळे एमबीबीएस साठी पात्र झाला पण आर्थिक परिस्थिती तो जाऊ शकत नव्हता या बाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या नंतर अनेकजण मदतीसाठी पुढे आले. शिवणकाम करणाऱ्या आईचे स्वप्न साकार झाले .जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर याच्या मार्गदर्शना खाली युवा नेते प्रवीण पाटील व प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी लक्ष्मीकांत यांच्या वसतिगृह फिस उर्वरित काळात उचलण्याचे आश्वासित केले आणि प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी घरी जाऊन त्यास नगरी ७५हजार रुपयांची मदत दिली .यावेळी माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, उपनगराध्यक्ष दत्तराव वाले उपस्थित होते.</span></span><p></p><div dir="auto" style="background-color: white; color: #222222;"><span style="font-family: Mukta; font-size: large;">जुन्या लोह्यातील लक्ष्मीकांत काहलेकर या गरीब विद्यार्थ्यांचा एमबीबीएस प्रवेश पैशा अभावी हुकणार होता. दै प्रजावाणी मध्ये रविवारी वृत्त प्रसिद्ध आणि सेवानिवृत्त अधिकारी रामदास पाटील यांच्या पुढाकाराने ४लक्ष३०हजार रुपयांची मदत झाली तसेच अनेक दानशूर पुढे आले आणि लक्ष्मीकांत यांचा एमबीबीएस प्रवेश निश्चीत झाला.त्याच वेळी जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर व प्राणिताताई यांनी लक्ष्मीकांत याना सहकार्य करण्याचे आश्वसित केले. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचा हस्ते लक्ष्मीकांत कहाळेकर यांना 75 हजार रुपये रोख स्वरूपात देण्यात आले.तसेच आई व मुलगा यांचा सत्कार करण्यात आला .तुझ्या सोबत आम्ही आहोत पैशा अभावी तुझ्या शिक्षणात खंड पडणार नाही.</span></div><div dir="auto" style="background-color: white; color: #222222;"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><br /></span></div><div dir="auto" style="background-color: white; color: #222222;"><span style="font-family: Mukta; font-size: large;">तसेंच खा प्रतापराव पाटील चिखलीकर व जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचा पुढाकाराने डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील यांचाशी चर्चा करून लक्ष्मीकांत कहाळेकर याचा पुढील उर्वरित वर्षाचा वसतिगृह चा खर्च उचलण्याचे प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी आश्वासन दिले.आणि त्यांना रोख ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.यावेळी माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार , उपनगराध्यक्ष दता वाले, नगरसेवक भास्कर पाटील, हरिहर धुतमल, काशिनाथ शिरसिकर, युवा कार्यकर्ते दीपक पाटील कानवटे, सचिन मुकदम, बाळू कदम, प्रवीण धुतमल, बाळू पवार, भगवान चव्हाण, विमलबाई चव्हाण, कैलास कहाळेकर, शिवा मुंडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. </span></div>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-26523330748555835142022-12-16T15:05:00.003+05:302022-12-16T15:05:41.676+05:30आयुर्वेद उपचाराने कर्क रोगाचे निदान प्रभावी : गिल -NNL<p><span style="background-color: white; color: #222222;"><b><span style="font-family: Mukta; font-size: large;">आयुर्वेद प्रणालीने पाच वर्षात 33 रुग्णांना लाभ </span></b></span></p><div dir="auto" style="background-color: white; color: #222222;"><div dir="auto"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi5SMaisfevTtWx6YwvnJpbNKQmubxkvPVtzwS3Qvp0LgD6c6H2GAYa8QyZaqr8fuRRy1NXbqA8CBgO6GKXmEs4DzDFU4BVPCkcrxzWyuoDs_YBWARW_o-a-JymId2eO4VXYNH8Hjl4ZOve4vviI06p0RaQDkMiFMIK5kjLAo0isZyWjISGmMiEa_J-/s420/aurwed.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="315" data-original-width="420" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi5SMaisfevTtWx6YwvnJpbNKQmubxkvPVtzwS3Qvp0LgD6c6H2GAYa8QyZaqr8fuRRy1NXbqA8CBgO6GKXmEs4DzDFU4BVPCkcrxzWyuoDs_YBWARW_o-a-JymId2eO4VXYNH8Hjl4ZOve4vviI06p0RaQDkMiFMIK5kjLAo0isZyWjISGmMiEa_J-/w640-h480/aurwed.jpg" width="640" /></a></div><br />नांदेड| </b>वर्तमान परिस्थितीत कर्क रोगाचे प्रसार झपाट्याने होत आहे. कर्क रोगाच्या निदानासाठी एलोपैथी उपचार प्रणाली पेक्षा आयुर्वेद उपचार प्रणाली खूपच प्रभावशाली आहे. त्यामुळे कर्क रोगाच्या उपचार निदानासाठी शासनाने सुद्धा आयुर्वेद उपचार प्रणाली विषयी जनजागृती करावी अशी मागणी कर्क रोग उपचार क्षेत्रात भरीव योगदान देणारे अमर सेवा आश्रम ट्रस्ट चे संचालक सरदार अमरजीतसिंघ गिल यांनी नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांना पत्र पाठवून केली आहे. कर्क रोगाच्या उपचारात गरीब व सामान्य रुग्णांना लाभ मिळावे अशा धारणेने सक्रिय सेवा देणाऱ्या स. अमरजीतसिंघ गिल यांच्या कार्याचा गौरव हिंगोलीचे खासदार मा. हेमंत पाटिल यांनीही शुभेच्छा पत्राद्वारे केली आहे. </span></div><div dir="auto"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><br /></span></div><div dir="auto"><span style="font-family: Mukta; font-size: large;">अमरजीतसिंघ गिल यांनी पत्रात नमूद केले आहे की कर्क रोगाच्या प्रतिकारासाठी एलोपैथी उपचाराने शंभर मधून ऐनतेन दहा रुग्णांनाच लाभ पोहचतो. तसेच केमो थेरपी व रेडिएशन उपचारामुळे रुग्णास मोठे त्रास सहन करावे लगते. आयुर्वेद प्रणालित कर्क रोगाचे उपचार शक्य असून मागील पाच वर्षात अमर सेवा आश्रम ट्रस्ट नांदेड येथे कर्क रोगाचे 33 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन आज चांगले जीवन जगताहेत. वरील विषयी स. अमरजीतसिंघ गिल यांनी माहिती दिली की, नांदेडच्या शहीदपूरा भागात असलेल्या अमर सेवा आश्रमात सर्व प्रकारच्या कर्क रोगाच्या उपचारासाठी औषोदोपचार केले जात आहे. येथे उपचार घेऊन स्वस्थ होणाऱ्या रुग्णांचे सर्व विवरण उपलब्ध आहेत. </span></div><div dir="auto"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><br /></span></div><div dir="auto"><span style="font-family: Mukta; font-size: large;">सध्या महाराष्ट्र भरातून रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत. खूपच कमी खर्चात रुग्णांना उपचार दिले जात आहे. याठिकाणी फक्त तंबाखूजन्य पदार्थ सेवन कारणाऱ्यांचे उपचार केले जात नाही असेही त्यांनी सांगितले. शासनास पाठवण्यात आलेल्या पत्रात त्यांनी मागणी केली आहे की जर गरीब व सामान्य रुग्ण असेल तर त्यांना अमर सेवा आश्रम ट्रस्ट येथे पाठविण्यात यावेत. सेवा तत्वाने रुग्णांना औषाधोपचार दिला जाईल. अमर सेवा आश्रम येथे उपचार घेऊन स्वस्थ झालेल्या रुग्णांनी देखील अमरजीतसिंघ गिल यांच्या कथनास दुजोरा दिला आहे. </span></div></div>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-32198547541202220442022-12-16T15:00:00.000+05:302022-12-16T15:00:45.575+05:30खडकी बा.- सरसम पांदण रस्त्याला मंजुरी; शेतकरी पांदण रस्त्यासाठी आक्रमक -NNL<p><b><span style="font-family: Mukta; font-size: large;">रस्त्यात अडथळा करणाऱ्या शेतकऱ्यास समाज देऊन अडथळा दूर करा; अन्यथा मरण उपोषण </span></b></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrFnsvIsJo59yam-dfv9fT3_lUywsvUKPoNvNODVqrmKMC4knUUWZcr5LQIWVGQJHfa4wmhHSKALgje2NQNgpCyY_VcmOazxT1v8Awk0Cqsk0Ys3EEGYByokzarHSsxb2G0QmEepWIw_YL5S3X_QFzSQW4z0gpqfbw5TSYcOpO9-9s5gufnK0ODFgS/s1920/IMG_20221216_133611.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1080" data-original-width="1920" height="360" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrFnsvIsJo59yam-dfv9fT3_lUywsvUKPoNvNODVqrmKMC4knUUWZcr5LQIWVGQJHfa4wmhHSKALgje2NQNgpCyY_VcmOazxT1v8Awk0Cqsk0Ys3EEGYByokzarHSsxb2G0QmEepWIw_YL5S3X_QFzSQW4z0gpqfbw5TSYcOpO9-9s5gufnK0ODFgS/w640-h360/IMG_20221216_133611.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><br />हिमायतनगर| </b>खडकी ते सरसम या पांदण रस्त्याला ग्रामपंचायत कडून पूर्वसंमती मिळाली, मात्र एका हेकेखोर शेतकऱ्यामुळे या रस्त्याचे काम सुरु होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. या शेतकऱ्याला समाज देऊन पांदण रस्त्याचे काम सुरु करा अन्यथा शेतकरी महिलांना घेऊन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.</span><p></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा. येथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खडकी ते सरसम या पांदण रस्त्याला ग्रामपंचायत कडून पूर्वसंमती मिळाली आहे. त्यामुळे दि.१५ डिसेंबर रोजी हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार होते. मात्र या रस्त्यावर असलेल्या एका शेतकऱ्याने रास्ता होऊ देणार नाही असा पवित्रा घेऊन अडवल्यामुळे संबंधित रस्त्याचे भूमिपूजन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. परिणामी या रस्त्यावरील असलेले इतर शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी थेट १६ डिसेंबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसील प्रशासनाला पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात करा. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भातील निवेदन खडकी येथील पुरुषांनी महिलांच्या उपस्थितीमध्ये हिमायतनगर येथील नायब तहसीलदार विकास राठोड यांना दिले आहे. रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरु न झाल्यास महिलासह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण बसण्याचे निवेदनात नमूद केले आहे.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">सदरील रस्ता पूर्ण झाल्यास येथील शेतकऱ्यासह सामान्य नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. कारण हा रास्ता कमी अंतरावर असून, सरसम येथे शासकीय कामासाठी रोज येथील गवारी शेतकऱ्यांना ये-जा करावी लागत असते. सरसम येथे स्टेट बँक असल्यामुळे खडकी हे गाव भारतीय स्टेट बँक सरसमशी सलग्न असल्यामुळे रोज नागरिकांना या रस्त्याने ये जा करावी लागत आहे. सदरील रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकाचा वेळ व पैसाही बचत होईल. त्याचबरोबर सरसम येथील नागरिकांना सुद्धा खडकी येथील रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी सोयीच होईल.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">गेल्या ५० वर्षांपासून या रस्त्याची मागणी शेतकरी वर्गातून होते आहे. असे आज निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांनि पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. खडकी बा.येथून नांदेड व आदिलाबादकडे रेल्वेने जाणाऱ्या नागरिकांना देखील हा रस्ता सोयीचा होणार असल्यामुळे हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. सदरील निवेदनावर साहेबराव भाऊराव जाधव, शामराव जाधव, आकाश जाधव, अंकुश चव्हाण, कविताबाई अनिल पवार, अनिताबाई गंगाधर कंदनवार, मला बाई विलास जाधव, शोभाबाई दिलीप पवार इत्यादीसह रस्त्याच्या मागणीसाठी दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावून निवेदनावर सह्या केल्या आहेत. </span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-56457988617222058272022-12-16T11:44:00.001+05:302022-12-16T11:44:11.483+05:30 खुरगावला 'बाबासाहेब पाहिलेला माणूस' कार्यक्रम १९ डिसेंबर रोजी -NNL<p><span style="font-family: Mukta; font-size: large;"><span style="background-color: white; color: #222222;"><b></b></span></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgMgLGLXOLO8ckl-UBxC3GPdHeFfZHO0Dc_OMbg2v_sar0YcGF3GEmZvqAu3t48H8trgp-F9urE72RATHcZuf2yPZqxQrW6nMKeYOJ9DVvtjWX2jZd_KNDFY_-f50mbFpD0HacLzxUHBPAnk57pebzoI7KggsTVt9HAATme_LXAcTxgzwO2lzdkwod9/s800/Ambedkar%20(17).jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="533" data-original-width="800" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgMgLGLXOLO8ckl-UBxC3GPdHeFfZHO0Dc_OMbg2v_sar0YcGF3GEmZvqAu3t48H8trgp-F9urE72RATHcZuf2yPZqxQrW6nMKeYOJ9DVvtjWX2jZd_KNDFY_-f50mbFpD0HacLzxUHBPAnk57pebzoI7KggsTVt9HAATme_LXAcTxgzwO2lzdkwod9/w640-h426/Ambedkar%20(17).jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><br />नांदेड|</b> तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दरमहा पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १९ डिसेंबर रोजी सोमवारी बाबासाहेब पाहिलेला माणूस हा कार्यक्रम होणार असून, मार्गशिर्ष पौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच परित्राणपाठ, धम्मध्वजारोहण, त्रिरत्नवंदना, <u style="color: #222222;">बोधीपुजा,</u><span style="background-color: white; color: #222222;"> सूत्</span><wbr style="color: #222222;"></wbr><span style="background-color: white; color: #222222;">तपठण, ध्यानसाधना, धम्मदेसना व्याख्यान, भोजनदान, आर्थिक दान पारमिता आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक, आॅल इंडिया भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.</span></span><p></p><p dir="ltr" style="background-color: white; color: #222222;"><span style="font-family: Mukta; font-size: large;">ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात मार्गशिर्ष पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'बाबासाहेब पाहिलेला माणूस' या विषयावर आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. मार्गशिर्ष पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांना बिम्बिसार राजाने वेळूवन दान दिले. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने १९ व्या वर्षी धम्मदीक्षा घेवून भिक्खुनी संघाची स्थापना केली. </span></p><p dir="ltr" style="background-color: white; color: #222222;"><span style="font-family: Mukta; font-size: large;">तसेच देवद्त्ताने सोडलेल्या माजलेल्या हत्तीवर मैत्रीपूर्ण भावनेने तथागताने विजय मिळविला. अशा काही महत्वपूर्ण घटना या पौर्णिमेला घडलेल्या आहेत. या निमित्ताने १९ डिसेंबर रोजी सकाळपासूनच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांसाठी भिक्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-37972966473423451652022-12-16T11:42:00.000+05:302022-12-16T11:42:39.635+05:30 मानवी मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या आणि समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या पुस्तक व लेखकांना शासनमान्यता नको- समरसता साहित्य परिषदेची भूमिका -NNL<p><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzOCzFrCVsJpT4R14-uyED-g82ySurkJhC57VYrHSD57ysW2AILkf4__tHex3BBthLaguxoCeTC9JFZhwhgG9fyqQvcLoNPKIo-rYCknFhcaL1RB2IlvLrA-nz8pbcl01E5mSBGUC1oa3LAPXQTCeAGzOR7k2PvRwNicBuKZOxY2momAcndKUxPnCZ/s800/011.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="457" data-original-width="800" height="366" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzOCzFrCVsJpT4R14-uyED-g82ySurkJhC57VYrHSD57ysW2AILkf4__tHex3BBthLaguxoCeTC9JFZhwhgG9fyqQvcLoNPKIo-rYCknFhcaL1RB2IlvLrA-nz8pbcl01E5mSBGUC1oa3LAPXQTCeAGzOR7k2PvRwNicBuKZOxY2momAcndKUxPnCZ/w640-h366/011.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><br />औरंगाबाद| </b>महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोबाड घांदी लिखित फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाच्या मराठी अनुवादाला दिलेला पुरस्कार शासनाने परत घेतला, याबद्दल समरसता साहित्य परिषदेला समाधान वाटते आहे. यासाठी समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करत आहे. </span><p></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">साहित्याचा हेतू समाज जोडण्याचा हवा, तोडण्याचा नव्हे. नक्षलवाद- माओवाद आणि दहशतवाद हे भारताचे शत्रू असून संवैधानिक मार्गाऐवजी हिंसेचा अवलंब करणारे मार्ग आहेत. त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरस्कार करणारे मग ते साहित्यिक असोत वा अन्य कुणीही; त्यांचा निषेधच व्हायला हवा. समाजात भेद निर्माण करणाऱ्या सर्वच साहित्यकृती, कलाकृतींना समाजाने पुढे होत संवैधानिक मार्गांनी विरोध करावा आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या व्यक्ती- संस्था- समूहांनाही समर्थन देऊ नये, असे समरसता साहित्य परिषदेला वाटते. </span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">समाजस्वास्थ्य व बंधुतेला हानी पोहचवणाऱ्या मार्गांचे उदात्तीकरण करणाऱ्या व्यक्ती व लिखाणाला पुरस्कार देऊन संबंधीत निवड समितीने घोडचूक केली होती. ती राज्य सरकारने दुरुस्त केली, हे चांगले झाले. यापुढे शासकीय विभागांनी अधिक काळजीपूर्वक पुरस्कार निवड समिती सदस्यांची आणि पुस्तकांची निवड करावी. पुरस्कार निवड समिती सदस्यांनी कुठल्याही राजकीय प्रभावाखाली काम न करता निरामय वाड्मयीन निष्ठेने कार्य करणे अपेक्षित आहे. एकूणच पुरस्कारासाठी ग्रंथ निवड प्रक्रीयेबाबत सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर व्हावा यासाठी शासनाने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी अशी मागणी समरसता साहित्य परिषद करीत आहे.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">आज या पुस्तक व पुरस्काराला समर्थन देणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. आपल्या राजकीय विमर्शाला पुढे रेटण्यासाठी पुरस्कार वापसी करणाऱ्या बुद्धीजीवींनी साहित्यासारखे निर्मळ क्षेत्र खराब करू नये असे आवाहन समरसता साहित्य परिषद करीत आहे. </span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">डॅा. ईश्वर नंदपुरे- अध्यक्ष (नागपूर), डॅा. प्रसन्न पाटील- कार्यवाह (छत्रपती संभाजीनगर) (९८२२४३५५३९)</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">कार्यकारिणी सदस्य- रवींद्र गोळे, योगिता साळवी, धीरज बोरीकर (मुंबई), सुनिल ढेंगळे (ठाणें), विजय मोरे (कल्याण), सुहास घुमरे (पिंपरी चिंचवड), काशिनाथ पवार (पुणें), डॅा. रमा गर्गे (कोल्हापूर), डॅा. गजानन होडे (नाशिक), डॅा. शंकर धडके (सोलापूर), महेश अहेराव (धरणगांव), स्नेहलता स्वामी (नांदेड), दामोदर परकाळे (शेगांव), डॅा. राजेंद्र नाईकवाडे, डॅा. विजय राठोड (नागपूर)</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-31255010054957392872022-12-16T11:39:00.000+05:302022-12-16T11:39:42.508+05:30“UTS’ मोबाईल एप, अनारक्षित तिकीट खरेदी करण्याचा तुमचा स्मार्ट आणि सोपा मार्ग -NNL<p><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b></b></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEijxtknWYbBOwYtF8wq2yj91j3hLSQv9J64Cn59XUnkqFFvA9SWSJTYTaD0pSamWAF3tfXTNLawuzkt3OeGfkMOOGWANH7i-Auv1-xZWdYyA2mCqbjdy21DmhWWIElpGyIhe-ccYGT3teZcZ-keqQDUG0C5SSVPIK93AOWKqJBFfxkwmNWjJO91g0QL/s650/28_09_2021-uts_mobile_app_22062938.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="650" height="532" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEijxtknWYbBOwYtF8wq2yj91j3hLSQv9J64Cn59XUnkqFFvA9SWSJTYTaD0pSamWAF3tfXTNLawuzkt3OeGfkMOOGWANH7i-Auv1-xZWdYyA2mCqbjdy21DmhWWIElpGyIhe-ccYGT3teZcZ-keqQDUG0C5SSVPIK93AOWKqJBFfxkwmNWjJO91g0QL/w640-h532/28_09_2021-uts_mobile_app_22062938.jpg" width="640" /></a></b></span></div><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b><br />नांदेड| </b>येथे दिनांक 15 डिसेंबर, 2022 ला औरंगाबाद येथे श्री के. सांबशिव राव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग), दक्षिण मध्य रेल्वे यांनी औरंगाबाद येथे नांदेड विभागातील वाणिज्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी यूटीएस मोबाइल तिकीट अॅपच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक चर्चासत्र आयोजित केले होते. </span><p></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">या चर्चासत्रात श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड, श्री रवी तेजा, वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड, श्री आर. मोजेस, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, तसेच नांदेड विभागातील वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणीस, आरक्षण पर्यवेक्षक, बुकिंग पर्यवेक्षक आदी संवर्गातील वाणिज्य कर्मचारी उपस्थित होते.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">श्री के. सांबशिव राव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग) यांनी प्रवाशांमध्ये “UTS” मोबाईल अॅपचा अवलंब वाढवणे आणि प्रमुख स्थानकांवर उपलब्ध ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्स (ATVMs) चा वापर वाढवण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर तपशीलवार पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले. श्री के. सांबशिव राव, यांनी PoS मशीनद्वारे डेबिट/क्रेडिट कार्ड आणि UPI चा वापर करून तिकीट करताना डिजिटल पेमेंटचा वाटा वाढवण्याच्या गरजेवर भर दिला.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghui2mfkDgSPZo-3QQLzlSjw8du-1N89VJDLkznWxChm7XtJxNMIsDf70iRpFW9p2zoJlFb4ghf5G8Jot4Hn7dAndhsKCGuv1sJimeIBgblyiQqqnuJDNAsRihdQHC2yyEEOHmzCSZijvD43-FkLu2SyidJxOxrnuTphWlkL4yiMeT_7TgGPYEnbNz/s1500/6a1db6e4-7ea3-41ef-b475-68c515e0c2b8.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1000" data-original-width="1500" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghui2mfkDgSPZo-3QQLzlSjw8du-1N89VJDLkznWxChm7XtJxNMIsDf70iRpFW9p2zoJlFb4ghf5G8Jot4Hn7dAndhsKCGuv1sJimeIBgblyiQqqnuJDNAsRihdQHC2yyEEOHmzCSZijvD43-FkLu2SyidJxOxrnuTphWlkL4yiMeT_7TgGPYEnbNz/w640-h426/6a1db6e4-7ea3-41ef-b475-68c515e0c2b8.JPG" width="640" /></a></span></div><span style="font-family: Mukta; font-size: large;"><br />यूटीएसचा अवलंब करून डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार वाढवल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार आणि स्टेशनरी छपाईवरील ताण कमी होतो, असेही ते म्हणाले. त्यांनी विभागीय कर्मचार्यांना आवाहन केले की त्यांनी वर्षअखेरीस तिकिटात UTS अॅपचा हिस्सा 20% पर्यंत वाढवावा आणि UPI द्वारे कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन द्यावे.</span><p></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड विभाग यांनी आपल्या भाषणात तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची आणि तिकीट काढण्याच्या सुलभ पद्धती जसे की "UTS" अॅप आणि स्थानकांवर जनजागृती मोहीम हाती घेऊन ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्सचा प्रसार करण्याची गरज अधोरेखित केली. प्रखर जागरुकता मोहिमेद्वारे प्रवाशांमध्ये UTS अॅप लोकप्रिय करून संपूर्ण विभागातून खरेदी केलेल्या एकूण तिकिटांमध्ये UTS तिकिटांची टक्केवारी वाढवण्यावर भर देण्याचा सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">नांदेड विभागातील बुकिंग पर्यवेक्षक, कमर्शियल इन्स्पेक्टर, तिकीट निरीक्षक आणि आरक्षण पर्यवेक्षक यांच्या संवर्गातील मोठ्या संख्येने रेल्वे व्यावसायिक विभागाचे कर्मचारी औरंगाबाद येथील या चर्चासत्रात सहभागी झाले आणि त्यांनी प्रवासी व्यवसायात आणखी सुधारणा करण्यावर आपली मते/सूचना मांडल्या.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b> “UTS’ मोबाईल अॅप वापरण्याचे फायदे : - </b>“UTS’ मोबाईल एप अनारक्षित तिकीट खरेदी करण्याचा तुमचा स्मार्ट आणि सोपा मार्ग, UTS एप वापरा, रेल्वे तिकीट खिडकी वर रांग टाळा , R-wallet रिचार्ज वर 3 % बोनस मिळवा.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">तुम्ही रेल्वे स्थानकांपासून 20 किलोमीटर अंतरावरून, अगदी तुमच्या घरातूनही अनारक्षित रेल्वे तिकीट खरेदी करू शकता, रांगेत न थांबता काही सेकंदातच तुम्ही तुमच्या मोबाईल वरून अनारक्षित तिकीट खरेदी करू शकता, खरेदी केलेले तिकीट तिकीट तपासनिकास मोबाईल वर दाखवू शकता, सीजन तिकीट 10 दिवसा पूर्वी नूतनीकरण करू शकता , तिकीट खिडकीवर दिलेले QR कोड स्कॅन करून सुधा तिकीट खरेदी करता येते. </span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b> मोबाईल वरून तिकीट खरेदी करण्याच्या सोप्या पायऱ्या - </b>मुफ्त नोंदणी करा, लॉग इन करा, तिकीट खरेदी करा, (साधारण/सीजन/फलाटफॉर्म), आर-वालेट वापरून किंवा डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड वापरून किंवा इंटरनेट बँकिंग वरून किंवा युपिआइ वरून पेमेंट करू शकता, खरेदी केलेले तिकीट तिकीट तपासनिकास मोबाईल वर दाखवू शकता, सीजन तिकीट 10 दिवसा पूर्वी खरेदी करू शकता, तिकीट खिडकीवर दिलेले QR कोड स्कॅन करून सुधा तिकीट खरेदी करता येते, मदत क्र. 139 / Rail Madat</span></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-28467476616253649072022-12-16T11:35:00.000+05:302022-12-16T11:35:10.222+05:30तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन -NNL<p><span style="font-family: Mukta; font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg0x-8IRhN76xwarQ3iZNenKH5dk96wMS4pmt35rGS0EVfogcAT4b8pnJZ84HxDwuzTRnGH58Bvy_y3Dx29vazsH1SNsfTMJ0XOmyPBxmdIx8Go7ZKXQC7u7xvhmsKScZ2YUovjfJTvHxDwk-EjLqRbun5uIIfZ7Xu7hN39dPvp_xWP10etDLRTK0CO/s1137/fb_img_15115130179031380051958.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="640" data-original-width="1137" height="360" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg0x-8IRhN76xwarQ3iZNenKH5dk96wMS4pmt35rGS0EVfogcAT4b8pnJZ84HxDwuzTRnGH58Bvy_y3Dx29vazsH1SNsfTMJ0XOmyPBxmdIx8Go7ZKXQC7u7xvhmsKScZ2YUovjfJTvHxDwk-EjLqRbun5uIIfZ7Xu7hN39dPvp_xWP10etDLRTK0CO/w640-h360/fb_img_15115130179031380051958.jpg" width="640" /></a></span></div><span style="font-family: Mukta; font-size: large;"><br />सध्यस्थितीत तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील ३ -४ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी तुरीवरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीस पोषक असल्यामुळे सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येऊ शकतो. काही ठिकाणी अळीने तुरीवरील कळ्या, फुले व शेंगा फस्त करण्यास सुरुवात केली आहे. या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.</span><p></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरुवातीच्या काळात पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलावर किंवा शेंगावर उपजीविका करतात, नंतर शेंगा भरतांना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगामध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेऊन आतील कोवळ्या दाण्यावर उपजीविका करतात.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b>एकात्मिक व्यवस्थापन : </b>पाने व फुलांची जाळी करणारी अळीची प्रादुर्भावग्रस्त जाळी गोळा करून अळीसह नष्ट करावी तसेच शेंगा पोखरणारी अळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांचा नायनाट करावा.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">तूर पिक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत व निरीक्षण करावे.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत, यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">पिक कळी अवस्थेत असतांना निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझॅडीरॅक्टिन ३०० पीपीएम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची ५ मिली १० लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल ९.३ + लॅमडा साहॅलोथ्रीन ४.६ झेडसी ४ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">मारुका किडीसाठी इंडोक्झाकार्ब १४.५ एससी ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीन पट वापरावी.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच गुटखा, तंबाखूचे सेवन करु नये व बीडी ओढू नये.</span></p><p><b><span style="font-family: Mukta; font-size: large;">माहितीः उपसंचालक (कृषी), कृषी आयुक्तालय पुणे,तांत्रिक माहिती: व.ना.म.कृ.वि.परभणी,संकलनः जिमाका, अकोला.</span></b></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3707632247860568380.post-78611319781698326882022-12-16T11:31:00.000+05:302022-12-16T11:31:02.396+05:30हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन -NNL<p><span style="font-family: Mukta; font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-family: Mukta; font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTrUQ_jmTbhuC_RJY2XuTTDjNxf2EQeDbxHB8JRP4LujUQihGN6MDuCBe1tV2Tf7aCa5AAmFASrUH9FsWB_Y4r8I2m-9qjGMacCJLjm9O0RLh5_5nANW96XwTCLIje-TrxRSDDGn69d2PWwoPNW9s_f3_Fm_1bMp6z_qHIGcv8-5iA4wI0-_u6MRkG/s666/harbhara%20kid.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="375" data-original-width="666" height="360" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTrUQ_jmTbhuC_RJY2XuTTDjNxf2EQeDbxHB8JRP4LujUQihGN6MDuCBe1tV2Tf7aCa5AAmFASrUH9FsWB_Y4r8I2m-9qjGMacCJLjm9O0RLh5_5nANW96XwTCLIje-TrxRSDDGn69d2PWwoPNW9s_f3_Fm_1bMp6z_qHIGcv8-5iA4wI0-_u6MRkG/w640-h360/harbhara%20kid.jpg" width="640" /></a></span></div><span style="font-family: Mukta; font-size: large;"><br />सध्यस्थितीत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी देऊ शकतात. या सर्व बाबी घाटेअळीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी या अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली आहे.</span><p></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">हि कीड बहुभक्षी असून विशेषतः पीक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. लहान अळ्या सुरुवातीला कोवळी पाने, व फुले कुरतडुन खातात. घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडुन त्यास छिद्र पाडुन डोके आत खुपसुन आतील दाणे खातात. साधारणत: एक अळी तीस ते चाळीस घाट्यांचे नुकसान करु शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी अवस्था असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;"><b>एकात्मिक व्यवस्थापन :- </b>कोळपणी किंवा निंदणी करुन पीक तणविरहित ठेवावे तसेच घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांना नष्ट कराव्यात.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासुन १ मिटर उंचीवर लावावेत. कामगंध सापळ्यांमध्ये ८ते १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत. यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">पिकाच्या सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझॅडिरेक्टिन ३०० पीपीम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. ५०० एल ई १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्रॅम निळ टाकून सायंकाळी फवारणी करावी.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी २५ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.</span></p><p><span style="font-family: Mukta; font-size: large;">शेतात कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा. तसेच गुटखा, तंबाखूचे सेवन करु नये व बीडी ओढू नये.</span></p><p><b><span style="font-family: Mukta; font-size: large;">माहितीः उपसंचालक (कृषी), कृषी आयुक्तालय पुणे,तांत्रिक माहिती: व.ना.म.कृ.वि.परभणी ,संकलनः जिमाका, अकोला.</span></b></p>नृसिंह न्यूज नेटवर्क http://www.blogger.com/profile/02672719453043770086noreply@blogger.com0